एक्स्प्लोर

विधानसभेत भुजबळांची सत्ताधाऱ्यांवर चौफेर फटकेबाजी

मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बुलेट ट्रेन या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवरून सरकारला त्यांनी धारेवर धरलं.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांवर चौफेर फटकेबाजी केली. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, बुलेट ट्रेन या सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांवरून सरकारला त्यांनी धारेवर धरलं. ''बुलेट ट्रेन मुंबई ते गुजरातच का?'' बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट आहे. लाखो-कोटी रुपये या प्रोजेक्टसाठी आपल्याला चुकवावे लागणार आहे. बरं बुलेट ट्रेन मुंबई ते गुजरातच का? मुंबई ते दिल्ली का नाही?  असा सवालही भुजबळांनी केला. सरकारने काय करायचं ते करा, पण जे गरजेचे आहे आधी ते करा. मुंबईची परिस्थिती काय आहे? ब्रीज पडत आहेत, विमान पडत आहे, रस्ते खचत आहे. मानसाने कुठे-कुठे लक्ष घालावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांना जगणे मुश्कील झाले आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ''मेक इन महाराष्ट्रचं काय झालं?'' सरकारने योजना केल्या. त्यांचा गाजावाजा केला मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटीक महाराष्ट्र यातून काहीच साध्य झालं नाही. तरुणांना हवा त्याप्रमाणात रोजगार मिळाला नाही. राज्यातून सोन्याचा धूर निघेल असं स्वप्न दाखवलं गेलं. मेक इन महाराष्ट्राचा सांगता समारंभ पार पडला, पण त्या स्टेजला आग लागली. त्या योजनेची खरोखरच सांगता झाली. हे अवास्तव स्वप्न आहे, असं म्हणत भुजबळांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. दरम्यान, सरकारने नोटाबंदी केली, त्यामुळे लोकांचे धंदे बुडाले, असं म्हणत भुजबळांनी केंद्रातील भाजप सरकारवरही निशाणा साधला. ''मुख्यमंत्र्यांनी कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावं'' कायदा-सुव्यवस्थेबाबत न बोललेलं बरं. नागपूर आहे की पिस्तूलपूर आहे अशा प्रकारे मथळे वर्तमानपत्र छापले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी ग्रुहमंत्रीपदाचा कारभार सोडावा या मताचा मी नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यात हस्तक्षेप करून हे थांबवावे. ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, असंही भुजबळ म्हणाले. ''मनुवादाला इथे थारा नाही'' आज दलितांवर हल्ले होत आहे. पुन्हा एकदा राज्यात मनुवाद बोकाळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे राज्य फुले, शाहु, आंबेडकरांचे राज्य आहे. मनुवादाला इथे थारा नाही, असं भुजबळ म्हणाले. फुलेंनी सांगितले होतं मनुस्मृती जाळा आणि बाबासाहेबांनी ती जाळली. नंतर सुंदर असं संविधान निर्माण केलं, त्यामुळेच आपला देश एकसंध राहिला. पण आज काही लोक मनु श्रेष्ठ आहे असे बोलत आहेत. सरकारने सांगावं अशा लोकांना आळा घालणार आहे की नाही? ही प्रवृत्ती नष्ट कशी होईल याचा प्रयत्न सरकारने करायला हवा, नाही तर संतांनी, महापुरुषांनी जे करून ठेवले आहे ते नष्ट होईल, अशी चिंताही भुजबळांनी व्यक्त केली. ''एमपीएससी परीक्षेत महिलांवर अन्याय'' एमपीएससी परीक्षेत महिलांना समांतर आरक्षण नव्हतं म्हणून महिलांनी खुल्या वर्गातून परीक्षा दिल्या. त्या महिला पास झाल्या. नोकरीवर रुजू होताना त्यांना विचारणा केली गेली की तुम्ही खुल्या वर्गातून का परीक्षा दिली. ज्यांच्याकडे पैसे होते अशा महिलांनी कोर्टात लढा दिला आणि त्यांना न्याय मिळाला पण ज्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांना न्याय मिळाला नाही. सर्वांना एकच न्याय असायला हवा, अशी मागणी भुजबळांनी केली. ''राज्यातील कारागृहांची अवस्था बिकट'' राज्यातील कारागृहांची अवस्था बिकट आहे. हजार माणसांच्या जागी 3.5 हजार माणसांना ठेवलं जात आहे. कारागृहात जनावरासारखी वागणूक दिली जाते. लोकांना जामीन मिळत नाही. खरे आरोपी मिळत नाहीत, गरीबांना तुरुंगात डांबलं जात आहे, असं म्हणत भुजबळांनी तुरुंगातील परिस्थितीवरही सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्हा मादक पदार्थांच्या विळख्यात सापडला आहे. या लोकांवर सरकार कारवाई करत नाही मात्र गरीब,  आदिवासी लोकांनाच पकडलं जात आहे. सरकारने कडक पाऊले उचलली तर याला आळा बसू शकतो, असं भुजबळ म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget