एक्स्प्लोर

India-Canada Tension : कॅनडाला भारत सरकारचा तगडा झटका; भारताकडून व्हिसा बंदी, दोन्ही देशात तणाव वाढला

भारताने कॅनडातील (diplomatic standoff) व्हिसा सेवा बंद केली आहे. कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाइटवर घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारतावर बेछुट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारत सरकारने तगडा झटका दिला आहे. भारताने कॅनडातील (diplomatic standoff) व्हिसा सेवा बंद केली आहे. कॅनडामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या व्हिसा सुविधा वेबसाईटवर घोषणा करण्यात आली आहे. कॅनडाकडून करण्यात आलेल्या बेछुट आरोपांवर भारताकडून झटक्यावर झटका सुरु आहे. कॅनडा पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांनंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडाने एका वरिष्ठ भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यानंतर भारताने मंगळवारी जशास तसे उत्तर देत एका वरिष्ठ कॅनडा राजनैतिक हकालपट्टी केली होती. 

कॅनडातील भारतीयांना काळजी घेण्याचे आवाहन 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) म्हटले की, "कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया आणि राजकीयदृष्ट्या निषेध केलेले द्वेषपूर्ण गुन्हे, गुन्हेगारी हिंसाचार पाहता, तेथील सर्व भारतीय नागरिकांनी आणि प्रवासाचा विचार करणार्‍यांना जास्तीत जास्त काळजी घ्यावी." तसेच "अलीकडील काळात विशेषतः भारतीय राजनैतिक अधिकारी आणि भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणार्‍या भारतीय समुदायाच्या वर्गांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना अशा घटना पाहिल्या गेलेल्या कॅनडातील प्रदेश आणि संभाव्य ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

कॅनडामधील ढासळत चाललेलं सुरक्षा वातावरण लक्षात घेता, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. MEA ने म्हटले आहे की, कॅनडातील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय उच्चायुक्त आणि महावाणिज्य दूतावास कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील.

कॅनडातील भारतीय नागरिक आणि भारतातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित वेबसाइट किंवा MADAD पोर्टल madad.gov.in माध्यमातून ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयात किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय महावाणिज्य दूतावासात नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीमुळे उच्चायुक्तालय आणि महावाणिज्य दूतावास कोणत्याही आणीबाणीवेळी कॅनडामधील भारतीय नागरिकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकतील,” असेही म्हटले आहे.

कॅनडावर निष्क्रियतेचा आरोप

खलिस्तान समर्थकांविरुद्ध भारताने कॅनडावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे, ज्याला ट्रूडो सरकारचा कॅनडाच्या-शीख समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाते. भारताला असे वाटते की, यामुळे खलिस्तान समर्थक गटांना भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावासाची तोडफोड करण्यासाठी आणि तेथे असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde on Ghatkopar : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ABP MajhaGhatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Embed widget