एक्स्प्लोर

परिस्थिती बिकट आहे, कुणी राजकारण करू नका : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या बिकट परिस्थितीत कुणीही राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्र परिषदेत बोलत होते.

कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि धरणांमधील विसर्गामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पूरग्रस्तांना युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे. मात्र या बिकट परिस्थितीत कुणीही राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री पत्र परिषदेत बोलत होते. विरोधकांनी काही चुका होत असले तर लक्षात आणून द्याव्या. ते लोकांत गेले असताना मला राजकारण होताना दिसून आले, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले की, निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारकडे नसतो. निवडणूक आयोग त्यावर नक्की विचार करेल. यावेळी मदत करताना कुणी कुणाचेही फोटो लावून मदत देऊ नये, असेही ते म्हणाले. आलमट्टीबाबत कर्नाटक सरकारशी बोलणे चालू आहे. कर्नाटक सरकारची आपल्याला मदत मिळत आहे. दोन्ही सरकारमध्ये समन्वय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सांगलीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने स्थिती बिकट झाली. पूर काळात सांगलीत 93 बोटी काम करत होत्या. सांगलीत 101 गावातून 21 हजार 500 कुटूंब आणि 1 लाख 43 हजार लोक विस्थापित आहेत. तर ब्रम्हनाळमध्ये 12 लोक मृत्यमुखी पडली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मृतांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत   या पुरात मृत पावलेल्यांच्या मृतांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा  फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच जनावरं गमावलेल्या आणि जमिनीचे नुकसान झालेल्यांना देखील मदत केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. ही मदत देताना कमीत कमी पुराव्याच्या आधारे दिली जाणार  आहे, असेही ते म्हणाले.  आधी सात दिवस ज्या भागात पाणी होतं तिथं मदत करावी असा जीआर होता, तो आम्ही दोन दिवसावर आणला आहे, मात्र त्यातही गरजेनुसार मदत करण्याच्यासूचना केल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुरग्रस्तांना 10 हजार आणि 15 हजार मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व रक्कम कॅशमध्ये देण्याचं शक्य नाही मात्र गरजेनुसार पैसे देण्याचे आदेश दिले आहेत, असेही ते म्हणाले. सरकारने पूरग्रस्तांसाठी 153 कोटी रुपये दिले आहेत. या आपदेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या परिवाराला पाच लाख, अपंगत्व आलेल्यांना दोन लाख तर ज्यांचे घर पडले आहे त्यांना एक लाख रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.  तर शेतीतील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टरी 13 हजार रुपयांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या आपत्तीमध्ये 12 लोकं  मृत्यूमुखी पडले असून 8 जण बेपत्ता तर दोनजण जखमी आहेत. तर 27 हजार 467 एकर जमिनीवरील पिक नष्ट झाले आहे. पुरामुळे  484 किलोमिटरचे रस्ते खराब झाले आहेत अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - 27 हजार 467 हेक्टर जमीन पीक नष्ट झाली - विद्युत विभागाचे 2,615 रोहित्र खराब - 306 छावणीमध्ये लोक स्थलांतरीत - यापूर्वी 2-4 हजार मदत मिळत होती, आता 12 ते 15 हजार देत आहोत - पाणी आता ओसरत आहे, पुढचे रिलीफ ऑपरेशन सुरू असून 100 डॉक्टरांची टीम पोहोचेल - 13 हजार प्रति हेक्टर शेतातील गाळ काढण्यासठी दिले जातील - आकस्मित निधीतून निधी उपलब्ध करून देत असून निधी कमी पडू देणार नाही - मदत करणाऱ्यांनी गावं दत्तक घ्यावीत - सिद्धीविनायक, शिर्डी, पंढरपूर संस्थन, आर्ट ऑफ लिव्हिग आशा अनेक संस्था मदत करणार आहेत - आलमट्टीबाबत कर्नाटकशी बोलणे चालू - 4 लाख च्या वर विसर्ग सुरू होतो, असे कर्नाटक cm म्हणाले
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray on Ashok Kharat Case: देवेंद्र फडणवीस, धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा अन्...; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
देवेंद्र फडणवीस, धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा अन्...; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा ZP राड्यावरून विधान परिषदेत वातावरण तापलं; पोलीस अधीक्षकांचे निलंबन, तर...
सातारा ZP राड्यावरून विधान परिषदेत वातावरण तापलं; पोलीस अधीक्षकांचे निलंबन, तर...
मोठी बातमी : भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका
मोठी बातमी : भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election : मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
मोठी बातमी : भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका
मोठी बातमी : भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
Ahilyanagar Crime Adinath Maharaj: तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Embed widget