एक्स्प्लोर

महात्मा गांधींचा आणखी एक मारेकरी होता? सुप्रीम कोर्टात याचिका

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आणखी एक मारेकरी होता का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विचारण्यात आला आहे. महात्मा गांधींवर तीन गोळ्या झाडल्या होत्या असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु नथुराम गोडसेव्यतिरिक्त आणखी एकाने गांधीवर चौथी गोळी झाली होती का, असे अनेक प्रश्न या याचिकेत उपस्थित केले आहेत. मुंबईतील अभिनव भारतचे विश्वस्त आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका दाखल केली आहे. नवा चौकशी आयोग स्थापन करुन गांधी हत्येमागील मोठं कटकारस्थान उडकीस आणावं, अशी मागणी या याचिकेत केली आहे. तसंच गांधी हत्येच्या तपासाबाबतही याचिकेत प्रश्न उपस्थित केले आहेत. गांधी हत्या हे इतिहासातील दडपलेलं मोठं प्रकरण होतं का? तसंच त्यांच्या मृत्यूसाठी विनायक दामोदर सावरकर यांना जबाबदार ठरवण्यासाठी ठोस आधार होता का, असे प्रश्न याचिकेच विचारले आहेत. फडणीस यांच्या दाव्यानुसार, "महात्मा गांधींवर चार गोळ्या झाडल्या होत्या. तिसऱ्या आणि चौथ्या गोळीमधील अंतर महत्त्वाचं आहे, कारण गोडसेने 30 जानेवारी 1948 रोजी ज्या पिस्तूलने गांधीजींची हत्या केली होती, त्यामध्ये सात गोळ्यांची जागा होती. पण पोलिसांनी न चाललेल्या चार गोळ्या जप्त केल्या होत्या. अशा परिस्थितीत हे निश्चित आहे की, त्या पिस्तूलमधून केवळ तीन गोळ्या झाडल्या. गोडसेच्या पिस्तूलमधून चौथी गोळी झाडल्याची शक्यता नाहीच. ही गोळी दुसऱ्या मारेकऱ्याच्या बंदुकीतून आली होती." 1966 मध्ये न्यायमूर्ती जे एस कपूर यांचा चौकशी आयोग गांधी हत्येमागील कारस्थान उघड करण्यात अपयशी ठरला होता, असं याचिकेत म्हटलं आहे. नथुराम गोडसे आणि नारायण आपटेसह अन्य आरोपींना दोषी ठरवण्यासाठी तीन गोळ्या झाडल्याचा दावा विविध न्यायालयांनी खरा मानला, यावरही फडणीस यांनी प्रश्न निर्माण केले आहेत. महत्मा गांधींजींच्या मारेकऱ्यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फासावर लटकवलं होतं. तर पुराव्यांअभावी सावरकर निर्दोष ठरले. सावरकरांशी प्रेरित होऊन मुंबईत 2001 मध्ये अभिनव भारतची स्थापना झाली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम केलं जातं, असा दावा या संस्थेकडून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget