एक्स्प्लोर

Badlapur School Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातून उद्या मुंबईला पोहोचणार, बदलापूर प्रकरणामुळे गावचा दौरा रद्द करणार

जमावाने आधी शाळेची तोडफोड केली, त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर गाड्या रोखल्या.जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर लोकांनी दगडफेक सुरू केली.

Badlapur School Case : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येदरम्यान, ठाण्यातील बदलापूर येथील (Badlapur School Case) एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर मंगळवारी संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. जमावाने आधी शाळेची तोडफोड केली, त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर गाड्या रोखल्या.जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर लोकांनी दगडफेक सुरू केली. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. 23 वर्षीय आरोपीने 16 ऑगस्ट रोजी शाळेच्या बाथरूममध्ये मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. मुलींच्या पालकांनी एका दिवसानंतर (17 ऑगस्ट) एफआयआर दाखल केला.

पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली आहे. या भागातील महिला पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावरून उद्या मुंबईला परतणार आहेत.  बदलापूर केसमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे सातारमधील त्यांच्या दरे या मुळ गावी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पोहोचले होते.

बदलापूर बंदची घोषणा, शाळेतही निदर्शने

मंगळवारी सकाळी आठ वाजता संतप्त लोकांनी बदलापूर रेल्वे स्थानकाच्या रुळांवर उभे राहून आंदोलन सुरू केले. अनेक गाड्या थांबवण्यात आल्या. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. दुसरीकडे लोकांनी शाळेत घुसून निदर्शने करून तोडफोड केली. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे कल्याण-बदलापूर लोकल सेवा ठप्प झाली आहे. याच्या निषेधार्थ अनेक संघटनांनी आज बदलापूर बंदची घोषणा केली आहे.

विरोधक म्हणाले, महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना

दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते म्हणाले- 10 वर्षांपूर्वी दिल्लीत निर्भयाची घटना घडली आणि दोषींना शिक्षा झाली, पण किती कालावधीनंतर? न्यायास विलंब करणाऱ्यांनाही दोषी धरले पाहिजे. त्याचे राजकारण करू नये. कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेस नेते म्हणाले- ही घटना महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि आरोपींना तीन महिन्यांत फाशी द्यावी, अशी सर्वांची मागणी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर लिहिले - बदलापूरच्या शाळेत लहान मुलींसोबत घडलेली घटना धक्कादायक आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना 12 तास का लागले? एकीकडे ते म्हणतात कायद्याचे राज्य आणि दुसरीकडे पोलिसांचा हा कसला हलगर्जीपणा? महाराष्ट्रातील माझ्या सैनिकांनी हा मुद्दा मांडला आहे. मला महाराष्ट्रातील सैनिकांना सांगायचे आहे की, जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही या बाबींवर लक्ष ठेवा. सपा नेते अबू आझमी म्हणाले की, देशात दररोज बलात्कार आणि हत्येच्या घटना ऐकायला मिळत आहेत. बदलापूरमध्ये दोन चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बातमी समोर आली आहे. हे थांबवायचे असेल तर दोषींना जाहीर फाशी दिली पाहिजे.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला कायद्यात पकडलं, सर्वोच्च न्यायालयासही विनंती
Vileparle bomb bag: विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशय, पोलिसांनी परिसर खाली केला
विलेपार्ले स्थानकाजवळ बेवारस बॅग सापडली, बॉम्ब असल्याचा संशयाने खळबळ, पोलिसांनी परिसर खाली केला
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
पुणे, मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या बहरिनमध्ये असं नेमकं आहे तरी काय? शियाबहुल असूनही इराणकडे न झुकता शेजारच्या सुन्नीबहुल सौदीच्या जीवावर उड्या!
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
आमचे नेते एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेत, त्यांच्या उठावानेच भाजपची ताकद वाढली : शंभूराज देसाईंचे थेट विधान
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
परभणी जिल्ह्यात भीषण अपघात, कारची समोरासमोर धडक; जागेवरच 3 ठार 2 जखमी
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
एकाच तालुक्यातील 85 ग्रामपंचायत सदस्यांना ठरवलं अपात्र, अपर जिल्हाधिकाऱ्यांचा नेतेमंडळींना दणका
Embed widget