एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : देवेंद्र फडणवीसांचं सध्याचं राजकारण शूरपणाचं नाही ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल 

Prakash Ambedkar : "आपण देवेंद्र फडणवीस यांना फार शूर राजकारणी समजत होतो. परंतु, सभागृहात पेनड्राईव्ह दाखवणे हे शूरपणाचं नाही अशी टीका वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 

Prakash Ambedkar : वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "आपण देवेंद्र फडणवीस यांना फार शूर राजकारणी समजत होतो. परंतु, सभागृहात पेनड्राईव्ह दाखवणे हे शूरपणाचं नाही, तर गां**पणाच्या राजकारणाचं लक्षण असल्याची घणाघाती टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी 'एबीपी माझा'सोबत संवाद साधला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,  "देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहापेक्षा हा पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते. त्या पेनड्राईव्हमध्ये काय 'गुलकंद' आहे?  तेही फडणवीसांनी स्पष्ट केले पाहिजे आणि ते जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. 

"देवेंद्र फडणवीस यांना मी फार शूर आणि लढाऊ राजकारणी समजत होतो. ते तलवार म्यानातून काढूत लढत बसतील. मात्र, सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवणे हे शूरपणा नाही. सभागृहातील आरोपांतून फारसं साध्य होणार नाही. सभापती फार तर त्यांचे आरोप फेटाळून लावतील. मात्र, त्यांनी हाच पेनड्राईव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते. फडणवीसांनी जे बोलावं ते स्पष्ट बोलावं. त्यातून दुसरा कोणताही वास येऊ नये असा टोला आंबेडकरांनी लगावला आहे.

"राष्ट्रपती राजवटीचा निर्णय जनतेला घेऊ द्या"
दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर आरोप केले होते. त्यानंतर शिवसेनेने राणेंवर आरोप केले आहेत. परंतु, दोघांनीही आरोप करताना याचे पुरावे दिले नाहीत. या गोष्टी आम्ही फक्त टीव्हीवरच पाहतो. याचे पुरावे कधी देणार? असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लावताना केंद्र पुरावे काय देणार? राष्ट्रपती राजवटीचा निर्णय जनतेला घेऊ द्या, असं आंबेडकर यांनी म्हटले आहे.   

"काँग्रेसनं आतातरी समझोत्याचं राजकारण करावं"

काँग्रेसची आतापर्यंतची घोडचूक म्हणजे आपल्याला आणि आंबेडकरवाद्यांना पाडण्याचं राजकारण त्यांनी केल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे. काँग्रेसने चळवळच संपविल्यामुळे मुस्लिम आणि दलितांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली आहे. आताही काँग्रेसनं समझोत्याचं राजकारण केलं नाही तर जे व्हायचं ते होईल. राजकारणात कुणीच कुणाचा कायम शत्रू किंवा मित्र राहात नसल्याने आपण मैत्रीचा हात काँग्रेससमोर ठेवला असल्याचे आंबेडकर म्हणालेत. भाजपसोबत असलेले मतभेद काँग्रेसह इतर कुणाशीही नाहीत. त्यामूळे पुढचा निर्णय काँग्रेसनेच घ्यायचा असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

"संजय राऊतांनी सरड्यासारखे रंग बदलू नयेत"

निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात वाईट नेते असल्याचं संजय राऊत हे एका मुलाखतीत सांगतात. तेच संजय राऊत दुसरीकडे आता त्यांनाच देशातील एकमेव राष्ट्रीय नेते म्हणतात. त्यांनी सरड्यासारखं रंग बदलणं सोडावं, असा टोला आंबेडकरांनी  संजय राऊतांना लगावला आहे. उत्तरप्रदेशातील भाजपच्या 80 जागा फक्त हजार मतांनी निवडून आल्याचं सांगतांनाच भाजपच्या विजयाचं विश्लेषण हे 'चमडी बचाओ' राजकारण असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. 

"देशभर फोफावण्यात आर्थिक आणि संघटनात्मक अडचणी"

आपल्याला देशात मायावतींनी उभ्या केलेल्या राजकारणाची स्पेस भरायला आर्थिक अडचणी आहेत. आपल्याकडे असलेली आर्थिक आणि संघटनात्मक ताकद फक्त दोन-तीन राज्यांपुरतीच मर्यादीत आहे. त्यामूळेच चादर पसरवताना ती फाटणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहे. त्यामूळे जिथे आमची ताकद आहे तिथेच आम्ही फोफावण्याचा प्रयत्न करीत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार अप्रामाणिक ; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल 

POHOTO : प्रकाश आंबेडकरांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
सूर्य कोपला विदर्भ तापला! चंद्रपुरातील ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर, 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget