एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : ज्यांनी टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार, पाहा नेमकं काय म्हणाले फडणवीस

एकनाथ शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं.

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे हे सेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्यावर ज्या सदस्यांनी विश्वास टाकला त्यांचे आभार मानतो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसेच ज्या सदस्यांनी प्रस्ताव बहुमतानं पारीत व्हावा यासाठी अप्रत्यक्षपणे सभागृहाच्या बाहेर राहून सहकार्य केलं, त्या अदृश्य 'हातांचे' मी आभार मानत असल्याचा टोला देखील फडणवीस यांनी केलं. एकनाथ शिंदे हे 24 बाय 7 काम करणारा नेता आहे. शिंदे हे प्रचंड माणुसकी असणारा, सामान्य जनतेसाठी जीवाची परवा न करता काम करणारा नेता असल्याचे म्हणत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच ज्यांनी माझी  टिंगल केली, अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे. माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं असेही फडणवीस म्हणाले. 

मी त्यांना माफ केलं

हे सरकार टीकणार नाही असे मी म्हणत होतो. कारण ही आघाडी अनैसर्गिक झाली होती. त्यावेळी मी म्हणाल होतो की मी पुन्हा येईल. त्यानंतर लोक माझी टिंगल टवाळी करत होते. काही जणांनी माझा अपमान केला. पण मी परत आलो, पण येताना यांनाही घेऊन आलो असे ते म्हणाले. एकटा नाही आलो मी यांना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगल, टवाळी केली, त्यांचा सर्वांचा मी बदला घेणार आहे असल्याचे फडणवीस म्हणाले. माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं असे फडणवीस म्हणाले.   

विरोधात असानाही आम्ही संघर्ष केला

राजकारणात काही गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात. हर एक का मौका आता है. 'दुनिया के सारे शौक पाले नही जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नही जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नही जाते'. असा शेअर देखील ते सभागृहात म्हणाले. आमच्याकडे बहुमत असताना आम्हाला विरोधात बसावे लागले. आम्ही सातत्यानं संघर्ष केला. जनतेचे प्रश्न मांडले. जनतेमध्ये राहिलो असेही फडणवीस म्हणाले.

सत्ता हे आमचं साध्यच नाही

काही लोकांना असे वाटायचे की आम्ही सत्तेसाठी काही करतो. पण आमचा विचार सांगतो की, सत्ता हे आमचं साध्यच नाही ते आमचं साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक बदल करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. मी सांगितले होते की ज्यावेळी सरकार जाऊल त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ.  आणचे नेते पंतप्रधान मोदी यांनी दाखवून दिलं की आमच्यासाठी सत्ता महत्वाची नाही. आमचं मत एवढच होत की जनतेनं आम्हाला कौल देऊनही
ते हिरावून नेण्याचा प्रयत्न केला. आम्हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा सैनिकाला मुख्यमंत्री बनवू हे दाखवून दिलं. जनतेनं जे शिवसेना भाजपला कौल दिला त्याचा आम्ही सन्मान केल्याचे फडणवीस म्हणाले.  

सत्ता येते आणि जाते, त्याचा अहंकार येता कामा नये असेही फडणवीस म्हणाले. प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की जो निवडून येतो, त्याला परत पाच वर्षानंतर परिक्षा द्यावीच लागते. कोणीही असो प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं कारण परत लोकांना उत्तर द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले. आमचं सरकार कोणत्याही बदल्याच्या भावनेनं काम करणार नाही. मागच्या सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करु असेही ते म्हणाले. या संपूर्ण वाटचालीत एक सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Embed widget