एक्स्प्लोर

भाजपच्या मनात महाराष्ट्रातील सत्ता गेल्याची सल; त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये : भास्कर जाधव

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे. शिवाय, राज्यात भाजपचं सरकार आलं नाही तर 2024 मध्ये केंद्रात भाजप सरकार नसेल याची देखील भाजपला कल्पना आहे, अशी टीका माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.

रत्नागिरी : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या, सचिन वाझे यांचा सहभाग आणि त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टाकलेला 'लेटर बॉम्ब' यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. विरोधक अर्थात भाजपकडून महाविकास आघाडी सरकार, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना लक्ष्य करत त्यांच्या राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. अगदी केंद्रीय तपास यंत्रणा देखील यामध्ये तपास करत आहेत. या साऱ्या प्रकरणावर आता माजी मंत्री आणि शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आली आहे. 

"महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला नाही. हीच भाजपच्या मनात सल आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात आहे. शिवाय, राज्यात भाजपचं सरकार आलं नाही तर 2024 मध्ये केंद्रात भाजप सरकार नसेल याची देखील भाजपला कल्पना आहे. हिच भाजपची दुखरी नस असून याच कारणास्तव भाजपकडून वारंवार राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जात असल्याची टीका भास्कर जाधव यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. भाजप बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरून मोठी झाली झाली असून त्यांनीही ही बाब आता ध्यानात ठेवावी. पण, त्यांनी आता त्याच वेलीला संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे." अशी आठवण देखील यावेळी त्यांनी करून दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

राणेंना जाधवांचं उत्तर

नारायण राणे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. उद्धव ठाकरे हे सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. वाझेंनी वर्षावर वास्तव्य केलं होतं. या साऱ्या प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी राणेंनी केली होती. यावर विचारले असता जाधव यांनी राणेंवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. 'काही लोकांनी मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहिली होती. मुख्यमंत्री होता न आल्यानं त्यांनी टाहो देखील फोडला होता. पण, त्यानंतर देखील ते मुख्यमंत्री झाले नाहीत. सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत हे अनेकांच्या पचनी पडत नसल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आम्हीही देत नाही आणि तुम्ही देखील देऊ नका, असं उत्तर भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांच्या रविवारच्या टीकेला दिलं आहे. 

'...मग त्यावेळी अमित शहांनी राजीनामा का नाही दिला?'

परमबीर सिंह यांच्या 'लेटर बॉम्ब'नंतर गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्याला देखील भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर वंजारा या पोलीस अधिकाऱ्यानं यापेक्षा देखील गंभीर आरोप केले होते. मग, त्यावेळी अमित शहा यांनी राजीनामा का नाही दिला? कोर्टाच्या आदेशानंतर तर अमित शहा हे 2 ते 3 वर्षे राज्याबाहेर होते. त्यामुळे भाजपनं नैतिकता शिकवू नये असं उत्तर यावेळी जाधव यांनी विरोधकांच्या मागणीला दिलं आहे. शिवाय, परमीबीर सिंह यांच्या पत्रावर सही नाही, त्यांचा मेल आयडी देखील संशयास्पद आहे. तसेच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आल्यानंतरच हे पत्र का समोर आलं? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थिती केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले

व्हिडीओ

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report
Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report
Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report
Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathi : मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
मुंबईतील मराठी शाळा वाचवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्र सरसावले, 14 डिसेंबर रोजी परिषद, ठाकरे बंधूंना निमंत्रण
Jay Pawar Photo : जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा शाही विवाह, बहरिनमधील खास फोटो समोर
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Embed widget