एक्स्प्लोर

सावरकरांच्या माफीबाबत न केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेना खासदार लक्ष्य

सावरकर (veer savarkar) हे व्यक्तिमत्व सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच संवेदनशील बनलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरुन सतत राजकीय वाद सुरु असतात.

नवी दिल्ली : राज्यसभेत 12 खासदारांच्या निलंबनावरुन सावरकरांबाबत एक वक्तव्य झालं आणि इकडे महाराष्ट्रात भाजपनं शिवसेना खासदारांवर टीकास्त्र सोडलं. पण मुळात सावरकरांबद्दलचं हे वक्तव्य शिवसेना नव्हे तर केरळमधल्या माकप खासदारांनी केलेलं होतं. त्यामुळे एकाने केलेल्या वक्तव्यावरुनच राजकीय लढाई रंगवण्याचा प्रयत्न झाला. 

सावरकर हे व्यक्तिमत्व सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच संवेदनशील बनलं आहे. त्यामुळे त्यांच्या नावावरुन सतत राजकीय वाद सुरु असतात. आता तर थेट संसदेतल्या 12 आमदारांच्या निलंबनातही सावरकर आलेत. ते कसे, कुठून आले आणि खरंच त्यांचा शिवसेनेशी काही संबंध आहे का याची पुरेशी माहिती न घेता भाजपकडून आरोप प्रत्यारोपही सुरु झाले. 

 पण मुळात झालं काय होतं, खरंच प्रियंका चतुर्वेदी यांनी सावरकरांबद्दल हे विधान केलं होतं की नाही? तर प्रियंका चतुर्वैदी असं बोलल्याच नव्हत्या. 12 निलंबित खासदारांपैकी केरळमधले माकपचे खासदार विनय विक्रम यांनी हे विधान केलं होतं. त्यामुळेच आता या न केलेल्या विधानावरुन स्पष्टीकरण देण्याची वेळ शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर आलीय. शिवाय चुकीचे आरोप केल्यानं आशिष शेलार यांनी आता माफी मागावी असंही प्रत्युत्तर त्यांनी दिलंय. 

 एका इंग्रजी वेबपोर्टलनं केलेल्या स्टोरीचा आधार घेत हे आरोप सुरु झाले. पण मुळात त्या इंग्रजी वेबपोर्टलच्या स्टोरीतही कुठेच प्रियंका चतुर्वेदी यांनी हे  वक्तव्याचा केल्याचा उल्लेख नाही. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. या खासदारांनी माफी मागितली तर निलंबन मागे घेऊ असं राज्यसभेत सभागृह नेते पीयुष गोयल यांनी म्हटलं. पण शिवसेनेसह सर्वच पक्षांनी माफीला स्पष्ट नकार दिलाय. 

निलंबनाच्या या कारवाईत सावरकर म्हटल्याबरोबर भाजप शिवसेनेवर  तातडीनं टीकेला सरसावली. पण हे एकाने केलेल्या वक्तव्यावरुनचं महाभारत. ज्यांनी हे विधान केलं त्या माकपवर शरसंधान करण्याऐवजी भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असली तरी शिवसेना आपलं सावरकरप्रेम कायमच आक्रमकपणे दाखवत आली आहे.  

Swatantrya Veer Savarkar यांची बदनामी करण्यात आलीय यात तथ्य; लेखक वैभव पुरंदरे 'माझा'वर

संबंधित बातम्या :

'विक्रम गोखलेंचं वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हौतात्मावर प्रश्न उपस्थित करणारे'

सावरकरांच्या दया याचिकेशी गांधींचा काय संबंध?

महात्मा गांधींच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांची ब्रिटीशांकडे दया याचिका : केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget