Maharashtra News Updates 13 November 2022 : तुर्कीतील इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट, 11 जण जखमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. आता असंच एक नवं अपडेट समोर आलं आहे. राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले.
आज लेखक, साहित्यिक दत्ता भगत , गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर,विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले. ज्यात या लेखकांनी काही मागण्या केल्या आहेत. सध्याचे सरकार आम्हाला पसंद नाही. तुमचेही सॅाफ्ट हिंदुत्वही आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील लेखकांनी राहुल गांधींसमोर मांडली.
माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलं की, आम्ही आमची भूमिका आधी तपासली. देशात जे सध्या चालू आहे त्यावरुन आम्ही एक निवेदन केलं. आम्ही राहुल गांधींना सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेबाबतही बोललो. शिक्षण उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. केंद्र आणि राज्य दोन्हीकडून शिक्षणासाठी किमान 10 टक्के वाटप करणे ही आपल्या तरुणांची आणि मुलांच्या भविष्याची आणि भविष्याची गरज आहे, असा विचार करून समर्थन करतो. शेती ही भारताची मूलभूत आणि टिकाऊ संस्कृती आहे आणि आमचे कष्टकरी शेतकरी हे आमचे "अन्नदाता" आहेत परंतु चुकीच्या आणि शोषणात्मक धोरणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्यांची चिंताजनक संख्या चुकीची आणि शेतकरी विरोधी धोरणे दर्शवते. आमच्या लेखकांनी शेतकर्यांचे दु:ख आणि त्यांचा दैनंदिन संघर्ष बळजबरीने मांडला. कारण आपल्यापैकी बरेच जण आधी शेतकरी आणि नंतर लेखक आहेत आणि त्यांना खूप काळजी वाटते. आम्हाला आशा आहे की भविष्यात या कृषी समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी समर्थक धोरणे चांगली असतील. शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आम्ही अशा उपायांचे जोरदार समर्थन करतो, असं देशमुख यांनी म्हटलं.
मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती! केंद्रीय पथकाकडून सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठिकाणी पाहणी
मुंबईकरांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण मुंबईमध्ये गोवर रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत गोवर उद्रेकाची स्थिती असल्याचं समोर आल्यानंतर केंद्राकडून देखील दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय पथकाकडून आज गोवरचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या एम-पूर्व विभागात जात ठिकठिकाणी पाहणी करण्यात आली. उद्या देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात जात पाहाणी आणि आढावा घेतला जाणार आहे.
गजानन कीर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि देसाई यांच्याकडे स्थानिक लोकाधिकार समितीचे अध्यक्षपद
मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात अपघात, खासगी बसला ट्रकची धडक
मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात अपघात...
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात..
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला ट्रकची धडक..
अपघातात बसमधील प्रवासी जखमी, ट्रकचालक आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी....
जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी
रायगड - मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात अपघात
रायगड -
मुंबई - पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटात अपघात...
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात..
पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खाजगी बसला ट्रकची धडक..
अपघातात बसमधील प्रवासी जखमी, ट्रकचालक आणि बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी....
जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी ..
Istanbul Blast : तुर्कीतील इस्तंबुलमध्ये बॉम्बस्फोट, 11 जण जखमी
तुर्कीतील सर्वात मोठं शहर असलेल्या इस्तंबुलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. इस्तंबुलमधील तक्सिम चौकात हा स्फोट झाला असून त्यामध्ये 11 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
बेगाने शादी में अब्दूलला दिवाना, मुख्यमंत्र्यांवर आव्हाड यांची टीका
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे कळवा खाडी पुलाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे काही वेळात हे लोकार्पण होईल त्या आधी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कार्यक्रम स्थळावर आले ..यावेळी त्यांनी या पुलाच लोकार्पण होतय याचा आनंद आहे ..पुल बनून तयार होता मात्र लोकार्पण झाला नव्हत आज होतय..लोकांना माहीत आहे कुणी पाठपुरावा केलाय ...पुलाच्या दोन्ही बाजूने झालेल्या बॅनर बाजी बाबत बोलताना आव्हांड यांनी श्रेय घ्यायचे नाही मात्र लोकांना माहीत आहे काम कुणी केलंय अस म्हणत फिल्मी स्टाईलने बेगाने शादी में अब्दूलला दिवाना असा टोला नाव घेता मुख्यमंत्र्यांना लगावला