एक्स्प्लोर

Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू

अर्टिगा गाडीमधून आपापल्या घरी परतत असताना काळानं घाला घातला. गाडीचा पुरता चक्काचूर झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Accident News : आज भारताची सकाळ एका हृदयद्रावक घटनेनं झाली. उत्तर प्रदेशातील इटावा येथे झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे. अपघातात एक अख्खं कुटुंब संपलं आहे. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि गंभीर जखमी एकाच कुटुंबातील आहेत. हे सर्वजण अर्टिगा गाडीमधून आपापल्या घरी परतत होते. त्यानंतर त्यांची गाडी वाटेत उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. गाडीचा पुरता चक्काचूर झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

उत्तर प्रदेशातील इटावा येथे इकदिल पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 19 वर सकाळी 7 वाजता ही घटना घडली. इथे आग्रा-कानपूर महामार्गावर एर्टिगा गाडी उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील सातपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही एर्टिगा गाडी दिल्लीहून हमीरपूरच्या महोबाला जात होती. ड्रायव्हरला डुलकी लागल्यानं हा अपघात झाला. ड्रायव्हरच्या डोळ्यांवर झोप आली आणि कार रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एक महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. 

गंभीर जखमी असल्यानं एक महिला आणि एका तरुणीला स्थानिक जिल्हा रुग्णालयातून सैफई वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातात जखमी झालेल्या मुलानं सांगितलं की, आम्ही ननिहालच्या दिशेनं जात होते. माझी आई आणि बहीण गंभीर जखमी झाले आहेत. आम्ही सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्या आहोत. दरम्यान, अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार झालं आहे. बचावलेला मुलगा गंभीर जखमी असून तोदेखील कुटुंबासोबत इर्टिगा गाडीतून प्रवास करत होता. 

दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा पुरता चक्काचूर झाला होता. गाडीतील मृतदेह बाहेर काढणंही कठीण झालं होतं. शेवटी बचाव पथकानं स्थानिकांच्या मदतीनं गाडीचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढले. मृतांच्या नातेवाईकांना अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे.                                                     

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune :राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीABP Majha Headlines : 04.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSitaram Yechury Dies At 72 :  माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरच श्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Embed widget