एक्स्प्लोर

Bharat Jodo : राज्यातील 250हून अधिक लेखकांचा भारत जोडोला पाठिंबा; राहुल गांधींकडे पत्राद्वारे केल्या या मागण्या...

राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज यात्रेत पाहायला मिळाले.

Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी ते काश्मीर अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील यात्रेदरम्यान एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. आता असंच एक नवं अपडेट समोर आलं आहे. राज्यातील 250हून अधिक लेखक आणि कलाकारांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांसह माजी सनदी अधिकारी आणि लेखक, कलाकार आज राहुल गांधीच्या यात्रेत पाहायला मिळाले.

आज लेखक, साहित्यिक दत्ता भगत , गणेश देवी, श्रीकांत देशमुख, जगदीश कदम, लक्ष्मीकांत देशमुख, भगवंत क्षीरसागर,विजय वाकडे, अभिजित शेट्ये यांच्यासह काही अन्य लेखकांनी राहुल गांधींशी भेटून विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच एक पत्रही त्यांना दिले. ज्यात या लेखकांनी काही मागण्या केल्या आहेत.  सध्याचे सरकार आम्हाला पसंद नाही. तुमचेही सॅाफ्ट हिंदुत्वही आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील लेखकांनी राहुल गांधींसमोर मांडली. 

माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलं की, आम्ही आमची भूमिका आधी तपासली. देशात जे सध्या चालू आहे त्यावरुन आम्ही एक निवेदन केलं. आम्ही राहुल गांधींना सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेबाबतही बोललो. शिक्षण उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. केंद्र आणि राज्य दोन्हीकडून शिक्षणासाठी किमान 10 टक्के वाटप करणे ही आपल्या तरुणांची आणि मुलांच्या भविष्याची आणि भविष्याची गरज आहे, असा विचार करून समर्थन करतो.  शेती ही भारताची मूलभूत आणि टिकाऊ संस्कृती आहे आणि आमचे कष्टकरी शेतकरी हे आमचे "अन्नदाता" आहेत परंतु चुकीच्या आणि शोषणात्मक धोरणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी आत्महत्यांची चिंताजनक संख्या चुकीची आणि शेतकरी विरोधी धोरणे दर्शवते. आमच्या लेखकांनी शेतकर्‍यांचे दु:ख आणि त्यांचा दैनंदिन संघर्ष बळजबरीने मांडला. कारण आपल्यापैकी बरेच जण आधी शेतकरी आणि नंतर लेखक आहेत आणि त्यांना खूप काळजी वाटते. आम्हाला आशा आहे की भविष्यात या कृषी समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेतकरी समर्थक धोरणे चांगली असतील. शेतकरी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आम्ही अशा उपायांचे जोरदार समर्थन करतो, असं देशमुख यांनी म्हटलं.

भारतीय राज्यघटनेचे उदात्त तत्त्वज्ञान त्याच्या प्रस्तावनेत समाविष्ट केलेले स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व आणि न्याय - सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रत्येक भारतीयाला पूर्ण हमी देते कारण आपली राज्यघटना "आम्ही, भारतीय" लोकांसाठी तयार केली गेली आहे आणि त्यांना समर्पित आहे. संविधानाने आम्हाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार दिले आहेत, जे आता धोक्यात आहेत. केंद्र सरकारची धोरणे आणि केंद्रीय यंत्रणांच्या उघड गैरवापरामुळे आम्हा लेखकांना गुदमरल्यासारखे वाटत आहे. आमच्या कलात्मक अभिव्यक्तीसाठी आम्हाला मुक्त वातावरण आवश्यक आहे आणि ते प्रदान करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सर्व महान लोकशाही त्यांच्या वैज्ञानिक, लेखक आणि कलाकारांना त्यांचे प्रतीक मानतात. महान लोकशाही राष्ट्रांच्या यादीत आपले स्थान मिळवण्यासाठी भारताला ते जोपासण्याची गरज आहे. याबाबत योग्य धोरणांची अपेक्षा आहे, असंही या पत्रात म्हटलं आहे. 

पत्रात नेमकं काय म्हटलंय....

देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळाने सर्व भारतीयांसमोर समता, आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, समतोल लोकशाहीचे स्वप्न ठेवले होते. यात आपल्याला तत्कालीन जगातील नवजात लोकशाही राष्ट्रांच्या तुलनेत चांगले यश आले हे नाकारता येणार नाही;तथापि गेल्या काही वर्षातील एकूण घटनाक्रम लक्षात घेतला तर आपण जे काही मिळवले आहे आणि भारतीय संविधानाला एकनिष्ठ राहून जे काही मिळवणे अपेक्षित आहे, ते मिळवण्यात काही मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढल्याचे दिसून येते. त्याला अनेक कारणे आहेत. एकाबाजूने जागतिकीकरणाचा वाढता रेटा, त्यातून निर्माण झालेला भयावह चंगळवाद आणि विवेकनिष्ठ बुद्धिवादाचा लोप होऊन सतत वाढणारे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक अराजक ही या काळाची अ-लोकशाही देण आहे. 

अलीकडच्या काळात काही कालबाह्य, असहिष्णू सांस्कृतिक भ्रम निर्माण करुन त्याचे नवे आदर्श समोर मांडण्याचा सतत उद्योग केला जाताना दिसतो आहे. मुळात संस्कृती हे वर्चस्वाचे हत्यार नसून सहजीवनाचा आत्मा आहे, या मूल्याचा रीतसर विसर पाडला जात आहे. संस्कृती हीच असते, जी मानवमुक्तीचे साधन बनते, ही भावना नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाताना दिसतो आहे. या विकृतीकरणाचा संसर्ग वाडी, वस्त्या, तांडे, खेड्यांपर्यंत सर्वदूर पोचायला सुरवात झाली आहे. आपली सर्वस्तरिय बहुविधता नाकारुन एका एकेरी तथाकथित संस्कृतीचे निर्माण निर्ममतेने करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्याच गोष्टी समाजिक विघटीकरणाला आमंत्रण देणाऱ्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर नीट विचार करू पाहणाऱ्या संवेदनशील घटकांचा खरा कस याच काळात लागतो . लेखक, कवी, चित्रकार आणि एकूणच कलावंत या काळात काय करतात, कोणती भूमिका घेतात यावर समाजाचे भवितव्य अवलंबून असते. अशा काळात कलावंत शांत बसला तर तो त्याला स्वतःला माफ करू शकत नाही. कलावंतांसाठी सर्वात मोठा अवमान कोणता असेल तर तो म्हणजे, स्वतःच्याच नजरेतून उतरणे. सेल्फ रिस्पेक्ट गमावणे यापेक्षा दयनीय अवस्था संवेदनशील व्यक्तीची असू शकत नाही. एकूण भारतीय जनवादी परंपरा समजून घेऊन वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे आवाहन करीत आहोत. 

'भारत जोडो' यात्रा  महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन पोहोचली, तेव्हा नांदेडच्या काही लेखक-कलावंत मंडळींना जाणवू लागलं की, आता हे अभियान केवळ एखाद्या राजकीय पक्षाचे आंदोलन उरले नसून, सर्वसामान्य जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ती आता एक लोक चळवळ होऊ पाहते आहे. बाबा आमटेंच्या 1986 सालच्या 'भारत जोडो' उपक्रमाच्या स्मृती या निमित्ताने जाग्या झाल्या. या अभियानात देशभरातील तरुण तरुणी सौहार्दतेसाठी सहभागी झाले होते. खऱ्या देशभक्तीचे संवेदन नेमके काय असते हे या निमित्ताने पाहायला मिळते.  

कारणे कुठलीही असोत पण गेल्या काही वर्षात जात, धर्म, वंश, लिंग इत्यादी विविध घटकांचा आधार घेत भारतीयांच्या संवादपूर्ण जीवनशैलीला तडे जाऊन परस्परांविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे समाज आतून अस्वस्थ होताना दिसतो आहे.  विद्यमान भारत जोडो आंदोलनामुळे या अस्वस्थतेला, जनतेच्या  उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एक स्वतःचा आवाज मिळत चालला आहे.  निरीक्षणाअंती असे जाणवल्यामुळे मराठी साहित्यिक-कलावंत यांचं मानस जाणून घेण्यासाठी आम्ही 22 ऑक्टोबर रोजी आमची भूमिका विशद करणारे एक निवेदन समाज माध्यमावर प्रकाशित केले. अवघ्या पाच दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अत्यंत प्रथितयश लेखक, कवी आणि नवोदित तरुण कलावंतांचा, बुद्धिवंतांचा प्रतिसाद त्याला मिळाला. खरे तर आम्हालाही एवढ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. 

भारत जोडो यात्रा आता नांदेड मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करीत असल्यामुळे या अभियानात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी लेखक,कलावंतांना काय करता येणे शक्य आहे याचा तपशील आम्ही सादर केला.  'भारत जोडो साहित्य दिंडी,' हे शीर्षक आम्ही हेतुपूर्वक निवडले आहे, ज्याचा संबंध महाराष्ट्री सहिष्णू परंपरेशी आणि मराठी मातीशी आहे. या उपक्रमात आपला सहभाग वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो. भारत जोडो साहित्य दिंडीला, प्रतिसाद देताना प्रशासन व्यवस्थेवर कुठलाही अतिरिक्त ताण पडू नये याची संपूर्ण काळजी लेखक,कवींना घेणे आवश्यक आहे. पूर्ण सनदशीर मार्गानेच कलावंतांनी व्यक्त व्हावे.

प्रत्यक्ष सहभागासाठी आपापले निवासी गाव सोडून प्रवास करावा असे काहीही नाही. तर आपण जिथे असाल तिथेही आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकाल. आपल्या गावातील, जिल्ह्यातील साहित्यिकांनी एकत्र जमून एखाद्या स्मारकापासून आपल्या दिंडीची सुरवात करावी. दिंडीत आपण समता, मानवता यांचा पुरस्कार करणारी गीते, कविता सादर करावीत, लेखक आणि वर्तमान किंवा अन्य महत्वाच्या विषयावर प्रकट व्हावे, समूहचर्चा करावी. आपल्या उपक्रमाची माहिती समाजमाध्यमे आणि दैनिकातून द्यावी, जेणे करून लोक आपल्याशी जोडले जातील याची काळजी घ्यावी. 

'भारत जोडो साहित्य दिंडी' चे स्वरूप कुठल्याही अर्थाने व्यक्तिकेंद्री नसून कलावंतांनी आपली सांस्कृतिक जबाबदारी ओळखण्याची नितांत आवश्यकता असल्याचे नमूद करणारा हा उपक्रम आहे. सांस्कृतिक सहानुभाव वाढवा ही लेखना पेक्षाही अधिक महत्वाची जबाबदारी हे कलावंताने ओळखण्याची आवश्यकता आहे, हेच आम्ही या निमित्ताने सांगू इच्छितो.
लेखक, कलावंतआपल्या पातळीवर- आपल्या शहरात- गावात हा उपक्रम राबवताना हेच शीर्षक घेऊनही कार्यक्रम स्वतंत्रपणे करू शकतील.

हा उपक्रम कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही,हे कृपया ध्यानी घ्यावे. आपली भूमिका ही व्यापक मानवतावादी आहे, ती सहिष्णुता आणि सहजीवनाचा, विविधतेचा सन्मान करते. त्याला जो विचार नकार देतो, तो संस्कृतीशी निगडित नाही, असे आम्ही मानतो. नांदेड पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला राज्याच्या विविध भागातील लेखकांनी खूप उत्तम असा प्रतिसाद दिला. त्याची खूप मोठी यादी करता येईल.देशभरातील अनेक साहित्यिक, कलावंतांनी आपल्या सोबत असल्याचे कळविले आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत, असं पत्रात म्हटलं आहे.

