एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यांमागे दडलंय काय?

काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस होता. पण पक्षाच्या या कार्यक्रमालाही ते हजर नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावरुन पुन्हा एकदा भाजपनं टोलेबाजी सुरु केली.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस आहे. पण या कार्यक्रमासाठी राहुल गांधी देशात नव्हते. कालच त्यांनी इटली गाठलं आहे. राहुल गांधींच्या या सततच्या विदेश दौऱ्यावरुन ते याआधीही टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. आता तर पक्षाची दुरावस्था असताना, देशात शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना राहुल गांधी पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर आहेत.

"वीर तुम बढे चलो, धीर तुम बढे चलो..."सकाळी हे ट्विट केल्यानंतर राहुल गांधी आता शेतकरी आंदोलनात काय आक्रमक भूमिका घेत आहेत. याकडे कुणी नजर लावून बसला असेल तर त्यांच्या पदरी घोर निराशाच आली. कारण हे ट्विट करुन राहुल गांधी यांनी इटलीचं विमान पकडलं. काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस होता. पण पक्षाच्या या कार्यक्रमालाही ते हजर नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावरुन पुन्हा एकदा भाजपनं टोलेबाजी सुरु केली.

राहुल गांधी हे आता काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. ते केवळ वायंनाडूमधून काँग्रेसचे खासदार आहेत. पण तरीही त्यांच्या सुट्ट्यांची इतकी चर्चा का सुरु आहे? याचं कारण अध्यक्ष नसले तरी पक्षातले सगळे अधिकार अद्याप तरी गांधी कुटुंबाकडेच आहेत.

भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राजीव सातव म्हणाले की, "आपल्या घरातलं कोणी आजारी असेल तर कोणीही सगळ्या गोष्टी सोडून जाईल. त्यांच्या आजीची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले आहेत. कोरोनाचं संकट मोठं असेल असं राहुल गांधी यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं त्यावर सरकारने लक्ष दिलं? लाखो शेतकरी सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार लक्ष द्यायला तयार आहेत? मागच्या सहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी एकही पत्रकार परिषद घ्यायला तयार नाहीत, त्याबद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही. देशासमोरच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने उत्तर दिलेलं नाही.

राहुल गांधी आणि त्यांच्या या विदेश दौऱ्यांचा एक इतिहास आहे. मागच्या वर्षी नागिरकत्व कायद्यावरुन आंदोलन पेटलं होतं तेव्हा राहुल गांधी विदेशात होते. दिल्लीतल्या दंगलीवरुन रान पेटलं होतं, तेव्हाही ते सुट्टीवर होते. महाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखली जात होती, तेव्हा ते विदेशात होते.आणि आता जेव्हा 33 दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर आंदोलन करतायत, तेव्हा राहुल गांधी विदेशात आहे.

राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याचा उल्लेख संसदेतही झालेला आहे. गांधी कुटुंबाचं एसपीजी प्रोटेक्शन काढून घेताना हा निर्णय कसा योग्य आहे याबाबत आकडेवारी अमित शाहांनी संसदेत आकडेवारी दिली होती. राहुल गांधी 2015 पासून 2019 पर्यंत तब्बल 246 वेळा विदेश दौऱ्यावर गेल्याचा त्यांचा दावा होता. म्हणजे सरासरी काढली तर वर्षाला 60 वेळा आणि महिन्याला 5 वेळा... एसजीपी प्रोटोकॉलनुसार प्रत्येक वेळी विदेश दौऱ्यावर जाताना त्याची सविस्तर माहिती द्यावी लागते. पण राहुल गांधी ती न देताच जात असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला होता.

पक्षाला पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हवा अशी मागणी काँग्रेसमधलेच नेते पत्र लिहून करत आहेत. आत्ता कुठे राहुल गांधी पुन्हा सक्रीय होताना दिसत होते. शेतकरी कायद्यावर त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर लगेचच पुन्हा ते विदेशात निघून गेले आहेत.

काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापन दिवस साजरा झाला. एकीकडे कोरोना संकटामुळे अध्यक्ष सोनिया गांधी हजर नव्हत्या, तर दुसरीकडे राहुल गांधी विदेशात आहे. त्यामुळे प्रियंका गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नवा, पूर्णवेळ अध्यक्ष कधी निवडला जाणार याची चिंता पक्षाला असतानाच आता राहुल गांधीच्या या दौऱ्यामुळे पुन्हा त्यांच्या नेतृत्वशैलीचे वाद उद्भवले जात आहेत.

संबंधित बातम्या :

आजारी आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले : राजीव सातव

 

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!

व्हिडीओ

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Dina Patil MNS : संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावले, फडणवीसांचा उल्लेख
संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात बॅनर लावत निषेध, फडणवीसांचा उल्लेख चर्चेत
Share Market : क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Embed widget