एक्स्प्लोर

India Pakistan 1971 War : ऑपरेशन ईगल: पडद्याआड राहिलेली 'रॉ'ची यशस्वी मोहीम

India Pakistan 1971 war: भारत-पाकिस्तानच्या 1971 मधील युद्धात भारतीय लष्करासह गुप्तचर संस्था 'रॉ'चे ही मोठे योगदान होते.

Vijay Divas Bangladesh Mukti Din : बांगलादेश मुक्तिसंग्रामात भारतीय सैन्याने अभूतपूर्व पराक्रम दाखवत पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पाकिस्तानच्या विरोधातील या संघर्षामध्ये भारतीय सैन्यासह देशाची गुप्तचर संघटना रॉचा ही मोलाचा वाटा होता. युद्धपूर्व काळात आणि युद्धा दरम्यान रॉ ने केलेली कामगिरी फारशी प्रकाशझोतात आली नव्हती. रॉ आणि भारतीय लष्कराने समन्वय साधत तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये (सध्याचा बांगालदेश) पाकिस्तानी सैन्याला अनेक आघाड्यांवर निष्प्रभ करत धूळ चारली. 'ऑपरेशन ईगल' ही मोहीम देखील पडद्याआड राहिली होती. 

तत्कालीन पूर्व पाकिस्तानमधील चित्तगावमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मदतीला मिझो बंडखोर होते. ईशान्य भारतात दहशतवादी कारवायास करण्यासाठी पाकिस्तानने या बंडखोरांना आश्रय दिला होता. मिझो बंडखोर हे गनिमी युद्धासाठी पारंगत होते. पाकिस्तानी सैन्याला त्याची मोठी मदत मिळत होती. पूर्व पाकिस्तानमध्ये निर्णायक आघाडी घेण्यासाठी चित्तगाववर ताबा मिळवण्याचे मोठे आव्हान भारतासमोर होते. अखेर भारताने या मोहिमेत आपली स्पेशल फ्रंटियर फोर्स (SFF) ही  खास तुकडी युद्धात उतरवली. विशेष म्हणजे या तुकडीतील सैन्य भारतीय नव्हते. 

कोण होते  SFF?

चीनसोबत झालेल्या 1962 च्या युद्धात पराभव झाल्यानंतर भारताने चीनच्या आगळीकीला उत्तर देण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार केला होता. चीनला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता होती. भारताने बंडखोर तिबेटीयन युवकांना प्रशिक्षित करण्याची योजना आखली. चीन सरकारला वैतागून तिबेटमधील अनेकजण भारतात निर्वासित म्हणून शरण आले होते. यातील काहीजणांना भारतीय लष्कराने गुप्तपणे प्रशिक्षित केले होते. मात्र, चीनसोबत नंतर युद्धाची स्थिती निर्माण न झाल्याने हे सैन्य कायम संधीच्या शोधात होते. या SFF ची ब्रिगेडियर सुजान सिंह यांच्या हाती होती. SFF च्या स्थापनेत रॉचे संस्थापक रामेश्वरनाथ काव यांची प्रमुख भूमिका होती. 

ऑपरेशन ईगलची सुरुवात

चितगाव आणि चितगाव डोंगराळ भाग हे गनिमी युद्धासाठी सर्वात योग्य क्षेत्र मानले गेले. पाकिस्तानी सैन्याशिवाय स्थानिक मिझो बंडखोरांचा बिमोड करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी SFF हा सर्वोत्तम पर्याय होता. तिबेटीयन जवान आणि मिझो बंडखोरांची शरीरयष्टी सारखीच होती. त्यामुळे चपळता, वेगवान हालचालीने हल्ला करण्यासाठी SFF योग्य पर्याय होता.  त्याशिवाय या मोहिमेद्नारे मिझो बंडखोरांची डोकेदुखी संपवण्याची भारताला संधी होती.

SFF आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन ईगलची सुरुवात केली. शत्रूंच्या ठिकाणांवर हल्ला करा, त्यांना नेस्तानाबूत करा, शक्य होईल तेवढे नुकसान करा आणि पुन्हा माघारी तळावर फिरा असे आदेश SFF ला देण्यात आले होते. वेगवान हल्ल्यांमुळे SFFच्या जवानांना 'फँटम इन हिल्स' असे म्हटले जाऊ लागले. या जवानांची कारवाई एक दंतकथाच झाली होती. हे जवान कुठून तरी येतात आणि कारवाया करून जंगलात अदृष्य व्हायचे. चितगावच्या डोंगराळ भागात त्यांनी कारवाईस सुरुवात केल्यानंतर दहा दिवसांत त्यांनी पाकिस्तान, मिझो बंडखोरांचे अनेक तळ ताब्यात घेतले. अनेक पूल उद्धवस्त केले. धरणाचेही नुकसान केले. पाकिस्तानची विविध आघाड्यांवर कोंडी केली होती. त्याशिवाय मिझो बंडखोरांचे तळ, आश्रयस्थाने उद्धवस्त केली. पाकिस्तानी लष्कर आणि मिझो बंडखोरांना म्यानमारमध्ये पळून जाण्याचा मार्गही बंद केला होता. या युद्धात SFF च्या तिबेटीय कमांडोंनी दाखवलेले शौर्य मोठे होते. या लढाईत SFFचे 56 कमांडो शहीद झाले तर जवळपास 190 जण जखमी झाले. 

SFF ने चितगाव बंदर ताब्यात घेण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. SFF च्या कमांडोमुळे चितगावपर्यंत जाण्याचा भारतीय लष्कराचा मार्ग मोकळा झाला होता. SFFने कमांडोंनी हा पराक्रम दाखवला नसता तर भारताला विजयासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागली असती.  

SFF सध्या काय करते?

SFF भारतीय लष्कराचा एक भाग आहे. मागील वर्षी झालेल्या गलवान संघर्षानंतर भारतीय सैन्याने लडाखमधील काही महत्त्वाच्या उंच ठिकाणांवर ताबा मिळवला होता. त्यामध्ये SFF च्या जवानांचा सहभाग होता. 

वाचा: R&AW ची स्थापना ते पाकिस्तानचे दोन तुकडे, जगभर दरारा निर्माण करणारे भारताचे गुप्तहेर रामेश्वर नाथ काव

 

पाहा : सिंहासन - बांगलादेशची निर्मिती आणि भारत-पाक युद्ध

 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा 'तो' भोवरा नाशिककडे न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील 'या' भागावर अतिवृष्टीचं संकट?
Pune News: पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
पुणे शहरातील महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, महापौरांनी दिली माहिती, काय आहे कारण?
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
Mumbai Rain Local Train Updates Marathi News: विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स
विरारपर्यंत लोकल सेवा पूर्ववत; पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील A टू Z अपडेट्स,
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Missing Link Mumbai Pune Expressway: मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यासाठी नेहरु जबाबदार; संदीप देशपांडेंचा फडणवीस सरकारला टोला
Embed widget