एक्स्प्लोर

Pandharpur Vitthal Temple : चंद्रग्रहणामुळे विठुरायाच्या नित्योपचारात बदल, मात्र भाविकांना दर्शन सुरू

Pandharpur Vitthal Temple : चंद्रग्रहणाच्या कालावधीत विठ्ठल मंदिरात भाविकांना दर्शन खेळे असणार असून ग्रहण लागताना आणि ग्रहण सुटताना देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातले जाणार असल्याचे मंदिर पुजारी समीर कौलगी यांनी सांगितले.

पंढरपूर : पंढरपूरचं विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Temple)  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त (Tripurari Purnima) लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलं. चातुर्मास संपल्यानंतर या दिवसाला पंढरपुरात विशेष महत्व आहे. काल रात्री विठ्ठल मंदिराला आधी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. तसंच मंदिर आणि परिसरात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. त्यानंतर मंदिरात आणि परिसरात लाखो पणत्या लावण्यात आल्या. या प्रकाशात मंदिर परिसर उजळून निघाला. आज चंद्रग्रहणालाही पंढरपूरचं विठ्ठल रखुमाई मंदिर भक्तांसाठी खुलं राहणार आहे. 

दरम्यान आज होत असलेल्या चंद्रग्रहणाच्या कालावधीत विठ्ठल मंदिरात भाविकांना दर्शन खेळे असणार असून ग्रहण लागताना आणि ग्रहण सुटताना देवाला चंद्रभागेच्या पाण्याने स्नान घातले जाणार असल्याचे मंदिर पुजारी समीर कौलगी यांनी सांगितले. आज सकाळी विठुरायाला खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला असून आता दिवसभर देवाला कोणत्याही अन्नमय पदार्थाचा नैवेद्य नसणार आहे. पंढरपूर परिसरात सायंकाळी 5 वाजून 52 मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होत असल्याने विठुरायाला पुरुषसूक्ताच्या मंत्रोच्चारात तर रुक्मिणी मातेला स्त्रीसूक्त म्हणत पहिले स्नान घातले जाईल . यानंतर 6 वाजून 19 मिनिटांनी म्हणजे ग्रहण संपल्यावर पुन्हा एकदा देवाला मोक्षाचे स्नान घालण्यात येणार आहे. संपूर्ण शुद्ध चंद्रबिंब दिसल्यावर देवाला अन्नाचा महानैवेद्य दाखविला जाणार आहे . ग्रहण काळात देवाचे दर्शन सुरु राहणार असून केवळ अभिषेक कालावधीत पदस्पर्श दर्शन बंद राहून मुखदर्शन सुरु राहील असे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुडाळवंड यांनी सांगितले . 

काल रात्री त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिराला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून टाकण्यात आले होते . आषाढ शुद्ध एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा चार महिन्याचा अर्थात चातुर्मास संपवून देवाला जागे करण्यासाठी भगवान शंकर येतात आणि विष्णूचा कारभार भगवान शंकर त्यांच्या ताब्यात देतात अशी पुराणात मान्यता असल्याने या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे . काल रात्री विठ्ठल मंदिराला आधी आकर्षक फुलांची सजावट कार्नाय्त आली. यानंतर मंदिर आणि मंदिर परिसरात रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. नंतर संपूर्ण विठ्ठल मंदिर आणि मंदिर परिसरात लाखोंच्या संख्येने पणत्या लावून संपूर्ण मंदिर परिसर उजळवून टाकण्यात आला होता.

अकलूज येथील अकलाई मंदिरात देखील पाच लाख पणत्यांचा वापर करून अनोखा दीपोत्सव करण्यात आला होता . यावेळी अकलाई मातेचे पूजन जयसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक केले. या पूजेनंतर अकलूज पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घेत मंदिर परिसरात इच्छेनुसार पणत्या लावत या दीपोत्सवात सहभाग घेतला. 
   

महत्त्वाच्या बातम्या

विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Embed widget