एक्स्प्लोर

विधानसभेच्या अध्यक्षपदी नार्वेकर, सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी अन् विरोधकांचे चिमटे; आजच्या विधानसभा विशेष अधिवेशनातील 10 मुद्दे

Maharashtra Assembly Session : आज विधानसभेच्या पहिल्या दिवसाचे कामकाज पार पडले. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाचे 10 मुद्दे

Maharashtra Assembly Session Highlights : राज्यपालांनी बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक कुरघोडी झाली. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना शिवसेनेला डिवचले. तर, अजित पवार यांनी भाजप नेत्यांना चिमटे काढले. जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांवर उपरोधिकपणे टीका केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना आणि शिवसेनेच्या बंडखोरांनी एकमेकांविरोधात व्हिप बजावले. 

जाणून घ्या आजच्या दिवसातील प्रमुख 10 मुद्दे :


>> कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आमदार दाखल

शिवसेनेचे बंडखोर आमदार कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विधानसभेत दाखल झाले. त्यापूर्वी या आमदारांनी कुलाबा येथील शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. कसाबलादेखील एवढी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली नव्हती, या आमदारांना एवढी सुरक्षा कशासाठी असा उपरोधिक सवालही शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. 

>> विधानभवनातील शिवसेना कार्यालयाला टाळे

बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि एकनाथ शिंदे गट आमनेसामने आले. मात्र, अधिवेशन सुरू होण्याआधीच मोठी घडामोड विधीमंडळात घडली आहे. विधीमंडळातील शिवसेनेचे पक्ष कार्यालयाला टाळे लावण्यात आले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या आदेशाने कार्यालय बंद ठेवण्यात आल्याची सूचना लिहिण्यात आली आहे. मात्र, ही सूचना कोणी दिली, याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागली आहे. शिंदे गटाने ही कुरघोडी की शिवसेनेने त्यांना रोखण्यासाठी ही सूचना केली याबाबत चर्चा सुरू आहेत. 

>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला डिवचले, म्हणाले...

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावार बोलताना एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले. राज्यात हिंदुत्वाचे सरकार आले असून बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शिवसेना भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. हिंदुत्व, बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले आहे. आतापर्यंत अनेकजण विरोधातून सत्तेत जातात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. या घटनेची राज्यातच नव्हे तर देशातही याची नोंद होईल. माझ्यासोबत आठ ते नऊ मंत्रीदेखील सत्तेतून बाहेर पडले. एका बाजूला सत्ता, मोठी माणसं आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब, आनंद दिघे यांच्या विचारांचा सामान्य कार्यकर्ता होता. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर 50 आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो असेही त्यांनी सांगितले. 

>> अजित पवार यांची टोलेबाजी

कोरोनामुक्त होऊन आज विधानसभेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार फार्मात दिसले. पहिल्याच दिवशी फुल्ल बॅटिंग करताना अजित पवारांनी अनेक शाब्दिक षटकार लगावले. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना अजितदादा बोलत होते. यावेळी त्यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं शिवाय सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार म्हणाले की,  देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी रडायला लागली. गिरीश महाजनांचं रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचं पाणी पुसायला वापरायले. भाजपच्या आमदारांनी सांगावं की खरंच झालं ते कसं झालं. हे जे घडलंय त्यानं समाधान झालंय का हे सांगावं.  चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही. सभागृहात धाकधूक आहेत. शिवसेनेतून गेलेले 40 जणांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल माहिती नाही.

>> जयंत पाटील यांची काढला चिमटा 

जयंत पाटील यांनी आमचे जावई असल्याने आम्हाला योग्य न्याय मिळेल अशी आशा आहे. नाही तर संध्याकाळी आमच्या घरी मुलीला काय केलं ते कळवू. मग संध्याकाळी आपला समाचार घेण्याची विनंती करु, असं म्हटल्यानंतर हशा पिकला 

>> राज्यपालांमधील 'रामशास्त्री' आता जागा झाला, बाळासाहेब थोरातांचा टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील रामशास्त्री आता जागा झाला आहे, आतापर्यंत झोपला होता असे म्हणत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला. अध्यक्षपद हे महत्त्वाचं आहे. बाकीच्या मंत्र्यांची पाटी राहील की नाही, पण अध्यक्षांच्या नावाची पाटी मात्र राहील असेही थोरात म्हणाले. देवेंद्रजी तुम्ही त्यांचा कार्यक्रम केला, आता त्यांना भाषण देता येणार नाही. देवेंद्रजी तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले कुणास ठाऊक असेही थोरात म्हणाले.

>> औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावरून अबू आझमी आक्रमक

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही राहुल नार्वेकर यांच्या निवडीसाठी अभिनंदन केले, पण अभिनंदन नामांतराच्या मुद्यावरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अबू आझमी म्हणाले, की बहुमतापेक्षा घटनेवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही अल्पमतात आहोत, बहुमताने निर्णय घेत असाल, तर आम्ही कुठे जावे? आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, कारण आमच्याकडे पर्याय नव्हता. उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलले. मात्र, शहरांची नावे बदलून विकास होतो का? बेरोजगारांना रोजगार, विकास होत असेल, तर आमचा आमचा विरोध नाही. नाव बदलून काय संदेश देणार आहात ? मुस्लिमांची नावे हटवून काय संदेश देणार आहात? अशी विचारणा केली.

>> शिवसेनेत व्हिप वॉर 

व्हिप झुगारून 39 आमदारांनी केलेले मतदान म्हणजे लोकशाहीची पायमल्ली केली असल्याचा घणाघात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील बंडाळी आणखी ठळकपणे दिसून आली. शिवसेनेच्या 39 बंडखोरांनी शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांच्याविरोधात मतदान केले. शिवसेनेच्या 39 आमदारांनी व्हिप झुगारून मतदान केले. त्यामुळे आपण (राहुल नार्वेकर) विधानसभेच्या अध्यक्षपदी किती काळ असाल याबाबत राज्यातील 13 कोटी जनतेला शंका आहे, असेही सुनील प्रभू यांनी म्हटले. तर, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हीपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले.   

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झरवळ यांना पत्र लिहीले. या पत्रात प्रभू यांनी, पक्षाच्या आदेशाविरोधात 39 आमदारांनी मतदान केले असून त्याची नोंद घ्यावी अशी विनंती केली. उपाध्यक्षांनी हे पत्र रेकॉर्डवर आणले. तर, दुसऱ्या बाजूला विधानसभेचे नवीन अध्यक्ष राहुल नावर्केर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणानंतर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आले. गोगावले यांनी पक्षाच्या 16 आमदारांनी पक्षाच्या आदेशाविरोधात मतदान केले असल्याचे पत्रात म्हटले. या पत्राची विधानसभा अध्यक्षांकडून नोंद घेण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी शिवसेना विधीमंडळ पक्षाचे प्रतोद भरत गोगावले असा उल्लेख केला. 

>> ईडी...ईडी...च्या घोषणा

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शिरगणतीने करण्यात आली. यावेळी विधानसभा सदस्यांना स्वत: चे नाव सांगून मतदान क्रमांक सांगायचा होता. या दरम्यान अनेक सदस्यांचा गोंधळ झाला. एकदा तर पुन्हा मतमोजणी करावी लागली. या दरम्यान शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव यांनी मत नोंदवताना विरोधी बाकांवरून ईडी..ईडी...च्या घोषणा सुरू झाल्या होत्या.

>> विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे आमदार अनुपस्थित

आजच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात वैद्यकीय आणि इतर कारणांमुळे काही सदस्य अनुपस्थित होते. मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप (भाजपा),  नवाब मलिक,  अनिल देशमुख, निलेश लंके, दिलीप मोहिते,  दत्तात्रेय भरणे, अण्णा बनसोडे,  बबनदादा शिंदे ( सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेस ),  मुफ्ती इस्माईल (एमआयएम),  प्रणिती शिंदे आणि जितेश अंतापुरकर ( काँग्रेस) आदी सदस्य अनुपस्थित होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget