एक्स्प्लोर
Advertisement
अद्याप तोडगा नाही, सहाव्या दिवशीही अण्णांचं उपोषण सुरुच
काल राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी चर्चा केली, मात्र तांत्रिक मुद्द्यांवर अण्णाची सहमती झाली नाही. त्यामुळे सहाव्या दिवशीही उपोषण सुरुच आहे.
नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र अद्यापपर्यंत अण्णांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्याने हे उपोषण सुरुच आहे. काल राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांशी चर्चा केली, मात्र तांत्रिक मुद्द्यांवर अण्णाची सहमती झाली नाही.
गिरीश महाजन यांनी सरकारचा प्रस्ताव अण्णांपुढे मांडला. मात्र अण्णांनी या मसुद्यात अनेक त्रुटी दाखवल्या. यामध्ये मुख्य मुद्दा लोकपाल होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अण्णांच्या मागण्या जशाच्या तशा मान्य करण्यात अनेक अडचणी असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे सहाव्या दिवशीही हे उपोषण सुरु राहणार आहे.
सरकारकडून आज अण्णांचं उपोषण सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सहाव्या दिवशीही हे उपोषण चालूच असल्याने अण्णांची प्रकृती खालावत चालली आहे.
अण्णांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?
शेतकऱ्यांचे प्रश्न
कृषी उत्पन्नाला उत्पादन खर्चाच्या आधारावर 50 टक्के अधिक भाव मिळावा
शेतीवर अवलंबून असलेल्या 60 वर्षांवरील शेतकरी आणि मजुरांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्यावं
कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, सरकारी हस्तक्षेप नसावा
पिकाचा सामूहिक नव्हे, तर वैयक्तिक विमा असावा
लोकपाल, लोकायुक्त संदर्भातल्या मागण्या
जनलोकपाल कायदा त्वरीत लागू करावा, लोकपालची नियुक्ती व्हावी
लोकपाल कायदा कमकुवत करणारे कलम 63 आणि 44 मध्ये बदल करावा
केंद्राच्या लोकपालप्रमाणे प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू करावा
निवडणुकीसंदर्भातल्या मागण्या
बॅलेट पेपरवर उमेदवाराचा कलर फोटो हेच निवडणूक चिन्ह असावं
मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग केला जावा
NOTA ला Right To Reject चा अधिकार दिला जावा
लोकप्रतिनिधिला परत बोलावण्याचा Right To Recall अधिकार जनतेला असावा
संबंधित बातम्या :
रामलीलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आऊटपुट भाजप कार्यालयात?
अण्णांनी केंद्राच्या मसुद्यात त्रुटी दाखवल्या, उपोषण लांबणार : सूत्र
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement