एक्स्प्लोर

आमच्यात हिंमत असल्याने NRC ची अंमलबजावणी करतोय : शाह

चर्चेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला.

नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) दुसरा मसुदा सोमवारी (29 जुलै) जारी करण्यात आला. यानंतर या मुद्द्यावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. आज या मुदद्यावर राज्यसभेत चर्चा झाली आणि जोरदार गोंधळही झाला. चर्चेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. आसाममध्ये हे आधीच लागू व्हायला हवं होतं, पण तुमच्यात ते लागू करण्याची हिंमत नव्हती, असं अमित शाह म्हणाले. अमित शाह म्हणाले की, "सर्व विरोधी नेत्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकलं. मी संपूर्ण भाषण ऐकत होतो, पण कोणी हे सांगितलं नाही की एनआरसी का आलं? आसाममध्ये याबाबत अनेक मोठी आंदोलनं झाली. अनेकांनी आपला जीवही दिला. यानंतर 14 ऑगस्ट 1985 रोजी राजीव गांधींनी आसाम करार केला होता." आम्ही हिंमत दाखवली शाह म्हणाले की, "आसाममध्ये एनआरीसी लागू करण्याची हिंमत काँग्रेसकडे नव्हती आणि भाजप सरकारने हिंमत दाखवून हे काम केलं आहे. काँग्रेस एनआरसीला विरोध करुन देशात अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे." शाह यांच्या विधानावर विरोधक खासदारांनी जोरदार गोंधळ केला, यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. राजीव गांधींनी करार केला राज्यसभेत अमित शाह म्हणाले की, "चर्चेदरम्यान हे कोणीच सांगत नाही की, एनआरसीचं मूळ कुठे आहे, हे कुठून आलं आहे? अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावर आसामचे शेकडो तरुण शहीद झाले आहेत. 14 ऑगस्ट 1985 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम अकॉर्डवर स्वाक्षरी केली होती. एनआरसीची स्थापना हाच आत्मा होता. या अकॉर्डची तरतूद होती की, अवैध घुसखोरांची ओळख पटवून, त्यांना नोंदणी नागरिकांमधून वेगळं करुन एक राष्ट्रीय नोंदणी बनवण्यात येईल," असं शाह म्हणाले. काँग्रेसला बांगलादेशींबद्दल सहानुभूती काँग्रेसला अवैध बांगलादेशींबाबत सहानुभूती असल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसच्या पंतप्रधानाने हा करार केला होता, पण त्या पक्षाला त्याची अंमलबजावणी करता आली नाही. आमच्यामध्ये हिंमत होती, त्यामुळे आम्ही अंमलबजावणी केली. तुम्हाला अवैध घुसखोरांना वाचवायचं आहे का?" राज्यसभेत जोरदार गोंधळ अमित शाह यांच्या या विधानानंतर राज्यसभेत जोरदार गोंधळ झाला. आरडाओरडा करत काँग्रेस खासदार सभापतींजवळ पोहोचले. यानंतर सभापतींनी राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 10 मिनिटांसाठी स्थगित केली. पुन्हा कामकाज सुरु होताच, काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. एनआरसीचा अहवाल NRC च्या मते आसामचे 2 कोटी 89 लाख 83 हजार 668 भारतीय आहेत.  आसामची एकूण लोकसंख्या 3 कोटी 29 लाख इतकी आहे. मात्र आता 40 लाख नागरिकांना आसाममधील आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही. NRC ची पहिली यादी 31 डिसेंबर 2017 रोजी जारी करण्यात आली होती. पहिल्या यादीत आसामच्या 3.29 कोटी लोकसंख्येपैकी 1.90 कोटी नागरिकांना स्थान मिळालं होतं. जे नागरिक 25 मार्च 1971 पासून आसाममध्ये राहतात त्यांना या यादीत सरसकट सहभागी करुन घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget