एक्स्प्लोर

Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता

Home loan interest rate: रेपो रेट कमी झाल्यामुळे होम लोन आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. बँकांकडून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई: देशाच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो रेट कमी केला होता. तब्बल पाच वर्षांनी रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे आगामी काळात वाहन आणि गृह कर्जाचे (Home Loan) व्याजदर घटणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे घरे आणि वाहनावर कर्जावर (Auto Loan) भराव्या लागणाऱ्या मासिक हप्त्याचा म्हणजेच ईएमआयचे (EMI) ओझे कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बहुतांश गृह कर्ज ही फ्लोटिंग व्याजदराची असतात. बँकांकडून रेपो रेटनुसार व्याजदरात कपात केली जाते तेव्हा फ्लोटिंग व्याजदर असलेल्या गृहकर्जाच्या ईएमआयचा आकडाही बदल असतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनी रेपो रेट कमी केल्याने आता बँकाही होम आणि ऑटो लोनच्या व्याजदरात घट करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांना वाटत आहे. 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत वार्षिक अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये प्राप्तीकरावरील सुटीची मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवण्यात आली होती. जेणेकरुन सामान्य लोकांच्या हातात जास्त पैसे येतील आणि ते हाच पैसा खर्च करतील. याचा फायदा अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यात होईल, असा धोरणकर्त्यांचा अंदाज आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली होती.  यावेळी रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आली होती. मात्र, या कपातीनंतर आता बँका याचा फायदा सामान्य ग्राहकांना करुन देणार का, हे पाहावे लागेल.

रेपो रेटमधील कपात अत्यंत कमी असल्याने बँकाकडून गृह आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात इतक्यात कपात होणार नाही, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवला जात आहे. रेपो रेट कमी झाल्यानंतर बँकांच्या ठेवी संकलनात वाढ होऊन  पुरेशी रोख तरतला (Liquidity) कमावण्यासाठी आणखी 3 ते 6 महिने जावे लागतील. त्यानंतर बँकांकडून गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर कमी केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.

रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट महत्त्वाचा का असतो?

रिझर्व्ह बँकेकडून अन्य बँकांना ज्या दराने कर्जपुरवठा करण्यात येतो, त्याला रेपो रेट म्हणतात. रेपो रेट जास्त असल्यास बँका त्यांच्यावर पडणारा व्याजभार ग्राहकांवर ढकलतात. त्यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर वाढतात. त्याउलट म्हणजे रेपो रेट कमी झाल्यास गृह आणि वाहन कर्जाचे व्याजदर कमी होतात. आता  पाच वर्षांनी रेपो रेट कमी झाल्याने बँकांवर व्याजदर कपातीसाठी दबाव आहे. त्यामुळे आता बँका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

आणखी वाचा

आरबीआयनं रेपो रेट घटवला,  25, 50 लाखांचं होम लोन असणाऱ्यांना किती फायदा?

महत्त्वाच्या बातम्या

Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Devendra Fadnavis Karj Mafi : कर्जमाफीसाठी 5029 कोटी वर्ग, 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; प्रोत्साहनपर रकमेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5029 कोटी रुपये जमा, मुख्यमंत्र्यांकडून प्रोत्साहनपर रकमेबाबत महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget