एक्स्प्लोर

Agriculture News : अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे धुळे, नंदुरबारमधील रब्बी पिकांचं नुकसान; कापणीला आलेले पीक आडवे

Agriculture News : नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. तर धुळ्यात अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं पीक आडवं झालं आहे. या सगळ्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. 

Agriculture News : वातावरणातील बदल (Climate Change), ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) याचा फटका उत्तर महाराष्ट्रातील रब्बी पिकांना (Rabi Crop) मोठ्या प्रमाणावर बसला आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar) ढगाळ वातावरणामुळे पिकांचं नुकसान झालं आहे, तर धुळ्यात (Dhule) अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं पीक आडवं झालं आहे. या सगळ्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. 

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे. तर दुसरीकडे नवापूर तालुक्यात जोरदार वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वातावरण बदलामुळे रबी पिकांवर अळींचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरण आणि दाट धुके याचा परिणाम रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांवर होत असून हरभऱ्यावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. दुसरीकडे गहू आणि ज्वारी पिकावर वेगवेगळ्या वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन घटनेचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नवापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धुळ्यात कापणीला आलेले गव्हाचं पीक आडवे

धुळे (Dhule) तालुक्यातील मोराणे नेर परिसरात सोमवारी (30 जानेवारी) सायंकाळी उशिरा दहा ते पंधरा मिनिटे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. या वाऱ्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका गव्हासह हरभऱ्याच्या पिकाला बसला आहे. तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी झाले असले तरी धुक्याची चादर मोठ्या प्रमाणावर पसरल्याने याचा देखील फटका रब्बी हंगामाच्या पिकांना बसला आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी गव्हाचे पीक (Wheat Crop) आडवे झाले आहे. अवघ्या पंधरा ते वीस दिवसांवर गव्हाची कापणी सुरू होणार होती, मात्र त्यापूर्वीच वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज

हवामान विभागाने कालच (30 जानेवारी) राज्यात चार ते पाच दिवस सौम्य थंडी (Maharashtra Weather Update)  जाणवणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तसंच नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबादसह आजूबाजूच्या जिल्ह्यांतील काही भागांत विजांच्या कडकडाटासह, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाहणारे वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त होता

VIDEO : Nandurbar Rabi Crop : ढगाळ आणि बदलत्या वातवरणाचा रब्बी पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget