एक्स्प्लोर

RSS: देशातील असमानतेवर दत्तात्रय होसबळे यांच्याकडून चिंता व्यक्त; गरिबी आणि बेरोजगारीबाबत म्हणाले...

Rashtriya Swayamsevak Sangh: स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी देशातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केलीय.

Rashtriya Swayamsevak Sangh: स्वदेशी जागरण मंचच्या कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी देशातील असमानतेबाबत चिंता व्यक्त केलीय. तसेच देशातील गरिबी आणि बेरोजगारीवरही त्यांनी भाष्य केलं. देशात गरिबी, बेरोजगारी राक्षसासारखी उभी असून असमानताही वाढत आहे. देशातील 20 कोटी लोक अजूनही दारिद्र्यरेषेखाली आहेत. एवढेच नाही तर देशातील 23 कोटी लोकांचं रोजचं उत्पन्न 375 रुपयांपेक्षा कमी आहे.  देशाच्या मोठ्या भागांना अजूनही शुद्ध पाणी आणि पोषक आहार मिळत नाही. आपण या राक्षसाचा वध करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

देशातील चार कोटी लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतोय. लेबर फोर्स सर्व्हेनुसार देशातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे. तसेच देशातील आर्थिक असमानताही सर्वात मोठा मुद्दा आहे. भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. पण परिस्थिती चांगली आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 

देशातील 23 कोटी लोकांचा रोजगार 375 रुपयांपेक्षा कमी
"देशातील 20 कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत, याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. तब्बल  23 कोटी लोक प्रतिदिन 375 रुपयांपेक्षा कमी कमावतात. देशातील गरिबी आपल्यासमोर राक्षसारखी आहे. या राक्षसाचा नायनाट करणे महत्त्वाचं आहे." अर्थव्यवस्थेतील अपयशासाठी दत्तात्रय होसबळे मागच्या सरकारांच्या सदोष आर्थिक धोरणांना जबाबदार धरलंय.

ग्रामीण भागात 2.2 कोटी लोक बेरोजगार
"देशातील चार कोटी लोक बेरोजगार आहेत. यातील ग्रामीण भागातील संख्या 2.2 कोटी आहे. तर, शहरात 1.8 कोटी बेरोजगारीचा सामना करतायेत. कामगार सर्वेक्षणात आकडेवारीनुसार, बेरोजगारीचा दर 7.6 टक्के आहे.  रोजगार निर्मितीसाठी आपल्याला केवळ अखिल भारतीय योजनाच नव्हे तर स्थानिक योजनांचीही निर्मितींची गरज आहे", असंही होसबळे यांनी म्हटलंय.

कौशल्य विकास क्षेत्रात पुढाकार घेण्याची सूचना
कुटीर उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील आकर्षण वाढवण्यासाठी कौशल्य विकास क्षेत्रात अधिक पुढाकार घेण्याचा होसबळे यांनी सूचना केलीय. भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था असल्याचं आकडेवारी सांगते. पण देशातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक पंचमांश (20 टक्के) आहे. तर, 50 टक्के जनतेचं उत्पन्न हे केवळ 13 टक्के आहे. ही चांगली स्थिती आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ग्रामीण स्तरावर रोजगार निर्मितीची आवश्यकता
ग्रामीण भागातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत दत्तात्रय होसबळे म्हणाले की, "ग्रामीण भागात रोजगार निमिर्ती करण्याची आवश्यकत असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच उद्देशानं स्वदेशी जागरण मंचनं 'स्वावलंबी भारत अभियान सुरु केलंय. या मोहिमेंतर्गत एसजेएम ग्रामीण स्तरावर कौशल्य विकास आणि मार्केटिंगसह कृषी आणि संबंधित क्षेत्रात नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल", असंही त्यांनी म्हटलंय.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती

व्हिडीओ

Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?
Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report
Mahayuti Seat Sharing : मनपासाठी महायुतीचं कुठे ठरलं कुठे अडलं? Special Report
Social Media Ban Update : भारतातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
Embed widget