या लेखक, साहित्यिक अन् कलाकारांनी दिला पाठिंबा

प्रा.वसंत आबाजी डहाके(अमरावती)कवी तथा माजी अध्यक्ष ,अ.भा.मराठी साहित्य संमेलन।
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले(पुणे) लेखक तथा माजी अध्यक्ष अ.भा.म.सा.संमेलन।
प्राचार्य रा.रं.बोराडे(ज्येष्ठ साहित्यिक)
प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील(माजी अध्यक्ष, मराठी साहित्य महामंडळ)।अनुराधा पाटील(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री)
प्रा.फ.मुं.शिंदे(ज्येष्ठ कवी तथा माजी अध्यक्ष, अ.भा.म.साहित्य संमेलन)
डॉ.लीला शिंदे (ज्येष्ठ बालसाहित्यिक-औरंगाबाद)।
संदेश भंडारे-ज्येष्ठ छायाचित्रकार(मुंबई)।
प्रा.राजन गवस साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक-कोल्हापूर)।
सुमती लांडे(ज्येष्ठ प्रकाशक-श्रीरामपूर)।
प्रवीण बांदेकर(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक)
डॉ.गोविंद काजरेकर(ज्येष्ठ कवी -सावंतवाडी)।
लक्ष्मीकांत देशमुख।ज्येष्ठ लेखक तथा माजी अध्यक्ष क.भा.म.साहित्य संमेलन)
श्रीपाल सबनीस(ज्येष्ठ विचारवंत तथा माजी अध्यक्ष अ.भा.म.साहित्य संमेलन)
महावीर जोंधळे(ज्येष्ठ लेखक-पुणे)
इंदुमती जोंधळे(ज्येष्ठ लेखिका-पुणे)।
प्रा.सदानंद देशमुख(साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक-बुलढाणा)।प्रा.भु.द.वाडीकर(ज्येष्ठ समीक्षक)
प्रा.मधूकर राहेगावकर(ज्येष्ठ लेखक)।
निर्मलकुमार सूर्यवंशी(ज्येष्ठ प्रकाशक-नांदेड)
प्रा.भगवंत क्षीरसागर(ज्येष्ठ कवी,अनुवादक-नांदेड)| 
किरण सगर (ज्येष्ठ कवी-उमरगा)।
बालाजी सुतार (कथालेखक, कवघ-अंबाजोगाई)।
डॉ.गणेश मोहिते(कवी-समीक्षक-बीड)।डॉ.पी.विठ्ठल(कवी-समीक्षक-
नांदेड)
आनंद कल्याणकर(लेखक, पत्रकार-नांदेड)।
डॉ.सूर्यनारायण रणसुभे(ज्येष्ठ लेखक-अनुवादक-लातूर)
डॉ.शेषराव मोहिते(ज्येष्ठ लेखक तथा अध्यक्ष मराठवाडा साहित्य संमेलन)
डॉ.नागोराव कुंभार(ज्येष्ठ लेखक,विचारवंत-लातूर)।डॉ.प्रमोद मुनघाटे(ज्येष्ठ लेखक-नागपूर)
अरुणा सबाणे(ज्येष्ठ लेखिका, सामाजिक कार्यकर्ती-नागपूर)
लोकनाथ यशवंत(ज्येष्ठ कवी,अनुवादक-नागपूर)।
स्वाती शिंदे-पवार (वक्ता,कवयित्री-सांगली)।डॉ.श्रीराम गोविंद गव्हाणे(ज्येष्ठ कवी,संपादक-नांदेड)।प्रा.नारायण शिंदे(कवी,कथालेखक-नांदेड)
प्रा.अनमोलसिंग कामठेकर(कवी-नांदेड)।
बापू गायकर(कवी-पत्रकार,लोहा)।
श्रीरंग ढेरंगे(ज्येष्ठ कवी अहमदनगर)।
शिवा आंबुलगेकर।(कवी,लेखक-नांदेड)
डॉ.शंकर विभुते(ज्येष्ठ कथाकार, समीक्षक-नांदेड)
डॉ.उत्तम सावंत(ज्येष्ठ इतिहास संशोधक-नांदेड)।
संजय देशमुख(कवी-नांदेड)
मनोहर बसवंते(कवी-नांदेइ)।
हनुमान व्हरगुळे(कवी)
अन्ना जगताप(कवी-हिंगोली)।
प्रा.आत्माराम राजेगोरे( कवी,कथाकार)
डॉ.अजय गव्हाणे(लेखक-नांदेड)।
प्रा.उत्तम बावस्कर(ज्येष्ठ कथालेखक औरंगाबाद)।
डॉ.रमेश चिल्ले(ज्येष्ठ कवी-लातूर)।
दिगंबर कदम।(कथाकार)
डॉ.तुकाराम बोकारे(लेखक-नांदेड)।
दगडू लोमटे(कवी,सामाजिक कार्यकर्ता-अंबाजोगाई)।
डॉ.शोभा रोकडे(ज्येष्ठ कवयित्री-अमरावती)।डॉ.जे.टी.जाधव(लेखक,विचारवंत-भोकर)।
डॉ.महेंद्र कदम।(ज्येष्ठ लेखक,कवी-सोलापूर)
ह भ प संजय चौधरी ।
प्रा.संजय साठे (लेखक-सोलापूर) 
श्रीरंजन आवटे।(लेखक-कवी)
पुरूषोत्तम सदाफुले।(ज्येष्ठ कवी-पुणे)।
डॉ.माधव जाधव(कथालेखक आखाडा-बाळापूर)।
डॉ.भारत कचरे(लेखक-नांदेड)।
विजय वाकडे।(ज्येष्ठ लेखक- कळमनुरी)
बबन शिंदे।(बाल साहित्यिक कळमनुरी)।श्रीनिवास मस्के(रानकवी-नांदेड)
डॉ.अनंत राऊत।(समीक्षक-लेखक)
डॉ.व्यंकट पावडे।(समीक्षक)
अनुरत्न वाघमारे।(कवी)
अँड.भीमराव हटकर(कवी,विचारवंत-नांदेड)।प्रा.नागोराव उतकर(कवी-देगलूर)।
डॉ.मारोती कसाब(कवी-समीक्षक,
अहमदपूर)।
अशोक कुबडे(कवी,कवीकट्टा संयोजक)
डॉ.गणेशराज सोनाळे(ज्येष्ठ कवी-नांदेड)।
डॉ.ज्ञानदेव राऊत(समीक्षक)
डॉ. जयद्रथ जाधव(कवी-समीक्षक-लातूर)।राधेश्याम बलदवा(ब्लॉग लेखक-बारड)।
डॉ.संजय जगताप।(कवी)
राम शेळके(कवी-नांदेड)।
डॉ.नागनाथ पाटील(ज्येष्ठ लेखक-वसमतनगर)।
रवि केसकर(ज्येष्ठ कवी-उस्मानाबाद)।
दिगंबर क्षीरसागर।(कवी)
विवेक मोरे।(कवी)
ऋषिकेश कोंडेकर(कवी- नांदेड)।प्रा.जयप्रकाश पाटील(कवी-गायक-हिंगोली)।मोतीराम राठोड(ज्येष्ठ लेखक-नांदेड)।
प्रा.संध्या रंगारी।(ज्येष्ठ कवयित्री)
रमेश कदम (कथालेखक-आकाशवाणी वार्ताहर-आखाडा बाळापूर)।कोंडदेव हटकर(कवी)
बालाजी चौधरी(कवी-नांदेड)। 
बाबाराव मुसळे(ज्येष्ठ लेखक-वाशिम)।
डॉ.अनिल काळबांडे (कवी-समीक्षक,उमरखेड)।प्रा.रविचंद्र हडसनकर(ज्येष्ठ कवी,गीतकार-नांदेड)
डॉ.बाळू दुमगुडवार(कवी-नांदेड)।पांडुरंग बोराडे(कवी-वसमतनगर)।साईनाथ रहाटकर(कवी)।सी.आर.पंडित(कथालेखक-नांदेड)।
गणपत माखणे(कवी-आखाडा-बाळापूर)।व्यंकट सूर्यवंशी(कवी-उदगीर)।
मधू गिरी (ज्येष्ठ कवी-नाशिक)।
धवल घोनशीकर।(चित्रपट दिग्दर्शक-मुंबई)
राजू रणवीर(कवी-मुंबई)।
डॉ.कैलास अंभुरे(ज्येष्ठ समीक्षक-औरंगाबाद)।
आनंद पुपुलवाड(कवी-कथाकार,नांदेड)
ऋषिकेश देशमुख (समीक्षक-देगलूर)।
जगदीश जोगदंड।(कवी,पत्रकार-पुर्णा)
प्रा.रामचंद्र भुसारे(व्याख्याता-पुर्णा)।संजीवनी मांडे- क्षीरसागर(कवयित्री-मुंबई)।
अरुणा दिवेगावकर(कवयित्री)
संजय घाडगे(कवी,लातूर)।
शिवाजी जाधव(कवी-नायगाव)।शशीकांत हिंगोणेकर(ज्येष्ठ कवी -जळगाव)।
प्राचार्य आनंद कदम(ज्येष्ठ साहित्यिक)
डॉ.कविता सोनकांबळे(लेखिका-नांदेड)।वंदना सोनाळकर(लेखिका, विदुषी-औरंगाबाद)
डॉ.रामचंद्र काळुंखे(समीक्षक-औरंगाबाद)।जयाजी पाईकराव(लेखक-कळमनुरी)।डॉ.संगीता आवचार (कवयित्री-परभणी)।
रवींद्र बेडकिहाळ
(कवी,पत्रकार-सातारा)

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Embed widget