एक्स्प्लोर

Hingoli News: मोठी बातमी: राज्यातील 'या' धरणाने गाठला तळ, शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं, पिण्याचं पाणी मिळणंही होणार अवघड

Water shortage: राज्यात उन्हाचा कडाका वाढला, धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार ? या धरणावर 60 हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. त्यामुळे आता प्रशासन काय करणार, हे पाहावे लागेल.

हिंगोली: सध्या उन्हाळा सुरू आहे तापमानात प्रचंड वाढ होत आहे. परिणामी राज्यामध्ये अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई पाहायला मिळतील पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरणाने (Siddheshwar Dam) सुद्धा तळ गाठला आहे. धरणामध्ये आता केवळ फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर 60 हजार हेक्टर शेती अवलंबून आहे. याशिवाय, हिंगोली, पूर्णा आणि वसमत शहराला पिण्यासाठी याच धरणातून पाणी सोडले जाते.
 
जिल्ह्यातील अनेक गावांच्या सामूहिक जलजीवन योजनेच्या पाण्याचे नियोजन सुद्धा याच धरणातील पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे आता शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.  पूर्ण कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी चार आवर्तन सोडण्यात आले होते. पुढे एक महिना शिल्लक आहे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले पिके पाणी न सोडल्यास धोक्यात येऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. येलदरी धरणातून या सिद्धेश्वर धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुढील दोन दिवसांत प्रशासनाची बैठक होणार आहे. सिद्धेश्वर धरणाने तळ गाठल्यानंतर धरणाची परिस्थिती काय आहे, याचा ड्रोनच्या साह्याने आढावा घेतला जात आहे. मात्र, तुर्तास धरणातील पाणीसाठा जवळपास संपल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता प्रशासन काय उपाय करणार, हे पाहावे लागेल.

मुंबईतही पाणीकपात होण्याची शक्यता

राज्यातील ग्रामीण भागांप्रमाणे शहरी भागांमध्येही पाण्याच्या उपलब्धतेची परिस्थिती भीषण आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा खालच्या पातळीला आला आहे. परिणामी येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांना 15 ते 20 टक्के पाणीटंचाईचा सामोरे जावे लागू शकते. तसे झाल्यास मुंबईकरांसमोर अनेक समस्या उभ्या राहू शकतील. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या या 7 तलावांमध्ये मिळून 16.97 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

हा पाणीसाठा फारतर दीड महिने पुरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने तलावांमधील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा वेगही वाढला आहे. त्यामुळे या तलावांमधील पाणी झपाट्याने आटत आहे. अशा परिस्थितीत तलावांमधील पाणी आणखी किती काळ पुरेल, हा प्रश्न आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची आशा आहे. तसे न घडल्यास मुंबईत पाणीकपात अटळ असल्याचे सांगितले जाते. 

आणखी वाचा

सोलापुरात भीषण पाणीटंचाई; उजनी धरण मायनस 37.09 टक्क्यांवर, 93 फूट विहिरीने तळ गाठला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case :आरोपी कृष्णा आंधळेला अटक कधी होणार?, Dhananjay Deshmukh यांनी दर्शवली नाराजीDevendra Fadnavis On Uddhav Thackeray : 2019  मध्ये पवार, ठाकरेंची निवडणुकीआधीच हातमिळवणी : फडणवीसSantosh Deshmukh Case : Dhananjay Munde आणि कराड नाण्याच्या दोन बाजू  : Suresh DhasAnjali Damania On Santosh Deshmukh Case : जप्त केलेल्या 2 मोबाईलमधील डेटा अद्याप का मिळाला नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनी लपवून ठेवलंय; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Beed Crime: वाल्मिक कराड एकटा बड्या पोलीस अधिकाऱ्यांना रोखू शकत नाही, संदीप क्षीरसागरांनी पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची मदत, पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Embed widget