एक्स्प्लोर

Maratha Reservation : वटहुकूम आणि घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही, केंद्राने भूमिका स्पष्ट करावी; संभाजीराजेंची मागणी

Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयात आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा प्रश्नच नाही, आता आरक्षण हे राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या माध्यमातून मिळू शकेल असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

अहमदनगर :  मराठा आरक्षण प्रश्नावर केंद्र सरकारने आता आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही ते ठरवावं. या प्रकरणातील राज्याची भूमिका संपली असून केंद्राने आता 102 व्या घटनादुरुस्तीसंबंधी वटहुकूम काढावा आणि घटनादुरुस्ती करुन राज्यांना अधिकार द्यावेत अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. मराठा आरक्षणासंबंधी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

मुक आंदोलन तात्पुरतं स्थगित
शासकीय बाबींना वेळ लागतोय म्हणून राज्य सरकारला वेळ दिलाय. त्यामुळे मराठा आरक्षणासंबंधी सुरु झालेलं मुक आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आहे, ते पूर्णपणे बंद केलं नाही असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. गायकवाड अहवालात ज्या त्रुटी आहेत त्या भरुन काढून परत तो अहवाल राज्यपालांच्या माध्यमातून राष्टपतींकडे द्यायचा असा एक पर्यांय आहे. त्यानंतर राष्ट्रपती मागास आयोगाला सूचना देऊ शकतील. अशा पद्धतीने राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळू शकते असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. अपवादात्मक परिस्थिती आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रपती यांच्याकडे जावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं

केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, "मराठा आरक्षणासंबंधी राज्याची भूमिका संपली असून आता केंद्र सरकारला आता लवकरात लवकर भूमिका स्पष्ट करावी लागेल. मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही ते आता केंद्र सरकारने ठरवावं. राज्य फक्त आता शिफारस करु शकेल. त्यामुळे आता केंद्राची जबाबदारी आहे."

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर एस ई बी सी आरक्षणाचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या सहीने केवळ याचा आयोगाला असल्याचे निकालात म्हटले आहे. राज्यांना हे अधिकार नसल्याचं मत खंडपीठाने नोंदवलं होतं. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने अपील केलं होतं. पण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज सुप्रीम कोर्टात केंद्राचीही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ एस ई बी सी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करायचे असतील तर हा निर्णय केवळ केंद्रीय पातळीवरच होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
Nashik Crime : कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pratap Sarnaik Mira Road Morcha : प्रताप सरनाईक सक्षम, मोर्चात मला कुणीही अडवलं नाही - सरनाईक
Sandeep Deshpande Speech Mira Road : चड्डीतराहायचं, मराठीचा आम्हाला माज, संदीप देशपांडेंचं कडक भाषण
Avinash Jadhav on Mira Bhayandar Morcha :  मराठी माणसाची ताकद मीरा भाईंदरमध्ये दिसली, जाधव कडाडले
Mira Bhayandar Marathi Morcha | पोलिसांच्या कारवाईनंतरही मोर्चा निघणारच, MNS ठाम
ABP Majha Headlines : 09:30 AM : 08 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत किती मृत्यू, धक्कादायक आकडेवारी
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
Nashik Crime : कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
कंसमामला लाजवणारं मामाचं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्याला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना
Video: अटक, सुटका ते भाषण; अविनाश जाधवांनी सांगितलं मध्यरात्रीपासून 11 तासांत काय घडलं, ते कुठं होते?
Video: अटक, सुटका ते भाषण; अविनाश जाधवांनी सांगितलं मध्यरात्रीपासून 11 तासांत काय घडलं, ते कुठं होते?
Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदरच्या आंदोलनात 'जुनी' शिवसेना एकटवली; बाळासाहेबांच्या स्टाईलने ट्रकवर उभं राहून नेत्यांची भाषणं
ट्रकला मंच बनवलं, बाळासाहेबांच्या स्टाईलने भाषणं, मीरा भाईंदरमध्ये सेना-मनसे एकवटली
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरुन विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्षांचं एका वाक्यात उत्तर
विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडणुकीवरुन विरोधक आक्रमक; विधानसभा अध्यक्षांचं एका वाक्यात उत्तर
Supriya Sule: सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा!
सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार असल्याचा दावा!
Embed widget