एक्स्प्लोर

ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक

नवी दिल्ली: आता ज्येष्ठ नागरिकांना सिनिअर सिटीझनच्या कोट्यातील तिकीटावरील सवलत मिळवण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. जर ज्येष्ठ नागरिकांनी तिकीट बुक करताना आधार कार्ड दाखवले नाही, तर सिनिअर सिटिझन कोट्यातील सवलतीपासून त्यांना मुकावे लागणार आहे. रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरवर तिकीट बुकिंग करताना, किंवा ई-तिकिट बुकिंग करताना दोन्हीवेळीस हा नियम लागू असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतचा अध्यादेश नुकताच प्रसिद्ध केला आहे. अन्यथा 50 टक्क्यांची सवलत मिळणार नाही त्यामुळे जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकिट काऊंटरवर सिनिअर सिटिझनचे तिकिट बुक करत असाल, तर तुम्हाला आधार कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकाने आपला आधार कार्ड नंबर दिल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल, पण ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी 50 टक्क्याची सवलत मिळणार नाही. 1 डिसेंबरपासूनच ही सुविधा उपलब्ध दरम्यान, ही सुविधा 1 डिसेंबरपासूनच सुरु करण्यात आली असून, 1 डिसेंबरपासून 31 मार्च अखेर रेल्वे प्रवासासाठी ज्यांनी तिकीट बुक केले असेल, त्यांना आपला आधार कार्ड नंबर आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन व्हेरिफाईड करता येणार आहे. पण 1 एप्रिलनंतर ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटासाठी आधार कार्ड बंधनकारक असेल. महिला-पुरुषांसाठी एकच नियम रेल्वे विभागाच्यावतीने 60 वर्षावरील पुरुष हे ज्येष्ठ नागरिक म्हणून गणले जात असल्याने, त्यांना रेल्वे तिकीटात 40 टक्के सुट मिळते. तर महिलांसाठी ही वयोमर्यादा 58 असून महिला ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सुट मिळते. पण नव्या अध्यादेशानुसार 1 एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत मिळवण्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे फायदे काय? रेल्वे विभागाच्या या नव्या नियमामुळे रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्यांवर चाप बसेल. कारण सध्या तिकीटांचा काळाबाजार करणारे कोणत्याही डमी नावाने रेल्वेची तिकीटे आरक्षित करुन चढ्या दराने विकतात. या निर्णयाचा दुसरा फायदा म्हणजे, आयआरसीटीसी या रेल्वे विभागाच्या संकेत स्थळावरुन 1 जानेवारीपासून आधार कार्डचा नंबर संकलित करण्यास सुरुवात होईल. यातून एक अशी ऑनलाईन सिस्टीम बनवण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून रेल्वे प्रवाशाचा आधार नंबर दिल्यानंतर त्याचे सर्व डिटेल तत्काळ मिळतील. यामुळे ऑनलाईन फॉर्म भरताना प्रवाशांना जास्त त्रास होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget