एक्स्प्लोर

Bihar News: राबडीदेवींच्या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हजेरी, बिहारमध्ये राजकीय चर्चांना उधाण

राबडीदेवी यांनी आयोजीत केल्या इफ्तार पार्टीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हजेरी लावली. त्यामुळे या इफ्तार पार्टीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Bihar News : पाटणामध्ये माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीत सर्वांच आश्चर्याचा धक्का बसला. कारण या कार्यक्रमात खुद्द बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हजेरी लावली. त्यामुळे या इफ्तार पार्टीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. येणाऱ्या काळात बिहाराच्या राजकारणात काही मोठ्य घडामोडी घडणार का? याबाबत देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यांनी तर आम्हीच सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री नितीशकुमार हे राबडीदेवी यांनी आयोजीत केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिल्याने वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की बिहारमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे का?  तर दुसरीकडे लालू प्रसाद यांचा मोटा मुलगा तेज प्रताप यादव यांनी दोन पावले पुढे जात नितीश कुमार हे राजदच्या इफ्तार पार्टीत सामील झाल्याबद्दल बिहारमध्ये सरकार स्थापनेचे भाकीत केले. आमच्यात गुप्त चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. बिहारमध्ये आम्ही सरकार स्थापन करु. याबाबत राजदच्या राज्यसभा खासदार मीसा भारती म्हणाल्या की, राजकारणात कोणत्याही गोष्टीचा अंदाज बांधणे फार कठीण असते. 

या इफ्तार पार्टीला तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, राबडी देवी, मिसा भारती हे सर्वजण नितीश कुमार यांच्यासोबत बसले होते. या मेजवानीला चिराग पासवान आणि मुकेश साहनीही पोहोचले होते. दरम्यान, याबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. मग ते भाजपचे असोत किंवा  लोक जनशक्ती पार्टीचे. इफ्तार पार्टीला हजेरी लावण्याची परंपरा असल्याचे ते म्हणाले. अशाप्रकारे इफ्तारच्या निमित्ताने राजदने मोठा राजकीय मेळावा आयोजित केला होता.

दरम्यान, नितीश कुमार यांच्या इफ्तार पार्टीला जाण्याचा राजकीय अर्थ काढू नये, असे भाजपने म्हटले आहे.  बिहारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन म्हणाले की, तेजस्वी यादव यांनी आम्हालाही इफ्तार पार्टीला बोलावले होते. आम्हीही आलो होते. यामध्ये कोणताही राजकीय मुद्दा बाहेर काढण्याची गरज नाही. मात्र, या इफ्तार पार्टीची वेळ सर्वात महत्त्वाची आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या बिहार दौऱ्याच्या पूर्वसंध्येला हा राजकीय मेळावा झाला. त्यामुळे त्यात नक्कीच राजकीय संदेश दडलेला आहे. दरम्यान, जनता दल आणि भाजपमध्ये सुरु धुसफूस सुरु आहे. त्यामुले आता बिहारमध्ये नवी राजकीय समीकरणे तयार होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Embed widget