एक्स्प्लोर

महाराष्ट्रामध्ये कोणतेही बंद व्यापारी पाळणार नाहीत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा ठराव

राज्यात यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव व्यापारी संघटना महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला आहे. सतत होणाऱ्या बंदमुळे आर्थिक नुकसान होत असल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिलीय.

नाशिक : राज्यात यापुढे कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला आहे. सतत होणाऱ्या बंद आणि आंदोलनामुळे व्यापारी वैतागले असून यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत व्यापारी संघटनेने हा ठराव मांडला आहे. त्यानुसार आगामी काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी एबीपी माझाला दिली आहे. तर, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पुण्याचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही या ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, राज्यभरात व्यापाऱ्यांनी ठराव मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मागील काही वर्षांपासून बंद आणि आंदोलनाचे प्रकार देशभरात वाढले आहेत. याचा सर्वात जास्त फटका बसतो तो सामान्य व्यापाऱ्यांना. बंद काळात दुकाने बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. शिवाय आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडला तरी दुकाने संकटात सापडतात. या सततच्या गोष्टींना व्यापारी वर्ग वैतागल्याने त्यांनी हा ठराव मांडल्याची माहिती दिली आहे. काय आहे ठराव? गेल्या अनेक दिवसांपासून विविध कारणाने समाज ढवळून निघत आहे. विरोधात-समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. बंद पाळले जातात. अशी आंदोलने ही सरकारच्या निर्णया विरोधात किंवा समर्थनार्थ असतात. परंतु, त्याची झळ सामान्य व्यापाऱ्यांना बसत आहे. व्यापारी म्हणजे सरकार नाही. व्यापारी म्हणजे मुकी बिचारी कोणीही हाका, असा प्रकार झाला आहे. बंद पाळण्यासाठी जे फिरतात. त्यांची कोणतीही "दुकानदारी" नसते. दुकाने बंद करणे हीच त्यांची "दुकानदारी" असते. पण यात आम्हा व्यापाऱ्यांचा काय दोष? आधीच नोटा बंदीपासून आमचे कंबरडे मोडले आहे. त्यात हे बंद आम्हाला भिकेला लावत आहेत. कोणीतरी व्हॉटसअपवर किंवा फेसबुकवर बंदची हाक देते. आणि क्षणार्धात खेड्यापाड्यात, शहरात ही बातमी पसरते. दुकाने उघडी ठेवली तरी ग्राहक येत नाहीत. त्यामुळे येथून पुढच्या कोणत्याही बंद मध्ये व्यापारी सामिल होणार नाहीत. वाटल्यास दंडावर काळ्या फिती बांधून समर्थन देवू, पण दुकान बंद करणार नाही. आमचे दुकान चालू असताना अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस व प्रशासनाने संरक्षण द्यावे. जेणेकरुन आम्हाला दुकाने चालू ठेवता येतील, काही तोडफोड अनुचित प्रकार घडल्यास पूर्णतः शासनाला जबाबदार धरले जाईल. कृपया आपल्या मार्गदर्शनाची व सहकार्याची अपेक्षा, असा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने मांडला आहे. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्समधील महत्वाचे ठराव - महाराष्ट्रामध्ये इथून पुढे व्यापारी बंद पाळणार नाहीत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला पाठिंबा देणार नाहीत. राजकीय पक्षांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केल्यास व्यापारी दिवसभर डाव्या दंडावर काळी निषेधाची पट्टी लावून बंदमध्ये सहभागी होणार Maharashtra Bandh | मराठवाड्यातही बंद; बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबादमध्ये बाजारपेठा बंद
मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan Nashik Pothole death: 'लग्नाची खरेदी अपुरीच राहिली', नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे महिलेचा गेला जीव; गिरीश महाजनांसमोर बेळे कुटुंबाचा आक्रोश
'लग्नाची खरेदी अपुरीच राहिली', नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे महिलेचा गेला जीव; गिरीश महाजनांसमोर बेळे कुटुंबाचा आक्रोश
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Nashik Crime: पोलीस कॉन्स्टेबलसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 10 हजारांची लाच घेणं भोवलं; लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल; नाशिक पोलीस दलात खळबळ
पोलीस कॉन्स्टेबलसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 10 हजारांची लाच घेणं भोवलं; लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडल; नाशिक पोलीस दलात खळबळ
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget