एक्स्प्लोर

नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत

AAP : देशाची राजधानी नवी दिल्लीत भाजपनं सत्ता मिळवली आहे. तर, आम आदमी पार्टीला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं आहे.

नवी दिल्ली : भाजपनं नवी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत 70 पैकी  48 जागांवर विजय संपादन करत सत्ता मिळवली. तर, दोन टर्म स्वबळावर सत्तेत असणाऱ्या आम आदमी पार्टीला पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसला तर खातं देखील उघडता आलं नाही. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीनं विधानसभा निवडणुकीत 2020 ला विजयी झालेल्या 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली होती. तर, आपच्या 5आमदारांनी पक्षांतर करुन निवडणूक लढवली होती. भाजपच्या सहा आमदारांनी देखील पुन्हा निवडणूक लढवली होती. म्हणजेच एकूण 47 आमदारांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यापैकी 25 आमदरांना पराभवाचा धक्का बसला. 

भाजपचे सर्व आमदार विजयी

भाजपनं 2020 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 8 पैकी  6 आमदारांनी निवडणूक लढवली होती. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी विजय मिळवला. म्हणजेच भाजपचा स्ट्राईक रेट 100 टक्के राहिला. भाजपचे ते आमदार पुन्हा  विजयी होत विधानसभेत पोहोचलेत.

आपला धक्का 22 विद्यमान आमदार पराभूत 

आम आदमी पार्टीनं 62 पैकी 36 आमदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं. त्यापैकी 22 आमदार पराभूत झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया या दिग्गजांचा समावेश आहे. आपनं पुन्हा उमेदवारी दिलेल्यांपैकी केवळ 14 आमदार विधानसभेत परत पोहोचले आहेत. जे नेते विजयी झालेत त्यामध्ये अतिशी, गोपाळ राय, मुकेश कुमार अल्हावट यांसह इतरांचा समावेश आहे. 

आपच्या ज्या विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज यांचा समावेश आहे. याचा अर्थ नवी दिल्लीतील मतदारांमध्ये आप विरोधात असंतोष होता हे स्पष्ट होतं. 

आम आदमी पार्टी सोडून पक्षात आलेल्या तीन आमदारांना भाजपनं उमेदवारी दिली होती.यामध्ये कैलाश गहलोत, करतारसिंग तनवर आणि राज कुमार आनंद यांचा समावेश होता. मात्र, कैलाश गहलोत आणि करतारसिंग तन्वर हे दोघे विजयी झाले. काँग्रेसच्या चिन्हावर आपचे अब्दुल रेहमान आणि धर्मपाल लाक्रा हे निवडणूक लढले. मात्र, ते देखील पराभूत झाले. 

आम आदमी पार्टीला 70 पैकी 22 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळं आपला विरोधी पक्षात बसावं लागेल. आपनं 2013 मध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला होता. 2013 ला आपला 28 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या मदतीवर ते नवी दिल्लीत सत्तेत आले होते. ते सरकार 49 दिवस टिकलं होतं.  2015 मध्ये आपला 67 जागा मिळाल्या तर 2020 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या.

इतर बातम्या :

delhi vidhan sabha election Final Result : भाजपची 48 जागांवर मुसंडी, आप पक्षाला फक्त 22 जागा, काँग्रेसला अवघी 6 टक्के मतं; जाणून घ्या A टू Z निकाल!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Congress Rally Against SIR: व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
व्होट चोर, गद्दी छोड! 'मतचोरीच्या' विरोधात काँग्रेसचा आज दिल्लीत रामलीला मैदानात एल्गार; राहुल गांधींसह प्रमुख नेते उपस्थित राहणार
Embed widget