एक्स्प्लोर

IT क्षेत्रात यंदा 30-40 हजार कर्मचाऱ्यांची कपात होऊ शकते : मोहनदास पै

आयटी क्षेत्रातील 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. मध्यम स्तरामधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कपातीची टांगती तलवार आहे. आयटी दिग्गज मोहनदास पै यांनी हे मत नोंदवलं आहे.

मुंबई : "अर्थव्यवस्थेमधील मंदी कायम राहिली तर भारतातील आयटी कंपन्या यंदा सुमारे 30 ते 40 हजार कर्मचाऱ्यांची कपात करु शकतात," असं मत आयटी दिग्गज आणि इन्फोसिसचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी मोहनदास पै म्हणाले. "आयटी क्षेत्रात दर पाच वर्षात हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या अशाप्रकारे जातात. पाच वर्षात आयटी क्षेत्रात बरेच बदल होतात आणि त्यामुळेच कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी केलं जातं," असंही त्यांनी सांगितलं. "पश्चिमेकडील देशातील प्रत्येक क्षेत्राही असं घडतं. भारतातही जर एखाद्या क्षेत्रात विकास झाला तर मध्यम स्तरावरील कर्मचारी जे कंपनीत पगारानुसार योगदान देत नाहीत, ते नोकरी गमावू शकतात," असं पै यांनी सांगितलं. मध्यम स्तराच्या कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार पै म्हणाले की, "जेव्हा एखाद्या क्षेत्रात विकास होतो तेव्हा मध्यम स्तरावर काम करणाऱ्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या तुलनेत कंपनीत योगदान देता येत नाही. यामुळे प्रत्येक देशातील प्रत्ये क्षेत्रात विकास होतो, तेव्हा बऱ्याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं जातं." "जर एखादी कंपनी विकास करत असेल तर प्रमोशनही मिळतं आणि पगारात वाढही होते. त्या परिस्थितीत कंपनीला काही फरक पडत नाही. पण कंपनीचा विकास थांबला तर व्यवस्थापनाला आपल्या पिरॅमिडवर पुन्हा एकदा लक्ष द्यावं लागतं. अशा परिस्थितीत मध्यम आणि उच्च स्तरावरील कर्मचारी, ज्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त पगार मिळतो, त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्यांना नोकरी गमवावी लागते," असंही मोहनदास पै यांनी नमूद केलं. दर पाच वर्षांनंतर अशी परिस्थिती येणार : मोहनदास पै "इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अशी परिस्थिती दर पाच वर्षांनंतर येते. जर कोणाला गडगंज पगार मिळत असेल, तर त्याला त्याच्या तुलनेत जास्त योगदान द्यावं लागतं. यामध्ये अपयश आल्यास त्याला नोकरी गमवावी लागू शकते. आयटी सेक्टरमध्ये ज्या लोकांची नोकरी जाईल, त्यांच्याकडे दुसरी संधीही उपलब्ध असेल. पण यासाठी त्यांना स्वत:ला काळानुसार अपडेट राहावं लागेल," असं मोहनदास पै यांनी सांगितलं. संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेले, कॉकरोच जनता पार्टीकडून विजेता दहियांवर कारवाई, प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी 
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
Delhi Protest : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून राहुल गांधींना उचललं, प्रियंका गांधींचा जोरदार प्रतिक्रार; काँग्रेसचे अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
Embed widget