एक्स्प्लोर

Hingoli News: मोठी बातमी: राज्यातील 'या' धरणाने गाठला तळ, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं, पिण्याचं पाणी मिळणंही होणार अवघड

Water shortage: राज्यात उन्हाचा कडाका वाढला, धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार ? या धरणावर 60 हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. त्यामुळे आता प्रशासन काय करणार, हे पाहावे लागेल.

हिंगोली: सध्या उन्हाळा सुरू आहे तापमानात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी राज्यामध्ये अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई पाहायला मिळतील पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाने (Siddheshwar Dam) सुद्धा तळ गाठला आहे. धरणामध्ये आता केवळ फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर 60 हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. याशिवाय, हिंगोली, पूर्णा आणि वसमत शहराला पिण्यासाठी याच धरणातून पाणी सोडले जाते.
 
जिल्ह्यातील अनेक गावांच्या सामूहिक जलजीवन योजनेच्या पाण्याचे नियोजन सुद्धा याच धरणातील पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे आता शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.  पूर्ण कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी चार आवर्तन सोडण्यात आले होते. पुढे एक महिना शिल्लक आहे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले पिके पाणी न सोडल्यास धोक्यात येऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी धरणातून या सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुढील दोन दिवसांत प्रशासनाची बैठक होणार आहे. सिद्धेश्वर धरणाने तळ गाठल्यानंतर धरणाची परिस्थिती काय आहे, याचा ड्रोनच्या साह्याने आढावा घेतला जात आहे. मात्र, तुर्तास धरणातील पाणीसाठा जवळपास संपल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता प्रशासन काय उपाय करणार, हे पाहावे लागेल.

मुंबईतही पाणीकपात होण्याची शक्यता

राज्यातील ग्रामीण भागांप्रमाणे शहरी भागांमध्येही पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती भीषण आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा खालच्या पातळीला आला आहे. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना 15 ते 20 टक्के पाणीटंचाईचा सामोरे जावे लागू शकते. तसे झाल्यास मुंबईकरांसमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतील. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या या 7 तलावांमध्ये मिळून 16.97 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

हा पाणीसाठा फारतर दीड महिने पुरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे या तलावांमधील पाणी झपाट्याने आटत आहे. अशा परिस्थितीत तलावांमधील पाणी आणखी किती काळ पुरेल, हा प्रश्न आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची आशा आहे. तसे न घडल्यास मुंबईत पाणीकपात अटळ असल्याचे सांगितले जाते. 

आणखी वाचा

सोलापुरात भीषण पाणीटंचाई; उजनी धरण मायनस 37.09 टक्क्यांवर, 93 फूट विहिरीने तळ गाठला

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget