![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Police: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पोलिसांवर गृहसंकट, 116 कुटुंबीयांना तातडीने घरं खाली करण्याची नोटीस
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पोलिसांवर हे घराचं संकट आलंय. विशेष म्हणजे या पोलिसांना डीबी मार्गऐवजी माहीम, नायगाव, वरळी येथील पर्यायी घरं दिलीत
![Mumbai Police: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पोलिसांवर गृहसंकट, 116 कुटुंबीयांना तातडीने घरं खाली करण्याची नोटीस Mumbai Police notice to 116 families to vacate their houses immediately before rain Mumbai Police: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई पोलिसांवर गृहसंकट, 116 कुटुंबीयांना तातडीने घरं खाली करण्याची नोटीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/10/fd23b6fc3b98882ad41c2b7fbcfcea44168637396322989_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईकरांच्या (Mumbai News) सुरक्षेची जबाबदारी वाहणारे मुंबई पोलीस (Mumbai Police) धर्मसंकट सापडलेत. डीबी मार्ग पोलीस वसाहतीत राहणाऱ्या 116 पोलीस कुटुंबीयांना तातडीनं घरं खाली करण्याची नोटीस बजावण्यात आलीय. यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटचं कारण देण्यात आलंय. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारती धोकादायक असल्याने पोलीस कुटुंबीयांना नोटिसा पाठवण्यात आल्यात.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पोलिसांवर हे घराचं संकट आलंय. विशेष म्हणजे या पोलिसांना डीबी मार्गऐवजी माहीम, नायगाव, वरळी येथील पर्यायी घरं दिलीत. त्यामुळे मुलांच्या शाळांचं कसं करायचं, हे नवं सकंटही पोलिसांसमोर उभं राहिलंय. डीबी मार्गाऐवजी इतर ठिकाणी दिलेली घरं हे अतिशय निकृ्ष्ट दर्जाची असल्याचा पोलीस कुटुंबियांचा दावा आहे.डीबी मार्ग ऐवजी माहिम, नायगाव, वरळी आदी ठिकाणी पर्यायी घरं दिली. गेल्या 30 ते 35 वर्षापासून पोलीस कुटुंबिय या वसाहतीत राहत आहेत आता अचानक घरं कशी खाली करायची? असा सवाल पोलीस कुटुंबियांनी सरकारला केला आहे. पोलीस वसाहतीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत.पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
पोलिसांना 15 लाख रुपयांत घरे
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांना धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. पोलिस वसाहतीची दुरवस्था झाली असून पोलिसांना कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. बीडीडी चाळीत वास्तव्य करणाऱ्या पोलिसांना 15 लाख रुपयात घरे देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
पोलिसांना मोफत घरे नाही
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलिसांना मोफत घरे द्यावी अशी मागणी कालिदास कोळंबकर यांनी केली होती. मीदेखील या मताचा होतो. मात्र, विभागाशी चर्चा केल्यानंतर आपल्याला कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नाही. पोलिसांना मोफत घरे दिल्यानंतर शासकीय कर्मचारीदेखील हीच मागणी करतील आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेद करता येणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. पोलिसांच्या कुटुंबियांवर निवृत्तीनंतर बिकट परिस्थिती ओढवते. मुंबईत घर घेणे परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांच्या योजनेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून हक्काची घरे उपलब्ध होणार असल्यामुळे पोलिसांची मोठी चिंता दूर होईल, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा :
मुंबईकरांनो सावधान! घरफोड्या करणाऱ्या मोलकरीण गँगचा पोलिसांकडून पर्दाफाश, महिलांची टोळी गजाआड
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)