एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यांमागे दडलंय काय?

काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस होता. पण पक्षाच्या या कार्यक्रमालाही ते हजर नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावरुन पुन्हा एकदा भाजपनं टोलेबाजी सुरु केली.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस आहे. पण या कार्यक्रमासाठी राहुल गांधी देशात नव्हते. कालच त्यांनी इटली गाठलं आहे. राहुल गांधींच्या या सततच्या विदेश दौऱ्यावरुन ते याआधीही टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. आता तर पक्षाची दुरावस्था असताना, देशात शेतकरी आंदोलन पेटलेलं असताना राहुल गांधी पुन्हा एकदा विदेश दौऱ्यावर आहेत.

"वीर तुम बढे चलो, धीर तुम बढे चलो..."सकाळी हे ट्विट केल्यानंतर राहुल गांधी आता शेतकरी आंदोलनात काय आक्रमक भूमिका घेत आहेत. याकडे कुणी नजर लावून बसला असेल तर त्यांच्या पदरी घोर निराशाच आली. कारण हे ट्विट करुन राहुल गांधी यांनी इटलीचं विमान पकडलं. काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापना दिवस होता. पण पक्षाच्या या कार्यक्रमालाही ते हजर नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या विदेश दौऱ्यावरुन पुन्हा एकदा भाजपनं टोलेबाजी सुरु केली.

राहुल गांधी हे आता काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. ते केवळ वायंनाडूमधून काँग्रेसचे खासदार आहेत. पण तरीही त्यांच्या सुट्ट्यांची इतकी चर्चा का सुरु आहे? याचं कारण अध्यक्ष नसले तरी पक्षातले सगळे अधिकार अद्याप तरी गांधी कुटुंबाकडेच आहेत.

भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राजीव सातव म्हणाले की, "आपल्या घरातलं कोणी आजारी असेल तर कोणीही सगळ्या गोष्टी सोडून जाईल. त्यांच्या आजीची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले आहेत. कोरोनाचं संकट मोठं असेल असं राहुल गांधी यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं त्यावर सरकारने लक्ष दिलं? लाखो शेतकरी सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार लक्ष द्यायला तयार आहेत? मागच्या सहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी एकही पत्रकार परिषद घ्यायला तयार नाहीत, त्याबद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही. देशासमोरच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने उत्तर दिलेलं नाही.

राहुल गांधी आणि त्यांच्या या विदेश दौऱ्यांचा एक इतिहास आहे. मागच्या वर्षी नागिरकत्व कायद्यावरुन आंदोलन पेटलं होतं तेव्हा राहुल गांधी विदेशात होते. दिल्लीतल्या दंगलीवरुन रान पेटलं होतं, तेव्हाही ते सुट्टीवर होते. महाराष्ट्र, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखली जात होती, तेव्हा ते विदेशात होते.आणि आता जेव्हा 33 दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर आंदोलन करतायत, तेव्हा राहुल गांधी विदेशात आहे.

राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याचा उल्लेख संसदेतही झालेला आहे. गांधी कुटुंबाचं एसपीजी प्रोटेक्शन काढून घेताना हा निर्णय कसा योग्य आहे याबाबत आकडेवारी अमित शाहांनी संसदेत आकडेवारी दिली होती. राहुल गांधी 2015 पासून 2019 पर्यंत तब्बल 246 वेळा विदेश दौऱ्यावर गेल्याचा त्यांचा दावा होता. म्हणजे सरासरी काढली तर वर्षाला 60 वेळा आणि महिन्याला 5 वेळा... एसजीपी प्रोटोकॉलनुसार प्रत्येक वेळी विदेश दौऱ्यावर जाताना त्याची सविस्तर माहिती द्यावी लागते. पण राहुल गांधी ती न देताच जात असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला होता.

पक्षाला पूर्णवेळ काम करणारा अध्यक्ष हवा अशी मागणी काँग्रेसमधलेच नेते पत्र लिहून करत आहेत. आत्ता कुठे राहुल गांधी पुन्हा सक्रीय होताना दिसत होते. शेतकरी कायद्यावर त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यानंतर लगेचच पुन्हा ते विदेशात निघून गेले आहेत.

काँग्रेस पक्षाचा आज 136 वा स्थापन दिवस साजरा झाला. एकीकडे कोरोना संकटामुळे अध्यक्ष सोनिया गांधी हजर नव्हत्या, तर दुसरीकडे राहुल गांधी विदेशात आहे. त्यामुळे प्रियंका गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नवा, पूर्णवेळ अध्यक्ष कधी निवडला जाणार याची चिंता पक्षाला असतानाच आता राहुल गांधीच्या या दौऱ्यामुळे पुन्हा त्यांच्या नेतृत्वशैलीचे वाद उद्भवले जात आहेत.

संबंधित बातम्या :

आजारी आजीला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेले : राजीव सातव

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अशोक खरातची ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता
Maharashtra Live Blog Updates: अशोक खरातची ईडीकडूनही चौकशी केली जाण्याची शक्यता
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, पुढील आठवड्यात सहा दिवस बँका राहणार बंद, पगार कधी होणार?
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती, पुढील आठवड्यात सहा दिवस बँका राहणार बंद, पगार कधी होणार?
भारताने शेजारधर्म पाळला! संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत, 38 हजार मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा
भारताने शेजारधर्म पाळला! संकटात असलेल्या श्रीलंकेला मोठी मदत, 38 हजार मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा
एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 
एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक बातमी, होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन दोन जहाजे भारताच्या दिशेने 

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget