![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jalna News: सातत्याने पाणी टंचाई, 'त्या' गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश; पालकमंत्र्यांचे आदेश
Jalna News: जल मिशन अंतर्गत कामाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
![Jalna News: सातत्याने पाणी टंचाई, 'त्या' गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश; पालकमंत्र्यांचे आदेश Maharashtra News Jalna News Continuous water shortage Include those villages in Jal Jeevan Mission Plan Guardian Minister Atul Save order Jalna News: सातत्याने पाणी टंचाई, 'त्या' गावांचा जल जीवन मिशन आराखड्यात समावेश; पालकमंत्र्यांचे आदेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/99ebcd5d9f76c4bc0b1b2108700f1c211683555328066737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna News: ज्या गावांना सातत्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, अशी गावे जल जीवन मिशनच्या आराखड्यात प्राधान्याने सामाविष्ट करावीत. या मिशन अंतर्गत ज्या गावातील कामे प्रलंबित आहेत ती तातडीने पूर्ण करण्यात यावीत. ज्या ठिकाणी कामे सुरु झालीच नाही, तेथे आगामी पंधरा दिवसांत कामे सुरु झाली नाही तर संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे सहकारमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी जिल्हा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिल्या आहेत. तर जल मिशन अंतर्गत कामाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जल जीवन मिशन अंतर्गत 719 गावांमध्ये रुपये 484 कोटी 5 लक्ष किमतीच्या 697 योजनांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 99 योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. जून अखेर 72, सप्टेंबर अखेर 205 डिसेंबर अखेर 298 आणि मार्च 2024 पर्यंत 23 योजना पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सन 2023-24 च्या जल जीवन मिशन आराखड्यात ज्या गावांत तीव्र पाणी टंचाई आहे, अशा गावांचा आराखड्यात प्राधान्याने समावेश करण्यात यावा, अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या.
तर जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल, हर घर जल हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या उपक्रमातंर्गत जलजीवन मिशनची होणारी कामे गुणवत्तापूर्ण असावीत. जे ठेकेदार काम करीत नाहीत, त्यांना काळ्या यादीत टाकावे. अधिकाऱ्यांनी कामांना नियमितपणे भेटी देऊन कामे वेळेत पूर्ण करुन घ्यावीत. येत्या पंधरा दिवसांत जी कामे सुरु होणार नाहीत, त्याचा आढावा घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करुन त्यांना ब्लॅकलिस्ट करावे, असेही सावे म्हणाले.
ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवा
या बैठकीत पालकमंत्री यांनी महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा आढावा घेतला. ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, एक शेतकरी एक डिपी योजनेतंर्गत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. वीजेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रार येणार नाहीत, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. प्राप्त तक्रारींचे तातडीने निरसन करावे. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री यांनी घेतला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. पुढील आठवड्यात पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)