एक्स्प्लोर

Mumbai : आर्मी जवानाचा रेल्वे अपघातात मृत्यू, मात्र मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित

भारतीय लष्करातील जवान भूपेंद्र सिंग ओमप्रकाश टोकस यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. आता त्यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मुंबई : भारतीय लष्करातील जवान भूपेंद्र सिंग ओमप्रकाश टोकस (वय 31) यांच ट्रेनने धडक दिल्यामुळे निधन झालं ही घटना मिरा रोड ते दहिसरच्या दरम्यान रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. भूपेंद्र सिंग ओमप्रकाश टोकस हे 30 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते आणि या संदर्भात मुंबईच्या कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक इसम रविवारी रात्री दहिसर ते मिरा रोड दरम्यानचा रेल्वे रूळ क्रॉस करत होता. वसई रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली की एका व्यक्तीला ट्रेन ने धडक दिली आहे. त्यानंतर तात्काळ वसई रेल्वे पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याने जखमी अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात  पोहोचल्यावर डॉक्टरने त्या व्यक्तीला मृत घोषित केलं.

भारतीय सैन्यात टोकस हे लुधियाना युनिट मध्ये कार्यरत होते. मुंबईमध्ये पेट्रोलियम टेक्निशियनचा कोर्स करण्यासाठी टोकस मुंबईत आले होते. 30 नोव्हेंबर रोजी कोणालाही न कळवता कुलाब्याच्या नेव्हीनगर मधून टोकस निघाले. त्यानंतर टोकस घरी परतले नाही म्हणून त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली. पोलिसांनी सुद्धा टोकस यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. टोकस यांचा मोबाईल मात्र बंद होता. टोकस यांचा ट्रेन अपघातात मृत्यू झाल्याची माहिती कफ परेड पोलिसांना वसई रेल्वे पोलिसांनी कळवली.

जवान भूपेंद्र सिंग ओमप्रकाश टोकस हे 30 नोव्हेंबर पासून बेपत्ता होते. त्यांनी त्यांचा मोबाईल सुद्धा बंद केला होता. काही वेळेसाठी त्यांनी दुसरे सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकून त्याचा वापर केला होता. मात्र नंतर तो सुद्धा बंद केला, ज्यामुळे वसई रेल्वे पोलीस इतर बाबींच्या अनुषंगानेसुद्धा तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

भूपेंद्र सिंह ओमप्रकाश टोकस हे राजस्थानमधील अल्वर तालुक्यातील हरसोली गावातील राहणारे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. टोकस हे 30 नोव्हेंबरपासून कोणालाही न सांगता कुठे गेले होते? टोकस यांनी मोबाईल का बंद केला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांकडून तपासली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget