एक्स्प्लोर

Video : 'राहुल गांधींनी देशासाठी बलिदान दिले', मल्लिकार्जुन खरगे हे काय बोलून गेले; व्हिडीओ व्हायरल!

मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत जोरदार भाषण केलं. त्यांच्या याच भाषणाची एक व्हिडीओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे.

दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत विरोधकांनी दिल्लीच्या रामलीला मैदानात (Ramlila Maidan) 'लोकशाही वाचवा' रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या सभेमध्ये विरोधी नेत्यांनी आपल्या भाषणादरम्यान सत्ताधारी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनीदेखील जोरदार भाषण केले. मात्र त्यांच्या भाषणाची एक क्लीप सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांचा संदर्भ देताना चुकून खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव घेतले.

भाजपच्या रणनीतीवर बोट ठेवलं

इंडिया आघाडीने आयोजित केलेल्या या रॅलीला हजारो लोक उपस्थित होते. यावेळी खरगे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी नरेंद्र मोदी तसेच भाजपच्या रणनीतीवर बोट ठेवले. मात्र राजीव गांधी यांच्या कामाचा, त्यांनी दिलेल्या बलिदानाच संदर्भ देताना त्यांनी चुकून राहुल गांधी यांचा उल्लेख केला. 

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणात "या देशासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:चे प्राण दिले. राहुल गांधी (त्यांना राजीव गांधी असे म्हणायचे होते) यांनीही आपले प्राण दिले. त्यांच्या देहाचे तुकडे-तुकडे झाले. इंदिरा गांधींनी तर देशाला एकसंध ठेवण्यासाठी तब्बल 32 गोळ्या अंगावर झेलल्या," असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. तसेच देशासाठी प्राण देणारा दुसरा कोणी नेता असू शकतो का? असा सवालही त्यांनी केला. 

सत्तेत राहण्यासाठी सर्वकाही केलं जातंय

दरम्यान, या सभेत राहुल गांधी यांनीदेखील रोखठोक भाषण केले. मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी क्रिकेटच्या सामन्यांचे उदाहरण दिले. विरोधकांनी निवडणूकच लढू नये असे मोदी यांना वाटत आहे. मोदी यांनी निवडणूक आयोगावर त्यांचेच लोक बसवले आहेत. त्यांनी दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. काँग्रेसची बँक खाती बंद करण्यात आली आहेत. न्यायपालिकेवर दाबव टाकला जात आहे, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच संविधान रद्द करण्यासाठी आणि नरेंद्र मोदी सत्तेत कायम राहावेत यासाठी हे सगळं केलं जात आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. 

हे ही वाचा >

 मोदींकडून मॅचफिक्सिंग, भर निवडणुकीत दोन सीएम जेलमध्ये टाकले, काँग्रेसची खाती गोठवली; राहुल गांधींचा गंभीर आरोप

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAshtvinayak Yatra : अष्टविनायक यात्रा रांंजणगावात; घरगुती गणपती सजावट स्पर्धाBadlapur Case : चिमुकलीच्या कुटुंबाचं एन्काउंटरवरून फायरिंगMalad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget