एक्स्प्लोर

Bihar Election 2025: मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

Bihar Election 2025: बिहार निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2025 कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन टप्प्यांत मतदान 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होईल तर मतमोजणी 16 नोव्हेंबर रोजी होईल.

Bihar Election 2025: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित आणि मतदारयादी सुधारणा कार्यक्रमामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्चचिन्ह निर्माण केलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहार निवडणूक कार्यक्रम (Bihar Assembly Election 2025 Schedule)  घोषित केला. बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्याचे मतदान 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होईल.  

'त्यांना आयोग नवीन मतदार कार्ड जारी करेल' (Bihar Election Law and Order Measures)

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "सत्य हे आहे की लोकांनी सोशल मीडियावर एसआयआरबद्दल खूप टिप्पण्या केल्या आहेत. परंतु सत्य हे आहे की राजकीय पक्षांनी एसआयआरची मागणी केली आहे. निवडणूक आयोग ज्या मतदारांचे पत्ते बदलले आहेत त्यांना नवीन मतदार कार्ड जारी करेल."

निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील (Bihar Voter List 2025 Correction SIR)

निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील. 30 सप्टेंबर रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात आली. निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल."

बिहारमध्ये किती पुरुष आणि महिला मतदार आहेत? (Bihar Election 2025 Voter Count)

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, "यावेळी बिहारच्या निवडणुका सुरळीत आणि सोप्या पद्धतीने होतील. निवडणुकीसाठी आम्ही बिहारच्या जनतेचे सहकार्य मागतो. बिहारमध्ये एकूण 7.42 कोटी मतदार आहेत, त्यापैकी 3.92 कोटी पुरुष आहेत आणि 3.5 कोटी महिला आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 मतदार असतील."

मतदार यादी दुरुस्त करण्यात आली (Bihar Voter List 2025 Correction SIR) 

बिहारच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी एसआयआरबाबत सांगितले की, "मतदार यादी दुरुस्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोग ही एक संवैधानिक संस्था आहे. अंतिम मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना वितरित करण्यात आली आहे. जर अजूनही काही समस्या असतील तर ते अर्ज करू शकतात."

2020 मध्ये बिहारमध्ये काय घडलं? (Bihar Election 2025 Political Analysis)

दुसरीकडे, 2020 मध्ये बिहारच्या निवडणुका तीन टप्प्यात झाल्या. 20 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निकाल 10 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. यापूर्वी 2015 मध्ये पाच टप्प्यात मतदान झाले होते. 12 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत मतदान झाले. निवडणुकीचे निकाल 8 नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. बिहार विधानसभा निवडणूक 2020 ही भारतीय राजकारणात फार महत्वाची ठरली. या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल (राजद) तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली प्रबळ आव्हान घेऊन उतरला. तर दुसरीकडे जनता दल (युनायटेड) चे नितीशकुमार आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांनी महायुती करून निवडणूक लढवली. निकाल लागला तेव्हा राज्यातील जनतेने बदलाची लाट निर्माण केली असली, तरी अंतिम आकडेवारीत महायुतीने केवळ 15-20 जागांच्या फरकाने सत्ता काबीज केली.

नितीश यांनी भाजपसोबत राहून मुख्यमंत्रीपद टिकवले

या निवडणुकीतील खरा "किंगमेकर" ठरला तो छोट्या पक्षांचा आकडा. विशेषतः एआयएमआयएम (AIMIM) आणि चिराग पासवान यांच्या लोजपाने (LJP) निवडणुकीत थेट सत्ता काबीज केली नसली तरी राजकीय समीकरण ढवळून काढलं. चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधी भूमिका घेत भाजपच्या उमेदवारांना अप्रत्यक्ष मदत केली. त्यामुळे नितीशकुमार यांच्या पक्षाला फटका बसला, पण त्याचवेळी भाजपला फायदा झाला. परिणामी, महायुतीत भाजप हा मोठा पक्ष बनला आणि नितीशकुमार यांची ताकद कमी झाली. राजदने सर्वाधिक जागा जिंकूनही (75+), सत्ता त्यांच्या हातून निसटली. यामध्येच नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय "कला" दाखवली. लोकांचा कडवा विरोध असूनही नितीश यांनी भाजपसोबत राहून मुख्यमंत्रीपद टिकवले. त्यांचा हा निर्णय राजदसाठी मोठा धक्का होता, कारण जनमताने त्यांना पहिली पसंती दिली होती, पण सत्ता समीकरणात आकड्यांचा खेळ महत्त्वाचा ठरला.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : नरेंद्र मोदी म्हणाले, दोषींवर कडक कारवाई करणार; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला!
नरेंद्र मोदी म्हणाले, दोषींवर कडक कारवाई करणार; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला!
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Anna Hazare Letter to PM Modi: 'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Embed widget