एक्स्प्लोर

लोकांचा उद्रेक झाल्यास आम्ही जबाबदार नसू; नाणार रिफायनरी प्रश्नी आता विरोधकांची आक्रमक भूमिका

Nanar refinery project : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पावरुन दोन गट पडले आहेत. यापूर्वीच शिवसेनेने आम्ही स्थानिकांसोबत असल्याची भूमिका घेतली आहे. तर लोकांचा उद्रेक झाल्यास आम्ही जबाबदार नसू, असा इशारा नाणार रिफायनरी विरोधकांनी दिलाय.

रत्नागिरी : नाणार तेल शुद्धीकरण कारखाना हा कोकणातील कायम चर्चेत राहिलेला प्रकल्प आहे. शिवसेनेनं या प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिकांच्या बाजूनं असून हा प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा केली. पण, त्यानंतर देखील समर्थक प्रकल्पासाठी आशावादी असून विविध स्तरावर, विविध संघटनांकडून सध्या प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, या प्रश्नी समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेत 8500 हजार एकर जमिनीधारकांची प्रकल्पाला संमती असल्याचा दावा केला. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.

या साऱ्याबाबत रिफायनरी विरोधकांचे नेते अशोक वालम यांना विचारले असता त्यांनी, 'हा प्रकल्प रद्द झाला आहे. आम्ही सध्या स्थानिकांच्या जमिनी कुणी खरेदी केल्या याच्या चौकशीची मागणी सरकारकडे करत आहोत. त्यामुळे समर्थक प्रकल्पासाठी प्रयत्न करत आहेत. पण, यामुळे लोकांचा उद्रेक झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसू असं अशोक वालम यांनी स्पष्ट केलं आहे. परिणामी, विरोधक देखील आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे हा प्रकल्प होणार असून आसपासच्या गावांची जवळपास बारा ते साडेबारा हजार एकर जमिन जाणार आहे. याप्रकल्पामध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक होणार असून जवळपास लाखभर स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी काय म्हणाले वालम? भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि नाणारचा प्रश्न मार्गी लागेल असं विधान रविवारी केलं होतं. त्यावर देखील वालम यांनी टीका केली आहे. त्यांना सध्या काहीच काम नाहीय त्यामुळे जठार अशी विधानं करत आहेत. नाणार विरोधकांमुळे काय होऊ शकतं हे जठारांनी देवगड येथे अनुभवलं आहे, असं देखील वालम यावेळी म्हणाले. शिवाय आम्हाला तेल शद्धीकरण कारखाना नव्हे तर प्रदुषणकारी कोणताही प्रकल्प आम्ही येऊ देणार नाही. काजू, आंबा, करवंद, जांभूळ यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आल्यास त्याचं स्वागत करू. प्रकल्प यावेत पण ते पर्यावरणपुरक असावेत असं वालम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी समर्थक आग्रही होत असताना विरोधक देखील आता आक्रमक झाले आहेत.

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? जितेंद्र आव्हाडांना समर्थक भेटल्यानंतर एबीपी माझानं शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यावर बोलताना हा विषय शिवसेनेसाठी संपला आहे. काहीही झालं तरी नाणार प्रकल्प होणार नाही असं स्पष्ट केलं. शिवाय, शिवसेना प्रवक्ते आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील नाणारबाबत शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं म्हटलं होतं.

नाणारचा मुद्दा का आला पुन्हा चर्चेत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत स्थानिकांना प्रकल्प नको. त्यामुळे तो रद्द करण्याचा निर्णय झाला. स्थानिकांना हवा असल्यास प्रकल्प करू असं म्हटलं होतं. त्यामुळे नाणार रिफायनरी समर्थक सध्या प्रकल्प व्हावा. प्रकल्पाला स्थानिकांचा पाठिंबा वाढत असून आमच्याकडे 8500 हजार एकर जमिनिची संमतीपत्र असल्याचा दावा केला जात आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

HSC Exam Result 2026 : बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
Pune Bhor Crime : पुणे हादरलं! चिमुरडीला गुरांच्या गोठ्यात नेलं, नराधमाने विकृतीचं टोक गाठलं, अत्याचार करुन संपवलं, भोरमध्ये नेमकं काय घडलं?
पुणे हादरलं! चिमुरडीला गुरांच्या गोठ्यात नेलं, नराधमाने विकृतीचं टोक गाठलं, अत्याचार करुन संपवलं, भोरमध्ये नेमकं काय घडलं?
सेल्फीच्या नादात गमावला जीव, मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू, एका दिवसात चार जणांचा अंत 
सेल्फीच्या नादात गमावला जीव, मावळमधील जाधववाडी धरणात बुडून तीन तरुणांचा मृत्यू, एका दिवसात चार जणांचा अंत 

व्हिडीओ

Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report
Mumbai Crime : ड्रग्ज टेस्टिंगचं किट कारवाई टाईट Special Report
Harshwardhan Sapkal : तीनदा माघार फरफट की 'विचार'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSC Exam Result 2026 : बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
बारावीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर; रिझल्ट वेबसाईटवर लोड होत नाहीये? मग SMS आणि DigiLocker ने काही सेकंदात होईल काम
Iran War Live Update: युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
युद्धविरामानंतर युद्धाची पुन्हा ठिणगी? ट्रम्पकडून हल्ल्याचा इशारा, संयुक्त अरब अमिरातीकडूनही सूचक हालचाली; गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
Maharashtra Live blog updates: एसटी महामंडळाच्या ताब्यातली शौचालय 1 जून पासून मोफत उपलब्ध होणार; बस स्थानकामध्ये वाचनालय उभारले जाणार : मंत्री प्रताप सरनाईक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
मी भाजपसोबत मॅच होऊ शकत नाही; शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं, एकनाथ शिदेंचं कौतुक
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
नगरपालिकेतील अकाऊंटेंट ACB च्या जाळ्यात, 1 लाख 34 हजारांच्या लाचेची मागणी; लाचलुचपत विभागाची धडक मोहीम
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
कामगार दिनाची सुट्टी जीवावर बेतली; संभाजीनगरमध्ये पोहायला गेलेल्या 3 कामगारांचा बुडून मृत्यू, 6 बचावले
Pune Bhor Crime news: भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
भोरमध्ये चिमुरडीला गोठ्यात नेऊन अमानवी कृत्य, सुषमा अंधारे फडणवीसांवर संतापल्या, म्हणाल्या, 'गृहमंत्र्यांना काही देणेघेणं नाही, फक्त स्वत:ची जाहिरात...'
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
HSC Results: उद्या 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल, 14 लाख विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली; दुपारी 1 वाजता इथं पाहा गुणपत्रिका
Embed widget