IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
IndiGo Flight Cancellations: मंत्रालयाने विमान कंपन्यांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की ज्या प्रवाशांच्या प्रवासावर उड्डाण रद्द झाल्यामुळे परिणाम झाला आहे त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये.

IndiGo Flight Cancellations: नागरी उड्डाण मंत्रालयाने (MoCA) इंडिगोला सर्व प्रलंबित प्रवाशांचे रिफंड त्वरित विलंब न करता परत करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत उड्डाणांशी संबंधित सर्व परतफेड रविवार, 7 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मंत्रालयाने विमान कंपन्यांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की ज्या प्रवाशांच्या प्रवासावर उड्डाण रद्द झाल्यामुळे परिणाम झाला आहे त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारू नये. आदेशाचे पालन न केल्यास तत्काळ नियामक कारवाई देखील केली जाईल.
स्पेशल पॅसेंजर सपोर्ट अँड रिफंड सेल
उड्डाण व्यत्ययानंतर प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण सुनिश्चित करण्यासाठी, मंत्रालयाने इंडिगोला एक विशेष पॅसेंजर सपोर्ट आणि रिफंड सेल स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. हा कक्ष वारंवार पाठपुरावा न करता परतफेड आणि पर्यायी प्रवास व्यवस्था पूर्ण करण्यासाठी प्रभावित प्रवाशांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधेल. कामकाज पूर्णपणे सामान्य होईपर्यंत स्वयंचलित रिफंड प्रणाली चालू राहील.
#WATCH | Maharashtra | IndiGo passengers at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport in Mumbai, lose their cool and get into a heated argument with the airline staff at the ticket counter, amid the nationwide IndiGo flight cancellations. pic.twitter.com/lMWqs0joNQ
— ANI (@ANI) December 6, 2025
सामान परत करण्यासाठी 48 तासांची अंतिम मुदत
मंत्रालयाने इंडिगोला रद्द किंवा विलंबामुळे हरवलेले सर्व सामान शोधून ते प्रवाशांच्या घरी किंवा दिलेल्या पत्त्यावर 48 तासांच्या आत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना सामानाची स्थिती, ट्रॅकिंग आणि डिलिव्हरीच्या वेळेबाबत स्पष्ट माहिती देण्याचे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास नियमांनुसार भरपाई देखील दिली जाईल. प्रवाशांना गैरसोय होऊ नये यासाठी देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक प्रवासातील प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे. मंत्रालयाने आश्वासन दिले आहे की परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण सामान्य कामकाज पूर्ववत केले जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या























