एक्स्प्लोर

मोदी सरकारला दिलासा, ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ रँकिंगमध्ये भारत टॉप-100 मध्ये

जीएसटी आणि नोटाबंदीमुळे विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका होत असताना, दुसरीकडे सरकारसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक बँकेच्या ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’च्या ताज्या रँकिंगमध्ये भारताचा टॉप 100 देशांच्या यादीत समावेश झाला आहे.

नवी दिल्ली : जीएसटी आणि नोटाबंदीमुळे विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका होत असताना, दुसरीकडे सरकारसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक बँकेच्या ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’च्या ताज्या रँकिंगमध्ये भारताचा टॉप 100 देशांच्या यादीत समावेश झाला आहे. मात्र, ही रँकिंग देशात जीएसटी लागू होण्यापूर्वीची असल्याचेही सांगण्यात येत आहे. 190 देशांच्या यादीत भारत 100 व्या स्थानावर जागतिक बँकेने ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’ रँकिंगची 2018 ची यादी जाहीर करताना मोदी सरकारच्या कामांचं कौतुक केलं. 190 देशांच्या यादीत गेल्या वर्षी भारत 130 व्या स्थानावर होता. मात्र, यंदा भारताने 30 अंकांनी झेप घेऊन, टॉप 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. या रँकिंगमध्ये जून 2016 ते जून 2017 पर्यंतच्या सुधारणांच्या कार्यक्रमांचं मुल्यमापन करण्यात आलं. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, याचा परिणाम आगामी तीन ते पाच वर्षात पाहायला मिळेल. अनेक आघाड्यांवर भारताची चांगली स्थिती विशेष म्हणजे, सर्वोत्तम प्रदर्शानामध्ये भारताच्या ‘डिस्टेंस टू फ्रंटियर’मध्ये चांगली सुधारणा झाल्याचे वर्ल्ड बँकेने नमुद केलं आहे. याआधी भारताचे ‘डिस्टेंस टू फ्रंटियर’ हे धोरण 56.05 होते. पण आता ते 60. 76 आहे. याचाच अर्थ इतर देशांच्या तुलनेत भारतात सुधारणा झपाट्याने होत आहेत. भारतात व्यापार करणं सोपं आहे? या रँकिंगसाठी देशातील व्यापार करणं किती सोपं झालं? याचं मुल्यमापन करण्यासाठी 10 निकष लावण्यात आले. यातील 8 निकषांवर भारताची स्थिती अतिशय उत्तम होती. यात लहान व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीच्या हितांचे रक्षण करणे, कर्ज मिळवणे, कंस्ट्रक्शन परमिट मिळवणे, कंत्राटांना तत्काळ लागू करणे आणि दिवाळखोरीची प्रक्रिया झटपट पूर्ण करणे आदी स्थितीमध्ये सुधारणा झाल्या आहेत. मात्र, असे असले तरी, व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारा वेळसारख्या काही आघाड्यांवर भारताची स्थिती समाधानकारक नसल्याचंही बँकेने अहवालात नमुद केलं आहे. संपूर्ण दक्षिण आशियात भारत दुसरा या रँकिंगमधील संपूर्ण दक्षिण अशियाची चर्चा करायची झाल्यास, भूटान 75 अंकांनी स्थानावर सर्वात आघाडीवर आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे 100 व्या स्थानावर आहे. नेपाळ 105 अंकांनी तिसऱ्या, श्रीलंका 11 व्या, मालद्विप 136 व्या आणि पाकिस्तान 147 व्या स्थानावर आहे. भारतातील सुधारणा कार्यक्रमांमध्ये प्रॉव्हिडेंट फंडासाठी इ-पेमेंटची सुविधा, आणि कॉर्पोरेट टॅक्सच्या दरांमध्ये कपात यांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. दिल्ली, मुंबईत सर्वेक्षण वर्ल्ड बँकेच्या या अहवालासाठी दिल्ली आणि मुंबईतील व्यापाऱ्यांचा सर्वे करण्यात आला. ज्यामुळे वर्ल्ड बँकेवर टीकाही झाली. पण बँकेच्या मते, ही दोन शहरेच व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या सर्वेक्षणामुळे उद्योग क्षेत्रातील चित्र स्पष्ट होतं. 'नोटाबंदीचा निर्णय महत्त्वाचा' नोटाबंदीचा निर्णयाबाबतही या रँकिंगमध्ये समावेश आहे का? असा प्रश्न वर्ल्ड बँकेला विचारला असता, बँकेने सांगितलं की, नोटाबंदीचा निर्णय हा देशासाठी महत्त्वाचा निर्णय होता. अशा प्रकारचा निर्णय इतर कोणत्याही देशाने लागू केला नाही. पण रँकिंग तयार करताना विविध देशांमधील उद्योग क्षेत्रातील स्थित्यंतरं एक समान तराजूवर तोलण्यात आली. व्यापारी शहरांमध्ये लुधियाना पहिल्या स्थानावर भारतात व्यापार करणाऱ्या शहरांमध्ये पंजामधील लुधियाना पहिल्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद दुसऱ्या आणि भुवनेश्वर तिसऱ्या क्रमांकावरील शहर आहे. तर देशाची राजधानी दिल्ली सहाव्या, आर्थिक राजधानी मुंबई 10 व्या, नोएडा 12 व्या आणि कोलकाता 17 व्या स्थानावर असल्याचं या अहवालातून सांगण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivraj Rakshe Maharashtra Kesari Rada | शिवराज राक्षेचा पराभव, पंचांना लाथ मारली, स्पर्धेत गोंधळABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वासABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
Embed widget