एक्स्प्लोर

मतं न देऊनही मुस्लिमांना स्वीकारलं, रविशंकर प्रसाद यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : मुस्लीम जनता भाजपला मतं देत नाही, पण आम्ही नेहमीच त्यांचा योग्य सन्मान केला आहे, असं वक्तव्य करुन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवा वाद निर्माण केला आहे. देशाची संस्कृती आणि विविधता यावर विकासाचा होणारा परिणाम, या विषयावरील 'माईंड माइन' संमेलनात रविशंकर प्रसाद बोलत असताना त्यांनी हे विधान केलं. रविशंकर प्रसाद म्हणाले की, ''देशातील 13 राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही देशाचा कारभारही चालवतो आहोत. अशावेळी, उद्योग किंवा सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही मुस्लीम व्यक्तीला आम्ही त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना बडतर्फ केलं आहे का? आम्हाला मुस्लीम लोक मतं देत नाहीत, हे मला मान्य आहे. पण आम्ही त्यांना न्यायानंच वागवतोय की नाही?,'' असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी केला. ''भाजपच्या विरोधात बऱ्याच काळापासून बदनामीची मोहीम राबवली जात आहे. पण देशातील जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सरकारमध्ये आहोत आणि इथल्या संस्कृती, विविधेतेला आम्ही वंदन करतो,'' असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्यास सुरुवात झाली आहे. प्रसाद यांच्या वक्तव्याचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ''आम्हाला घटनेनं अधिकार दिले आहेत. सरकारला फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे,'' असं ओवेसी म्हणाले आहेत. काँग्रेसनंही प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी, ''भाजपनं यापूर्वी मुस्लीम महिलांनी आम्हाला मतं दिल्याचं म्हणलं होतं. तर मग आता रविशंकर प्रसाद असं वक्तव्य का करत आहेत?'' असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. रविशंकर प्रसाद यांनी काहीही चुकीचं म्हणलं नसल्याची प्रतिक्रिया गिरीराज सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागताच त्यांनी ट्वीट करुन सारवासारव केली आहे. ''सर्व भारतीय सारखेच आहेत. विकास हाच आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील वैविध्यतेनं नटलेल्या संस्कृतीचा आम्ही आदर करतो. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ नये,'' असंही त्यांनी या ट्वीटद्वारे स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget