एक्स्प्लोर

मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ विधानभवनापासून ते राज्यपालांपर्यंत गाजला. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीसाठी नागपूर विद्यापीठात आल्या आहेत.

नागपूर: मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ विधानभवनापासून ते राज्यपालांपर्यंत गाजला. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या लाखो उत्तरपत्रिका तपासणीसाठी नागपूर विद्यापीठात आल्या आहेत. सुमारे दोन लाख उत्तरपत्रिका नागपूर विद्यापीठाकडून तपासून दिल्या जाणार आहेत. 250 शिक्षक नागपुरातून ऑनस्क्रीन प्रणालीअंतर्गत मूल्यांकन करुन देणार आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आजच मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैपर्यंत लागतील असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे नागपुरात आलेल्या 2 लाख उत्तरपत्रिका 5 दिवसात तपासण्यासाठी, 250 पैकी प्रत्येक शिक्षकाला तासाला सुमारे 13 उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत. शिक्षकांनी जर 12 तास उत्तर पत्रिका तपासणीचं काम केलं तर तासाला 13 पेपर तपासावे लागतील. दरम्यान, नागपूरच्या धनवटे नॅशनल आणि शिवाजी सायन्स या दोन कॉलेजमध्ये सध्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम सुरु आहे. आजपासून काम सुरु होणं अपेक्षित आहे, मात्र दुपारपर्यंत कॉम्प्युटरवर शिक्षकच दिसत नव्हते. मुंबई विद्यापीठाच्या निकालाला भलेही नागपूर विद्यापीठाची मदत घेतली असली, तरी टार्गेट सोपं नाही. पेपर तपासण्यासाठी सर्व शिक्षक दुपारनंतर येणार. त्यात त्यांना ऑनस्क्रीन प्रणालीची सवय नाही, तिची सवय होण्यास काही दिवस लागू शकतात. त्यामुळे मुंबई विद्यापीठाचे निकाल 31 जुलैला कसे लागणार हे पाहाणं औत्सुक्याचं आहे. 31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन  मुंबई विद्यापीठातील घोळावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मौन सोडलं आहे. विधानपरिषदेत उपस्थित लक्षवेधीला उत्तर देताना राज्यपालांच्या निर्देशानुसार 31 जुलैपूर्वीच निकाल लावण्याचं आश्वासन तावडेंनी दिलं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची हमी विनोद तावडेंनी दिली आहे. कुलसचिवांची बदली राज्य सरकारने नाही, तर केंद्राने केल्याची माहिती विनोद तावडेंनी दिली. आर्ट्सचे निकाल परवापर्यंत लागतील. 61 हजार 992 पेपर तपासायचे बाकी आहेत. कॉमर्सचे पेपर तपासणं कठीण आहे. 3 लाख 75 हजार पेपर बाकी असून दरदिवशी 75 हजार तपासायचं आवाहन आहे.  लॉ विषयाच्या  40 हजार उत्तरपत्रिका असून लॉ आणि मॅनेजमेंटला शिक्षक मिळत नसल्याचंही तावडे म्हणाले. एकूण उत्तरपत्रिका – 17 लाख 68 हजार 441 तपासलेल्या उत्तरपत्रिका – 12 लाख 48 हजार 492 तपासण्यास बाकी – 5 लाख 19 हजार 949 मुंबई विद्यापीठात मंगळवारच्या दिवसात 1 लाख 30 हजार पेपर तपासून झाले, 5 हजार 30 शिक्षकांकडून पेपर चेकिंग झाल्याची माहिती आहे. मुंबई विद्यापीठा अंतर्गत 1984 मध्ये 80 महाविद्यालयं होती. तेव्हा परीक्षा विभाग जेवढा होता, तितकाच अजूनही आहे. मात्र 31 जुलैपर्यंत सर्व निकाल लावण्याची जबाबदारी शासन म्हणून स्वीकारतो, असं तावडे म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Bacchu Kadu Join Shivsena: गेल्या 24 तासात काय खलबतं झाली? काय मागण्या केल्या, कशावर झाली चर्चा? शिंदेंसोबत काय बोलणं झालं, बच्चू कडूंनी सगळंच सागितलं
गेल्या 24 तासात काय खलबतं झाली? काय मागण्या केल्या, कशावर झाली चर्चा? शिंदेंसोबत काय बोलणं झालं, बच्चू कडूंनी सगळंच सागितलं
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
Embed widget