एक्स्प्लोर

'तान्हाजी' चित्रपटावरून नवा वाद; जन्मस्थळ बदलल्यामुळे गावकरी नाराज

डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोडवली गावात जेमतेम 450 घर आहेत. गावातली लोकसंख्या 2200 च्या आसपास आहे. गावातला इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे यांच जन्म गाव आहे.

सातारा : 'तान्हाजी ' चित्रपट आता नविन वादाच्या भोव-यात अडकताना पहायला मिळत असून तानाजी मालुसरे यांचा चुकिचा इतिहास सांगितला गेल्याची खंत त्यांच्या जन्म गावातून होताना पाहयाला मिळत आहे. त्यांच्या या वादातून त्यांच्या मुळ गावात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या गोडवली गावात जेमतेम 450 घर आहेत. गावातली लोकसंख्या 2200 च्या आसपास आहे. गावातला इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे यांच जन्म गाव आहे. गावाचा इतिहास पुस्तकात सांगितला गेला असला तरी चित्रपटातून मात्र तानाजी मालुसरे यांचे गाव उंबरट म्हणून दाखवल गेल आहे. तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावाचा उल्लेख कोठेच न केल्यानं गाव संतप्त आहे.

तानाजींचे वडील काळोजी मालुसरे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालूक्यातील गोडवली गावातील आहे. मुघलांनी जेंव्हा साता-यातील पसरणी घाट्याच्या माथ्यावर धुमाकूळ घातला तेंव्हा तानाजी मालुसरेंचे वडिल काळोजी लढताना मारले गेले. काळोजी मारल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. तानाजींचे मामा शेलार मामा यांनी मुघलांच्या भितीने गोडवली गाठले आणि काळोजींची पत्नी पार्वती, दोन मुल तानाजी आणि सूर्याजी या तिघांना घेऊन त्यांनी त्यांचे रायगड जिल्हातील कुडपन गाव गाठले. काळोजींच्या कुंटूंबावर मोगलांचा डोळा होता. मारेकरी कुडपनला पोहचतील या भितीपोटी शेलार मामांनी मालूसरे यांचे संपुर्ण कुटूंबाचे बस्तान हलवले आणि त्यांनी स्वत:च्या सासरवाडीत म्हणजे कुडपन गावापासून काही कोसावर असलेल्या उंबरट या गावात हलवले. चार वर्षाचे तानाजी आणि दोन वर्षाचे सूर्याजी हे उंबरट गावातच वाढले आणि तानाजी मालूसरे यांचे गाव उंबरट असेच सांगितले जाऊ लागले.

Satara | तानाजी चित्रपटातून चुकीचा इतिहास मांडला; तानाजी मालुसरेंच्या गावकऱ्यांचा आरोप | ABP Majha

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजीराजेंना जाऊन मिळाले आणि नंतरचा शिवरायांसोबतचा तानाजींचा इतिहास घडला. तानाजी मालुसरे यांच्या जीवनपटावर जो काही चित्रपट सध्या प्रदर्शित झाला त्यात चित्रपटात मात्र तानाजी मालुसरे यांचे जन्म गाव असलेल्या गोडवली या गावचा कोठेच उल्लेख केला गेला नाही. त्यामुळे तानाजी मालुसरे यांची भाऊबंदकी मात्र या चित्रपटावर नाराज असून त्यांनी या बाबत राग व्यक्त केला आहे.

चित्रपटातून तानाजी मालुसरे यांचा र्धवट दाखवलेल्या इतिहासामुळे आम्ही नाराज आहोत. आम्ही तानाजी मालूसरे यांच्या गावातील असल्याचा सार्थ अभिमान असल्याच मत गावातील युवक युवती सांगत आहे.

ग्रामस्थ मंडळी सध्या चित्रपट निर्मात्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांची भेट झालेली नाही. त्यामुळे शब्दातून राग व्यक्त करणारी ही ग्रामस्थ मंडळी 26 जानेवारीला चित्रपट निर्मात्यांविरोधात निषेधाचा ठराव करणार आहेत. शिवाय यापेक्षा उग्र भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता निर्माते नेमकी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget