एक्स्प्लोर

नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत

AAP : देशाची राजधानी नवी दिल्लीत भाजपनं सत्ता मिळवली आहे. तर, आम आदमी पार्टीला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं आहे.

नवी दिल्ली : भाजपनं नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत 70 पैकी  48 जागांवर विजय संपादन करत सत्ता मिळवली. तर, दोन टर्म स्वबळावर सत्तेत असणाऱ्या आम आदमी पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसला तर खातं देखील उघडता आलं नाही. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं विधानसभा निवडणुकीत 2020 ला विजयी झालेल्या 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर, आपच्या 5आमदारांनी पक्षांतर करुन निवडणूक लढवली होती. भाजपच्या सहा आमदारांनी देखील पुन्हा निवडणूक लढवली होती. म्हणजेच एकूण 47 आमदारांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी 25 आमदरांना पराभवाचा धक्का बसला. 

भाजपचे सर्व आमदार विजयी

भाजपनं 2020 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 8 पैकी  6 आमदारांनी निवडणूक लढवली होती. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला. म्हणजेच भाजपचा स्ट्राईक रेट 100 टक्के राहिला. भाजपचे ते आमदार पुन्हा  विजयी होत विधानसभेत पोहोचलेत.

आपला धक्का 22 विद्यमान आमदार पराभूत 

आम आदमी पार्टीनं 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं. त्यापैकी 22 आमदार पराभूत झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया या दिग्गजांचा समावेश आहे. आपनं पुन्हा उमेदवारी दिलेल्यांपैकी केवळ 14 आमदार विधानसभेत परत पोहोचले आहेत. जे नेते विजयी झालेत त्यामध्ये अतिशी, गोपाळ राय, मुकेश कुमार अल्हावट यांसह इतरांचा समावेश आहे. 

आपच्या ज्या विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज यांचा समावेश आहे. याचा अर्थ नवी दिल्लीतील मतदारांमध्ये आप विरोधात असंतोष होता हे स्पष्ट होतं. 

आम आदमी पार्टी सोडून पक्षात आलेल्या तीन आमदारांना भाजपनं उमेदवारी दिली होती.यामध्ये कैलाश गहलोत, करतारसिंग तनवर आणि राज कुमार आनंद यांचा समावेश होता. मात्र, कैलाश गहलोत आणि करतारसिंग तन्वर हे दोघे विजयी झाले. काँग्रेसच्या चिन्हावर आपचे अब्दुल रेहमान आणि धर्मपाल लाक्रा हे निवडणूक लढले. मात्र, ते देखील पराभूत झाले. 

आम आदमी पार्टीला 70 पैकी 22 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं आपला विरोधी पक्षात बसावं लागेल. आपनं 2013 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला होता. 2013 ला आपला 28 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या मदतीवर ते नवी दिल्लीत सत्तेत आले होते. ते सरकार 49 दिवस टिकलं होतं.  2015 मध्ये आपला 67 जागा मिळाल्या तर 2020 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या.

इतर बातम्या :

delhi vidhan sabha election Final Result : भाजपची 48 जागांवर मुसंडी, आप पक्षाला फक्त 22 जागा, काँग्रेसला अवघी 6 टक्के मतं; जाणून घ्या A टू Z निकाल!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

व्हिडीओ

Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Nashik News: लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
लेकरांना विकलं नाही तर....; पतीने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचं उघडकीस, नेमकं काय प्रकरण?
Winter Session: अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
अतिवृष्टीवर चर्चा असताना दुग्ध, कृषी, महसूल मंत्र्यांची विधानभवनात चक्क दांडी! भास्कर जाधवांचा सडकून प्रहार, भाजप आमदारांची सुद्धा नाराजी
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर, सतेज पाटील अंबादास दानवेंनी फटकारलं
Maharashtra Flood Aid: शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
शासनाचं मोठ्ठ पॅकेज ई-केवायसीमुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून; मराठवाड्याला सर्वाधिक फटका
Embed widget