एक्स्प्लोर

...म्हणून लोकांना वाटतं नालायक सरकार आहे, मुख्यमंत्री विरोधकांवर गरजले

मुंबई : समृद्धी हायवे किंवा बुलेट ट्रेनवर टीका करणाऱ्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. “आपल्याला रस्त्याने यावं लागत नाही, आपल्यासाठी विमानाची सोय आहे. हा लोकांसाठीचा रस्ता आहे.”, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. “समृद्धी हायवेसाठी आम्ही 40 हजार कोटी आणि बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी सरकार खर्च का करता, असं तरुण आणि उमदे नेते विचारत आहेत. लोकांना वाटतं काय नालायक सरकार आहे. इतके पैसे खर्च करत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी पैसे नाही. पण नारायण राणेंना विचारा, त्यांचा अर्थकारणावर अभ्यास चांगला आहे. आपल्याला रस्त्याने नाही यावं लागत, आपल्याला विमानाची सोय आहे. हा लोकांसाठीचा रस्ता आहे.” असं उत्तर विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी दिले. “सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना पराभूत व्हावं लागलं. त्यानंतरच कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला. EVM मध्ये घोटाळा झाला असं आम्हालाही वाटलं होतं, तुम्हाला ही वाटणार. सत्य पचवायला आणि हार स्वीकारायला वेळ लागतो. होईल सवय.”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. त्याचवेळी, कर्जमाफी लढा तुम्ही तीव्र केला, पण जिल्हा परिषद निवडणुकीत पडल्यावरच का मोठा केला?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विचारला. राज्याला पुनर्वसनापासून गुंतवणुकीपर्यंत नेले पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार नाहीत. राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आवाक झाली आणि शेतकऱ्यांना फायदा झाला. तुरीचं उत्पन्न 4.44 लाख मेट्रिक टन पासून 20 लाख मेट्रिक टन म्हणजेच पाच पटीने वाढलं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “शेतीत गुंतवणुकीवर आधारित धोरण गेल्या दोन वर्षात राज्यसरकारने आणलं. शेतकाऱ्याला पूर्वी कागदावर हमीभाव मिळत होता. मात्र, आता हे पैसे थेट शेतकऱ्यांचे खात्यात जमा होतात.” शिवाय, नोटाबंदीचा परिणाम शेतमालाच्या आवकीवर झालेला नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तुरीचं उत्पन्न पाच पटीने वाढलं. इतक्या प्रमाणात उत्पादन वाढलं, पण राज्य सरकारने तूर खरेदी केल्यामुळे भाव पडले नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्याच्या उत्पन्नात चाळीस हजार कोटींची वाढ झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका
Prakash Mahajan On Sanjay Raut Thane : संजय राऊत यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांची जीभ घसरली
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnaivs : मी आतापर्यंत संयम पाळलाय, त्यांचा संयम थोडा ढळलाय, अजित पवार 15 तारखेनंतर बोलणार नाहीत : देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं,अजित दादा बोलतात, माझं काम बोलतं : देवेंद्र फडणवीस
IND vs NZ 1st ODI : टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
टीम इंडियाचा 2026 चा श्रीगणेशा! वडोदऱ्यात भारतीय वाघांची विजयी डरकाळी, किवींचा सुपडा साफ
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
अदानी ते रसमलाई, ही आपली मुंबई; राज ठाकरेंचं घणाघाती भाषण, मराठी माणसांना त्वेषाने पेटून उठण्याचं आवाहन
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका : जयंत पाटील
मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचं मैदान जयंत पाटील यांनी गाजवलं
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Raj Thackery Video: मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल; राज ठाकरे यांचा हल्लाबोल
Gold Rate : 2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
2025 मध्ये सोन्याचे दर 65 टक्क्यांनी वाढले, 2026 मध्ये काय घडणार? तज्ज्ञ अंदाज वर्तवत म्हणाले...
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
Video: आक्रमक भाषण, दाखव रे तो फोटो, फडणवीसांची दुसऱ्यांदा मिमिक्री; शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंचीही तोफ धडाडली
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
भाजप उमेदवारासाठी मतदारांना 3 हजारांचं पाकीट, शिवसेना कार्यकर्त्यांची धाड; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
Embed widget