एक्स्प्लोर

काळजी करु नका, सरकार आपलंच येईल; पवारांसह उद्धव ठाकरेंचा आमदारांना विश्वास

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पवईतील हॉटेल रेनेसाँमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व आमदारांना विश्वासात घेऊन सरकार आपलेच येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुंबई : काळजी करु नका, सरकार आपलंच स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुपारी आमदारांच्या भेटीसाठी पवईतील हॉटेल रेनेसाँमध्ये आले होते. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी पवारांशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधला. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी नेत्यांशी संवाद साधला. यावेळी सरकार आपलंच स्थापन होणार असून काळजी करु नका, असा विश्वास या नेत्यांनी आमदारांना दिला. सोबतच विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देण्याचेही आवाहन त्यांनी आमदारांना केले. आमदारांच्या फोडाफोडीचं आव्हान कसं रोखायचं यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून, उद्या निकाल येण्याची अपेक्षा आहे. यावरही तिन्ही पक्षांचे लक्ष असणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे सोबत आहेत. काय म्हणाले शरद पवार - तुमची काही अडचण आहे का? किंवा तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? असा थेट सवाल शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना विचारला. यावर आपल्याला अजित पवारांचा फोन आल्याचं काही आमदारांनी यावेळी सांगितलं. मात्र, आपण तुमच्याबरोबर असल्याचा विश्वास या आमदारांनी शरद पवारांना दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत दोन्ही पक्षांचे नेते साशंक धनंजय मुंडे यांच्याशी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वेगळी चर्चा केली. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत दोन्ही पक्षाचे नेते साशंक असल्याचे बोलले जात आहे. कारण, अजित पवार यांनी शपथविधीला बोलावलेले आमदार हे धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती आहे. शिवाय, अजित पवारांच्या शपथविधीनंतर धनंजय मुंडे काही काळ नॉट रिचेबल असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांच्या बंडामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळंच धनंजय मुंडे यांच्याशी वेगळी चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे. संबंधित बातम्या - 30 तासानंतर अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह, तासाभरात केले 21 ट्वीट हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल; सुप्रिया सुळेंनी स्टेटसमधून व्यक्त केल्या भावना EXPLAINER VIDEO | अजित पवारांच्या नाराजीचं कारण काय? पवारांसोबत किती आमदार आहेत? | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget