एक्स्प्लोर

आमच्यात हिंमत असल्याने NRC ची अंमलबजावणी करतोय : शाह

चर्चेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला.

नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (NRC) दुसरा मसुदा सोमवारी (29 जुलै) जारी करण्यात आला. यानंतर या मुद्द्यावर राजकारणाला सुरुवात झाली आहे. आज या मुदद्यावर राज्यसभेत चर्चा झाली आणि जोरदार गोंधळही झाला. चर्चेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विधानानंतर सभागृहात जोरदार गदारोळ झाला. आसाममध्ये हे आधीच लागू व्हायला हवं होतं, पण तुमच्यात ते लागू करण्याची हिंमत नव्हती, असं अमित शाह म्हणाले. अमित शाह म्हणाले की, "सर्व विरोधी नेत्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकलं. मी संपूर्ण भाषण ऐकत होतो, पण कोणी हे सांगितलं नाही की एनआरसी का आलं? आसाममध्ये याबाबत अनेक मोठी आंदोलनं झाली. अनेकांनी आपला जीवही दिला. यानंतर 14 ऑगस्ट 1985 रोजी राजीव गांधींनी आसाम करार केला होता." आम्ही हिंमत दाखवली शाह म्हणाले की, "आसाममध्ये एनआरीसी लागू करण्याची हिंमत काँग्रेसकडे नव्हती आणि भाजप सरकारने हिंमत दाखवून हे काम केलं आहे. काँग्रेस एनआरसीला विरोध करुन देशात अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे." शाह यांच्या विधानावर विरोधक खासदारांनी जोरदार गोंधळ केला, यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं. राजीव गांधींनी करार केला राज्यसभेत अमित शाह म्हणाले की, "चर्चेदरम्यान हे कोणीच सांगत नाही की, एनआरसीचं मूळ कुठे आहे, हे कुठून आलं आहे? अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावर आसामचे शेकडो तरुण शहीद झाले आहेत. 14 ऑगस्ट 1985 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाम अकॉर्डवर स्वाक्षरी केली होती. एनआरसीची स्थापना हाच आत्मा होता. या अकॉर्डची तरतूद होती की, अवैध घुसखोरांची ओळख पटवून, त्यांना नोंदणी नागरिकांमधून वेगळं करुन एक राष्ट्रीय नोंदणी बनवण्यात येईल," असं शाह म्हणाले. काँग्रेसला बांगलादेशींबद्दल सहानुभूती काँग्रेसला अवैध बांगलादेशींबाबत सहानुभूती असल्याचा आरोप करत अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसच्या पंतप्रधानाने हा करार केला होता, पण त्या पक्षाला त्याची अंमलबजावणी करता आली नाही. आमच्यामध्ये हिंमत होती, त्यामुळे आम्ही अंमलबजावणी केली. तुम्हाला अवैध घुसखोरांना वाचवायचं आहे का?" राज्यसभेत जोरदार गोंधळ अमित शाह यांच्या या विधानानंतर राज्यसभेत जोरदार गोंधळ झाला. आरडाओरडा करत काँग्रेस खासदार सभापतींजवळ पोहोचले. यानंतर सभापतींनी राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला 10 मिनिटांसाठी स्थगित केली. पुन्हा कामकाज सुरु होताच, काँग्रेस सदस्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केली. यानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. एनआरसीचा अहवाल NRC च्या मते आसामचे 2 कोटी 89 लाख 83 हजार 668 भारतीय आहेत.  आसामची एकूण लोकसंख्या 3 कोटी 29 लाख इतकी आहे. मात्र आता 40 लाख नागरिकांना आसाममधील आपलं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही. NRC ची पहिली यादी 31 डिसेंबर 2017 रोजी जारी करण्यात आली होती. पहिल्या यादीत आसामच्या 3.29 कोटी लोकसंख्येपैकी 1.90 कोटी नागरिकांना स्थान मिळालं होतं. जे नागरिक 25 मार्च 1971 पासून आसाममध्ये राहतात त्यांना या यादीत सरसकट सहभागी करुन घेतलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Embed widget