एक्स्प्लोर

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जयंत  पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवल्याचे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil : भारताच्या इतिहासात कृषीमंत्री म्हणून शरद पवार यांनी जितकं काम केलं तितके कोणीची केले नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी पवारांचे काम समजून घेतले असते तर त्यांना प्रश्न पडला नसता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जयंत  पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. पवार साहेबांनी आयात करणाऱ्या देशाला निर्यात करणारा देश बनवला. पिकांना चांगला हमी भाव दिला, फळबागांना अनुदान दिले, हॉर्टीकल्चरची सुरू केली. त्यामुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत. कांदा, केळी अशा पिकांसाठी संशोधन केंद्र उभे केल्याचे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांवर प्रचंड विश्वास 

अमित शाह जर देशात फिरले तर त्यांना शेतकरी सांगेल की त्यांचा सातबारा पवार साहेबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मदतीने कोरा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना त्यानंतर त्यांनी पॅकेजही दिले. एफ आर पी चे धोरण आणले त्याची कडक अंमलबजावणी केल्याचे जयंत पाटील म्हणाले. अशा अनेक गोष्टी मी सांगू शकेल, त्याला दिवस कमी पडेल. त्यामुळे वारंवार महाराष्ट्र येऊन अमित शाह यांनी पवार साहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस करु नये असे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेला पवार साहेबांवर प्रचंड विश्वास आहे. तुम्ही प्रश्न उपस्थित केल्यानं जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले. 

 260 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन शरद पवारांच्या काळात झालं

कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी उत्तम काम केलं आहे. अन्न धान्य उत्पादनात शरद पवार कृषिमंत्री असताना 60 दशलक्ष टन वाढ झाली. एकेकाळी अन्न धान्याची आयात करणारा देश निर्यात करायला लागला. वाजपेयी काळात आधारभूत किमंती वाढलेल्या होत्या. 260 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन शरद पवारांच्या काळात झालं. 2013 मध्ये पहिल्यांदा भारताने 100 दशलक्ष टन तांदळाची निर्मिती केली. साऱ्या जगाने त्यावेळी वाहवाह केली. राष्ट्रीय फळबाग अभियान शरद पवारांनी सुरू केलं. राष्ट्रीय फलोत्पादन वर 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचा फायदा असा झाला की 60 लाख हेक्टर ओलिताखाली आले. त्याचा फायदा देशांतर्गत गरज भागवून देशाला 14 हजार कोटी रुपये परकीय चलन मिळाल्याचे जयंत पाटील म्हणाले. 80 लाख हेक्टर क्षेत्रावर 147 दशलक्ष टन भाज्या उत्पादन होतं होत्या. 14 हजार कोटी रुपये भाज्या निर्यात केल्यामुळं पैसे मिळतात. 

शेतकरी कर्जमाफी शरद पवारांनी केली

देशात शेतकरी कर्जमाफी शरद पवारांनी केली. 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी त्यांनी केली होती. शेतकरी सातबारा कोरा केला.दुष्काळात महाराष्ट्राला 2200 कोटी रुपये दिले. द्राक्ष बागायतदार उभे केले. एफआरपी सारखा कडक कायदा त्यांनी केला त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याचे जयंत पाटील म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime: खडी केंद्रातील मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
Ram Shinde : वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करु : फडणवीसABP Majha Marathi News Headlines 12 Noon TOP Headlines 12 Noon 31 March 2025Sanjay Raut PC : राज ठाकरेंचं भाषण ते नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा; संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 31 March 2025 : 11 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime: खडी केंद्रातील मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, सीएम फडणवीस म्हणाले, उत्तराधिकारी निवडण्याची वेळ...
Raigad Crime News : सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
सासरच्यांकडून 'ती'चा हुंड्यासाठी छळ! चक्क सुनेच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन जीवे मारण्याची धमकी 
Ram Shinde : वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
वाचाळवीरांवर कठोर कारवाईसाठी कायदे करावेच लागणार; राम शिंदेंचा उदयनराजेंच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, राज्य सरकार...
Raj Thackeray : उठ मराठ्या जागा हो, तुमची फक्त माथी भडकावत आहेत, तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते; राज ठाकरेंनी 'महाराष्ट्र धर्मात' अंगार भरला!
उठ मराठ्या जागा हो, तुमची फक्त माथी भडकावत आहेत, तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते; राज ठाकरेंनी 'महाराष्ट्र धर्मात' अंगार भरला!
Shirdi Airport : आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
आनंदाची बातमी! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ठरणार केंद्रबिंदू
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
पण आम्ही बाबांना वाचवू शकलो नाही; अपंग बाप पोटच्या लेकीसमोर जिवंत जाळला, लग्नासाठी आणलेला दोन घरातील बाजार आगीत भस्मसात
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
मिस्ड कॉल्सवरून प्रेम, पळून जाऊन लग्नही केलं अन् बायकोला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव; 'तो' व्हिडिओ करून सोशल मीडियात अपलोड
Embed widget