एक्स्प्लोर

Uniform Civil Code : समान नागरी कायदा लागू होणार? लोकसभा 2024 साठी भाजपकडून मास्टर प्लॅन

लोकसभा 2024 साठी  समान नागरी कायद्याकडे वाटचाल ही मोदी सरकारने कधीच सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 नागपूर :  मोदी सरकार 2.0 मध्ये खास संघ परिवाराचे मानले जाणारे अनेक अजेंडे हे निकाली लागताना दिसले. त्यामुळे आता पुढचा टप्पा हा समान नागरी कायदा का हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र माहितीनुसार हा अजेंडा देखील पूर्ण होईल, पण एक एकत्रित कायद्याच्या स्वरूपात होण्याची शक्यता कमी आहे. उलट वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये देशात समान नागरी कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.  

 इतक्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या प्रकाशनाने संसदेत समान नागरी कायदा आणला जाईल असे ट्विट केले. तेव्हापासून हे परत एकदा प्रायव्हेट मेम्बर बिलाच्या स्वरूपात राहिल की खरंच नावारूपाला येईल याची उत्सुकता नुसती राजकारणातच नाही तर सामाजिक स्तरावरही आहे. मात्र भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की,  समान नागरी कायद्याकडे वाटचाल ही मोदी सरकारने कधीच सुरु केली आहे. 

समानता ही नक्की कशात अपेक्षित आहे? 

भाजपाला अपेक्षित असणारी कायद्यातील समानता ही खास करुन महिलासंदर्भातील लग्न, घटस्फोट, वारसाहक्क या कायद्याला घेऊन आहे.  तसेच कलम 370  मुळे जम्मू काश्मिरात लागू होणारे वेगळे कायदे हा एक भाग होता. तर देशात धार्मिक स्थळांचे नियमन हे वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळ्या पद्धतीने होताना समाजात दिसते. तो ही एक मुद्दा आहे. काही बाबतीत पेहराव, खास करून महिलांच्या बाबतीत हिजाब सारखे विषय हे देखील सध्या चर्चेत आहे. 

समान नागरी कायद्याकडे कशी झाली वाटचाल? 

 मोदी सरकारने तिहेरी तलाकचा कायदा आणला.     
समान नागरी कायद्याचे हे महत्त्वाचे पाऊल यापूर्वीच यशस्वी झाले आहे. महिलांच्या हक्कात आमूलाग्र बदल घडला 

कलम 370 हटवले

 देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे कायदे हा विषय या सरकारने निकाली काढून टाकला आहे. हा देखील समान नागरी कायद्याचाच भाग आहे   तसेच  देशात पण काश्मिरच्या बाहेर जर तिथल्या स्त्रीने लग्न केले तर तिचा आधिवासाचा हक्क संपुष्टात येत होता हा देखील एक मोठा बदल मोदी सरकारने घडवून पूर्ण केला आहे.  जो समान नागरी कायद्याचाच एक भाग आहे. 

आता या शृंखलेत दोन महत्वाचे भाग पुढे आहेत अशी माहिती सूत्रांची आहे. एक म्हणजे एन्डॉवमेंट म्हणजेच वेगवेगळ्या न्यासांना लागू होणारे नियम. 

यामध्ये  खास धार्मिक स्थळे-म्हणजेच मंदिर, मशीद, गुरुद्वारा  नियमनात विषमता आहे. यामध्ये कुठेतरी एकसूत्रता यावी अशी समान नागरी कायद्याची भावना असली तरी हा विषय नाजूक आहे.  त्यामुळे  जनभावनेतून हा बदल व्हावा ही इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. देशातील 16 राज्यांमध्ये उच्चशिक्षित लोकांच्या माध्यमातून याची एक चळवळ देशात सुरु करण्यात आली आहे असे कळत आहे. 

 देशात एक महत्त्वाचा वाद उफाळून येताना दिसतो आहे तो म्हणजे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालून येणाऱ्या स्त्रियांना थांबवले.  कुठेतरी भारतीय पेहराव आणि भारताबाहेर उगम झालेले पेहराव याबद्दल ही एक चर्चा देशात घडवून आणण्याचा एक प्रयत्न सुरु असल्याचे कळतं आहे.  हा देखील  विषय नाजूक आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्यात कुठलाही पेहराव जरी घालू शकत असला, तरी  एखाद्या सार्वजनिक संस्थेत आपले समानतेचे नियम असू शकतात.  त्यासाठी कुठेतरी सुद्धा ही अशी एक  चर्चा होते आहे का हा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या दोन बाबी - समान नागरी कायद्याच्या  या वाटचालीतील पुढचे पाऊल ठरू शकतात. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Uniform Civil Code: समान नागरी कायद्यावर कायदा मंत्री किरण रिजिजू यांचे महत्त्वाचे वक्तव्य, म्हणाले...

लग्नासाठी स्त्री-पुरुष दोघांसाठी किमान वय समान ठेवा : कायदा आयोग

समान नागरी कायद्यात सुधारणेसाठी नागरिकांची मतं

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget