एक्स्प्लोर

Kokan Refinery : कोकणातील रिफायनरीचा मुद्दा पेटणार! समर्थक-विरोधक घेणार राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी

Kokan Refinery : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी आता राजकीय मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूचे नेते आता राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

Kokan Refinery : कोकणातील रिफायनरीचा मुद्या आता आणखी तापण्याची चिन्ह आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरीच्या मुद्यावर आता दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र लिहिल्याचे समोर आल्यानंतर समर्थक आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. रिफायनरीविरोधात मोर्चा काढल्यानंतर आता विरोधक सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेणार आहेत. तर, रिफायनरी समर्थकांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. आपल्या दिल्ली भेटीत रिफायनरी समर्थक थेट केंद्रातील मंत्र्यांची भेट घेत रिफायनरीच्या सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार आहेत. 

कोकणात रिफायनरी हवी का नको? कोकणातील रिफायनरीला स्थानिकांच विरोध कि समर्थन? शिवसेनेची भूमिका काय? या साऱ्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र समोर आले. विरोधातील शिवसेना रिफानरीबाबत सकारात्मक असल्याचं दिसून आलं. पण, असं असलं तरी शिवसेनेनं मात्र स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका म्हणत पुन्हा एकदा सोयीस्कर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. 

दरम्यान, 30 मार्च रोजी रिफायनरी विरोधकांनी मोठ्या संख्येनं मोर्चा काढत नवीन जागेवरील रिफायनरीला आपला विरोध असल्याचं देखील दाखवून दिलं. राजापूर शहरातील जवाहर चौक ते तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेनं आमचा विश्वासघात करू नये अशी मागणी देखील करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेनं स्थानिकांना हवंय ते आम्ही करणार असल्याचं सांगतिले. 

प्रकल्पाला विरोध का? 

कोकणात चर्चेत असलेल्या रिफायनरीच्या प्रकल्पातून जवळपास 3 लाख कोटींची गुतंवणूक अपेक्षित असून किमान लाखभर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा खेळता राहणार असून देशाच्या आणि राज्याच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, त्यानंतर देखील स्थानिकांनी या प्रकल्पाला मोठ्या संख्येनं विरोध दर्शवला आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण होणार असून कोकणच्या सौंदर्यावर घाला येणार आहे. समुद्रात देखील प्रदूषण वाढणार असून या भागातील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकल्पाला विरोध असून इतर कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पांना आमचा पाठिंबा असल्याचं स्थानिकांनी मोर्चाच्या वेळी सांगितले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता केंद्राची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 

6 एप्रिल महत्त्वाचा दिवस

मुख्य बाब म्हणजे बुधवार अर्थात 6 एप्रिलचा दिवस हा प्रकल्पाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. यावेळी राजापूर तालुक्यातील धोपेश्वर या गावचा ग्रामसभा आहे. त्यावेळी स्थानिकांचं मत रिफायनरी प्रकल्पााबत घेतलं जाणार आहे. जवळपास 5 हजार एकर जमिन या गावची आहे. मुख्य बाब म्हणजे ग्रामसभेच्या ठरावाला कोणतीही कायदेशील मान्यता नसली तरी या गावच्या स्थानिकांचं मत काय आहे? याचा कल जाणून घेण्यास  मदत होणार आहे. गावचे नागरिक अर्थात ज्या व्यक्तिकडे मतदान कार्ड आहे अशा व्यक्तिला या रिफायनरीबाबतच्या ठरावावेळी मतदान करता येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget