एक्स्प्लोर

हेल्मेट घातल्यावरच बाईक सुरु, औरंगाबादमधील तरुणाचं संशोधन

औरंगाबाद : हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीवरून सध्या राज्यात बरीच चर्चा झाली. अगदी हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही इथपर्यंत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या विद्यार्थ्यानी विकसित केलेली एक यंत्रणा चर्चेत आहे. हेल्मेट न घातल्यास दुचाकी सुरुच होणार नाही, अशी यंत्रणा या विद्यार्थ्याने शोधलीय. रोहित पाटसकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हेल्मेट घातले नाही तर दुचाकीचं इंजिन सुरूच होत नाही. इतकेच नव्हे, तर गाडी चालवताना हेल्मेट काढल्यास गाडीही बंद पडते, अशी यंत्रणा औरंगाबादच्या विद्यार्थ्यानी शोधली आहे. ‘वायरलेस हेल्मेट इग्निशन सिस्टिम’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पासाठी हेल्मेटसह एक हजार रुपये खर्च आला आहे. रोहित पाटसकर इंडोजर्मन टुलरूम औरंगाबाद या महाविद्यालयात इंजीनियरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेतो आहे. त्याने हा प्रकल्प तयार केला आहे. रोहितने प्रवास करताना एक अपघात पहिला. अपघातात मृत व्यक्तीन हेलमेट घेतले नव्हते. त्यामुळे त्याचा जीव गेला. त्याने पुढे अशा अपघातात कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून हा प्रयोग केला. हेल्मेट घातल्यावरच बाईक सुरु, औरंगाबादमधील तरुणाचं संशोधन ‘वायरलेस हेल्मेट इग्निशन सिस्टिम’ कशी चालते? या यंत्रणेमध्ये हेल्मेटच्या वरच्या भागात एक स्विच बसवण्यात आला आहे. हेल्मेट घातले की स्विच दाबले जाऊन सर्किट पूर्ण होते. त्यानंतर त्यातून एफएम वेव्हज बॅटरी आणि इग्निशन कॉइलमध्ये बसवलेल्या रिसिव्हरकडे पाठवण्यात येतात. रिसिव्हर ते रिसिव्ह करून त्याचे विजेत रुपांतर करतो. तिथे जोडलेला रिले या लो करंटचे हाय करंटमध्ये रूपांतर करून इग्निशन कॉइल सुरू करतो आणि त्याद्वारे टू व्हिलर सुरू होते.  औरंगाबादच्या पोलिस आयुक्तांकडून कौतुक  किक स्टार्ट आणि बटण स्टार्ट या दोन्ही प्रकारच्या गाड्यांमध्ये ही यंत्रणा वापरता येते. केवळ गाडी सुरू करतानाच नव्हे, तर गाडी सुरू असतानाच हेल्मेट काढल्यासही सर्किट ब्रेक होऊन गाडी बंद पडते. या प्रयोगाचं ओरंगाबाद पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतुक केले आहे. हेल्मेट आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्मेट नसताना अपघात झाल्यास थेट मेंदूला इजा होऊन गंभीर दुखापतीची शक्यता असते. हेल्मेटसक्ती केली गेली, तरी अनेक जण हेल्मेट टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवताच येणार नाही हा जालीम उपाय या विद्यार्थ्याने शोधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
Maharashtra Live blog updates: अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला, जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
Prithviraj Chavan: आंदोलनामुळे मोदी पॅनिक झाले, त्यांना नमतं घ्यावं लागलं; 'बिगिनिंग इज द एंड'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
आंदोलनामुळे मोदी पॅनिक झाले, त्यांना नमतं घ्यावं लागलं; 'बिगिनिंग इज द एंड'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मोदी-शाह अजेय नाहीत, ते देखील जातील; प्रधानांची विकेट पडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, मोदी-शाह अजेय नाहीत, ते देखील जातील; प्रधानांची विकेट पडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis and Dharmendra Pradhan Resignation: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताच महाराष्ट्रात मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीतून बोलावणं

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Bihar Student Protest: 'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
'पेपर चोर, गद्दी छोड..' दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन पेटलं; सिवानमध्ये 10 राऊंड फायरिंग, 8 जिल्ह्यात दगडफेक, बंदला हिंसक वळण
NEET Maharashtra Protest: वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
वर्षा बंगल्यावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात, मंत्रालय परिसरात कडक सुरक्षा; मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या सुरक्षेत वाढ, निवासस्थानी सुद्धा बंदोबस्त; सरकारच्या निर्णयावर संजय राऊतांची खोचक टिप्पणी
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Embed widget