एक्स्प्लोर

फडणवीसजी, लोडशेडिंगबाबतचा ‘हा’ व्हिडीओ आठवतोय का?

आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात भाजप सरकारने लोडशेडिंग लागू केलं आहे. त्यानंतर फडणवीसांचा हा जुन्हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई : राजकीय नेते विरोधात असताना दिलेली आश्वासनं सत्तेत आल्यानंतर विसरतात, हे काही नवीन नाही. हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडलंय. फडणवीस विरोधात असताना अत्यंत आक्रमकपणे आघाडी सरकारने केलेल्या लोडशेडिंगविरोधात बोलत होते आणि लोडशेडिंगमुक्तीसाठी भाजपकडे सत्ता देण्याचं आवाहन करत होते. फडणवीसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधात असताना फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
"महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात अजूनही लोडशेडिंग आहे. शेतकऱ्याला वीज मिळत नाही. त्याच्या शेतामध्ये पाणी आहे, पण वीज नाही. त्यामुळे तो सिंचन करु शकत नाही. आज मुलं शिकू शकत नाहीत. महाराष्ट्राची स्थापित क्षमतेच्या केवळ 50 टक्के आम्ही जनरेशन करतो. कारण आम्हाला महागडी वीज विकत घ्यायचीय. खासगी लोकांची. आणि मग महागड्या दराने वीज द्यायची. लोडशेडिंग करायचं. आणि हजारो कोटी कमवायचे. कोळशाचा घोटाळा करायचा. खरेदीचा घोटाळा करायचा. या सगळ्या घोटाळ्यातना महागडी वीज महाराष्ट्राला घ्यावी लागतेय. आणि त्याचसोबत महाराष्ट्राला लोडशेडिंग सहन करावं लागत आहे. आता कुठेतरी महाराष्टाला अंधकार देणाऱ्यांना दूर करु आणि महाराष्ट्रात प्रकाश आणू शकतील, अशांना महाराष्ट्राची सूत्र देऊ, हेच आपल्याला ठरवायचंय." - देवेंद्र फडणवीस 
हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस विरोधात होते, त्यावेळीचा आहे. फडणवीस त्यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रभरात भाजप सरकारने लोडशेडिंग लागू केलं आहे. त्यानंतर फडणवीसांचा हा जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यातून फडणवीसांची आश्वासनं किती फोल ठरली आहेत, हे दिसून येते. व्हिडीओ : महाराष्ट्रात सध्या विजेची काय स्थिती? वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचे लोडशेडिंग सुरु झालं आहे. त्यामुळे ऐन ऑक्टोबर हीटमध्ये लोकांचा चांगलाच फटका बसला आहे. शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे. भांडुप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज लोडशेडिंग लागू करण्यात आलंय. कालपासून हे लोडशेडिंग लागू झालंय. राज्यात २२०० ते २३०० मेगावॉटचे लोडशेडिंग होत असल्यानं कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आलीय.  लोडशेडिंगचं संकट वाढत आहे. आणि दिवाळीवरही लोडशेडिंगचे सावट आहे. त्यामुळे मिळेल तेवढी महागडी वीज खरेदी करण्यासाठी महावितरचण कंपनीची धावपळ सुरु आहे. संबंधित बातम्या : ठाणे, नवी मुंबईसह महानगरांत भारनियमन सुरु कोळशाचा तुटवडा, राज्यात तब्बल 14 तासांपर्यंत भारनियमन
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget