एक्स्प्लोर

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाविरोधात बळीराजाची 'शक्ती' एकवटली; विधानसभेला राजकीय झटका देण्याचा इशारा!

12 जुलैपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला. जर महामार्ग रद्द करण्यात नाही आलं, तर प्रसंगी हायवे अडवला जाईल, गावागावामध्ये आंदोलन केली जातील, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) विरोधात मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एल्गार करण्यात आला. कोल्हापुरातील दसरा चौकातून ते जिल्हाधिकार्यालयावर विराट मोर्चा काढून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी मोर्चाला हजेरी लावत आपला आक्रोश व्यक्त केला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने तसेच जिल्ह्यातील महायुती, महाविकास आघाडी, तसेच शेतकरी संघटना, सामाजिक संघटनांमधील नेत्यांनी एकत्रित जिल्हाधिकारी अमोल येडके यांना निवेदन देताना शक्ती महामार्गाला स्थगिती नव्हे, तर त्याला स्थगितीच देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना येत असलेल्या नोटिसांवरून जिल्हाधिकारी अमोल येडगेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महामार्ग रद्द केल्यास विधानसभेला झटका देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अल्टिमेटम

या विराट मोर्चातून 12 जुलैपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात आला. जर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात नाही आला, तर प्रसंगी हायवे अडवला जाईल, गावागावामध्ये आंदोलन केली जातील, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला. यावेळी सर्वच नेत्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्दच करण्याची मागणी केली.  रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना पुन्हा नव्याने कशासाठी नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कशासाठी घातला जात आहे? अशीच विचारणा शेतकऱ्यांमधून होत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

सतेज पाटील म्हणाले की, प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. कोणीही मागणी केली नसताना कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी राज्य सरकार हा महामार्ग जनतेवर लादत आहे. स्वतःला शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवून घेत कंत्राटदारांचा खिसा भरण्याचा छुपा अजेंडा राबविणाऱ्या राज्य सरकारने हा महामार्ग 12 जुलैपर्यंत रद्द करावा. अन्यथा त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. 

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची गंभीर परिस्थती निर्माण होणार 

यावेळी बोलताना स्वाभिमानीचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास शासनाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असून या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत. सदर महामार्गामुळे सांगली व कोल्हापूर जित महापुराची गंभीर परिस्थती निर्माण होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग या शक्तीपीठ महामार्गास कमीत कमी ३ किलोमीटर ते जास्तीत जास्त 22 किलोमीटर असा समांतर असून या रस्त्यामुळे जुना रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील टोलवसुली दुभागून सदर वाढीव टोलचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला सोसावे लागणार आहे. यामुळे शासनाने वरील सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये. गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.    
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात
T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
Embed widget