एक्स्प्लोर

दारु पिण्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक, 'हे' राज्य आहे प्रथम

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये दारु पिणाऱ्यांचं प्रमाण महाराष्ट्रापेक्षाही जास्त आहे अस सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली: राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर दारुच्या दुकानावर मद्यप्रेमींच्या उड्या पडल्याचं पहायला मिळालं. यावरुन प्रत्येकाला वाटलं की महाराष्ट्रात तळीरामांची संख्या सर्वाधिक असेल. पण नाही, महाराष्ट्राचा दारु पिण्यात महाराष्ट्राच्या पुढेही दोन राज्ये आहेत.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या आकडेवारीनुसार दारु रिचवण्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा आणि कर्नाटक ही दोन राज्ये दारु पिणाऱ्यांच्या संख्येत पुढे आहेत. तर बिहारमध्ये दारु बंदी असतानाही दारु पिणाऱ्यांच्या प्रमाणात ते राज्य महाराष्ट्राच्याही पुढं असल्याचं दिसून आलं आहे.

कोरोना काळात राज्याच्या महसूलावर परिणाम झाला म्हणून राज्य सरकारने दारुची दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मद्यप्रेमींची दुकानासमोर कित्येक किलोमीटरची रांग लागल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्याच्या तिजोरीत 7 हजार 807 कोटी रुपयांची भर पडली.

गोवा राज्य मागे कदाचित हे वाचून आश्चर्यही वाटले असेल की ज्या गोव्यात दारु मुबलक आहे ते राज्य दारु पिणाऱ्यांच्या संख्येत मागे राहिले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 या अहवालानुसार तेलंगणामध्ये मद्य पिणाऱ्यांची संख्या देशात सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. दारुबंदी असलेल्या गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी पुरुष मद्यपान करतात. मद्यपान करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण पुरुषांमध्ये महिलांप्रमाणे जास्त अंतर नाही.

सिक्कीममध्ये महिला सर्वात जास्त दारु पितात ईशान्येकडील राज्य सिक्कीममध्ये मद्य पिणाऱ्या महिलांचे प्रमाण संपूर्ण देशात जास्त आहे. सिक्कीममधील 16.2 टक्के महिला मद्यपान करतात असं समोर आलं आहे. आसाममधील मद्य प्राशन करणाऱ्या महिलांची टक्केवारी 7.3 टक्के इतकी असून याबातीत हे राज्य देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. ज्याप्रमाणे तेलंगणातील मद्य प्राशन करणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त आहे त्याचप्रमाणे या राज्यातील महिलाही दारु रिचवण्यात पुढे असून महिलांच्या दारु पिण्याच्या बाबतीत या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो.

देशाच्या अन्य भागाच्या तुलनेच ईशान्येकडील महिला सर्वाधिक मद्यपान करतात असं या अहवालातून स्पष्ट झालंय. शहरातील महिलांमध्ये धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण जास्त असते असेही म्हटले जाते. परंतु या अहवालानुसार शहरी महिलांपेक्षा खेड्यातील महिला या दारु पिण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिला आपण दारु पितो हे सांगताना संकोच करीत नसल्याचंही अहवालात नमूद करण्य़ात आलं आहे.

दारुबंदी असणारे बिहार आघाडीवर बिहारमध्ये दारुबंदी असतानाही या राज्यात दारु पिणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रापेक्षाही जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. बिहारमध्ये 15 वर्षावरील 15.5 टक्के लोक दारु पितात तर महाराष्ट्रात हे प्रमाण 13.9 टक्के इतकं आहे.

दारुपेक्षा तंबाखूचं सेवन जास्त देशात दारुपेक्षा तंबाखूचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जातं असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नागरिकांनी तंबाखूपासून लांब राहावे म्हणून सरकार सतत प्रयत्न करीत असते पण त्याचा काहीही परिणाम नागरिकांवर झालेला नाही हे या अहवालातून स्पष्ट झालं आहे. तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करण्यात मिझोरम देशात आघाडीवर आहे. मिझोरममधील 77.8 टक्के पुरुष आणि 65 टक्के स्त्रिया तंबाखूचे सेवन करतात. तर केरळमध्ये तंबाखूचा वापर सगळ्यात कमी म्हणजे 17 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे दारु आणि तंबाखू सेवनाच्या बाबतीत गोवा खूपच मागे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-20 च्या पहिल्या फेजचा अहवाल जाहीर केला. हे सर्वेक्षण देशातील 22 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Embed widget