एक्स्प्लोर

लातूरनंतर महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमधून विभाजनाची मागणी

उदगीर जिल्हा निर्मितीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून त्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी सूचना मागवल्या आहेत. दरम्यान, यानंतर आता राज्यातील इतर जिल्ह्यातूनही नवीन जिल्ह्याची मागणी होत आहे. यात बीड, नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, चंद्रपूर, नांदेड सारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुंबई : लातूरचं विभाजन करुन नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात. या संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उदगीर नवीन जिल्हा निर्मिती आणि प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बातमीमुळे आता इतर जिल्ह्यातूनही अशाच प्रकारे नवीन जिल्हा निर्मितीची मागणी होत आहे. यातील काही जिल्ह्याची मागणी जुनीच असून काही जिल्ह्यातून नव्याने मागणी होत आहे. काही जिल्ह्यांमधून तर चार चार जिल्ह्याचीही मागणी होत आहे. त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उदगीर हे लातूर जिल्ह्यातील तालुक्याचे शहर असून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात वसलेलं आहे. लातूरपासून 70 किलोमीटर अंतरावरील उदगीर मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मागील अनेक वर्षांपासून उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी जोर धरत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटना यांनी सातत्याने उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी लावून धरली होती. नऊ आणि 10 जानेवारीला औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत उदगीर जिल्हा निर्मिती संबंधी चर्चा झाली होती. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय इमारतीसाठीचं काम गतिमान करण्याच्या सूचनाही आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उदगीर जिल्हा निर्मितीच्या हालचाली वेग धरत असल्याचे दिसून येते. उदगीर, जळकोट, अहमदपूर, लातूर जिल्ह्यातील हे तीन तालुके तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार या तालुक्यांचा समावेश करत उदगीर जिल्हा निर्मिती करण्याची मागणी अनेक दिवसापासूनची आहे. या बातमीनंतर उदगीर, जळकोट आणि अहमदपूर येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. उदगीर ते अहमदपूर अंतर 32 किलोमीटर आहे. उदगीर ते जळकोट अंतर हे 25 ते 30 किलोमीटरच्या आत आहे. लोहा कंधार हे दोन तालुकेही उदगीरच्या जवळ आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी उदगीर हे सोयीस्कर ठिकाण होऊ शकते. यामुळे या भागातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी कायम थंडबस्त्यात जात होती. याची कारण म्हणजे उदगीर शहर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमा भागाला लागून असलेला भाग आहे. उदगीर जिल्हा निर्मिती करताना नेमके कोणते तालुके त्याला जोडले जावे याबाबत सरकारी पातळीवर काही ठरत नव्हते. त्यामुळे उदगीर जिल्हा निर्मितीचा विषय कायमच मागे पडत होता. या जिल्ह्यातूनही होतेय मागणी - लातूरनंतर अनेक जिल्ह्यातून आता नवीन जिल्ह्याची मागणी होत आहे. बीडमधून अंबाजोगाई जिल्हा निर्मितीची मागणी होतेय. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याला जिल्हा करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यातील मालेगावची मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर किंवा ब्रह्मपुरी जिल्हा तयार करावा, अशी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातूनही इंदापूर किंवा बारामती, असा वाद सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी जिल्ह्याची मागणी होत आहे. ठाणे जिल्ह्याचे तर चार जिल्ह्यात विभाजनाची मागणी आहे. अहमदनगरमध्येही शिर्डी आणि श्रीरामपूर जिल्ह्याची जुनी मागणी आहे. Latur District | लातूर जिल्ह्याचं लवकरच विभाजन होणार? | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!

व्हिडीओ

Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report
Mahayuti Seat Sharing : मनपासाठी महायुतीचं कुठे ठरलं कुठे अडलं? Special Report
Social Media Ban Update : भारतातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? Special Report
Tejasvee Ghosalkar : घोसाळकरांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे की नाही? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
Share Market : विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये भारतीय बाजारातून 2 लाख कोटी काढून घेतले, सर्वाधिक फटका 'या' क्षेत्रांना
FII नं 2025 मध्ये भारतीय बाजारातून 2 लाख कोटी काढून घेतले, सर्वाधिक फटका 'या' क्षेत्रांना, जाणून घ्या
तिकडे अमेरिकेची तैवानला शस्त्र पुरवण्याची घोषणा, इकडून चीनचा दणका, 20 अमेरिकन कंपन्यांवर बंदी, मालमत्ता गोठवली
चीनचा जोरदार धक्का, अमेरिकेच्या  20 कंपन्यांवर घातली बंदी, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं
Meenakshi Shinde: ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
ठाण्यात मीनाक्षी शिंदेंनी तडकाफडकी राजीनामा भिरकावला, अन् एकनाथ शिंदेंनी सुद्धा फोनाफोनी करत निरोप धाडला!
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे, ते नावापुढे लावता येणार नाही, ते बेकायदेशीर आहे' मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Embed widget