एक्स्प्लोर

Weather : उत्तर भारतात थंडी कायम, तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. तर महााराष्ट्रातही उन्हाचा चटका कायम आहे.

Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच जोरदार वारे वाहत असल्याने थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात देखील तापमानात चढ उतार कायम आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण देखील आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.

राजस्थान

राजस्थानच्या अनेक भागात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळ वातावरण थंड झाले आहे. त्याचबरोबर सोसाट्याचा वाऱ्यामुळे थंडीही जाणवत आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, आता हवामान स्वच्छ होईल आणि सूर्यप्रकाश पडेल. आठवडाभर असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या तापमानाबद्दल बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 14 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला  आहे.

बिहार

आर्द्रता असलेल्या पश्चिमेकडील हवेमुळे राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण राहणार असून, बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 27 अंश, तर किमान तापमान 12 अंश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पंजाब

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर पंजाबमध्ये थंडी वाढली आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण राहील. फक्त आज हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, 2 मार्चला म्हणजे उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानाबाबत बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 24 अंश तर किमान तापमान 10 अंश राहण्याचा अंदाज आहे.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, अधूनमधून पावसासोबत हिमवृष्टीही सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे आवर्तन 2 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आज श्रीनगरमध्ये कमाल तापमान 8 अंश आणि किमान तापमान उणे 2 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 22 आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. अनेक भागात पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षीत आहे. राज्यातील बहुतांश भागात आज किमान तापमान 3 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हिमाचल प्रदेश

काल झालेल्या हिमवृष्टी आणि पावसामुळे हिमाचल प्रदेशात किमान तापमानात घट झाली आहे. आजही वातावरण थंड राहील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 11 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 0 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, रोजगारासोबतच, मोठी गुंतवणूकही, भारताला कोणते फायदे मिळणार?
India Russia Deal : युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
युरीया दुप्पट किमतीने खरेदी करावा लागल्यानंतर भारताची कूटनीती, रशियाशी करार अन् होर्मुझ समस्येवर तोडगा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 1 तारखेला पगार जमा होणार नाही, पुढच्या महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
Embed widget